शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 05:59 IST

बुधवारी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरिश यांनी ही भूमिका मांडली. ‘मानवी संकटाच्या पार्श्वभूमीवर होणारी ही बैठक महत्त्वाची आहे. 

संयुक्त राष्ट्रसंघ : गाझामध्ये ठराविक काळापुरती युद्धबंदी लागू करणे उपयोगाचे नाही. अशी युद्धबंदी स्थानिक लोकांसमोरील आव्हाने कमी करण्यासाठी पुरेशी नाही. त्यामुळे येथे पूर्ण युद्धबंदी लागू करणे गरजेचे असल्याचे भारताने म्हटले आहे. बुधवारी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरिश यांनी ही भूमिका मांडली. ‘मानवी संकटाच्या पार्श्वभूमीवर होणारी ही बैठक महत्त्वाची आहे. गाझामध्ये ठराविक वेळेपुरती युद्धबंदी उपयोगाची नाही. हे लोक रोज अन्न आणि इंधनासाठी, उपचार आरोग्याच्या प्रश्नांसह शिक्षण अशा प्रश्नांसाठी लढत आहेत. त्यामुळे ही मानवी वेदना आणखी वाढू नये म्हणून लक्ष देण्याची गरज आहे’, असे पर्वतनेनी हरिश म्हणाले. शांततेला दुसरा कोणताच पर्याय नाही. सर्व ओलिसांची सुटका करून सुसंवादातून राजनैतिक मार्गाने युद्धबंदी लागू करणे हाच एकमेव पर्याय असल्याची भूमिका भारताने मांडली. इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षावर आयोजित संयुक्त राष्ट्रसंघाच्या आगामी अधिवेशनात यामुळे नवा मार्ग सापडेल, असेही भारताने म्हटले आहे. सौदी अरब आणि फ्रान्सच्या सहअध्यक्षतेखाली हे अधिवेशन जूनमध्येच होणार होते. परंतु, पश्चिम आशियात वाढता तणाव पाहता हे अधिवेशन लांबले होते.

टॅग्स :Gaza Attackगाझा अटॅकunited nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारत