शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

"...तर हिंदुस्तान जबाबदार असेल!" शेख हसीना यांच्या प्रत्यर्पणाची मागणी करत युनूस सरकारची भारताला धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 09:05 IST

India Bangladesh Relation : बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने अर्थात ICT ने शेख हसीना यांच्यासह अनेक माजी कॅबिनेट मंत्री, सल्लागार आणि लष्करी तथा नागरी अधिकाऱ्यांविरोधात "मानवतेविरोधातील गुन्हे आणि नरसंहारा"साठी अटक वॉरंट जारी केले आहे.

सरकार पदच्युत पंतप्रधान शेख हसीना आणि इतरांना भारतातून परत आणण्यासाठी प्रत्यार्पण करारानुसार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे बांगलादेशचे गृह सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त) मोहम्मद जहांगीर आलम चौधरी यांनी बुधवारी म्हटले आहे. शेख हसीना (७७) या गेल्या ५ ऑगस्टपासून भारतात राहत आहेत. बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या व्यापक निदर्शनानंतर त्यांचा पक्ष अवामी लीगचे १६ वर्षांचे सरकार पडले आणि त्या भारतात आल्या.

बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने अर्थात ICT ने शेख हसीना यांच्यासह अनेक माजी कॅबिनेट मंत्री, सल्लागार आणि लष्करी तथा नागरी अधिकाऱ्यांविरोधात "मानवतेविरोधातील गुन्हे आणि नरसंहारा"साठी अटक वॉरंट जारी केले आहे.

बीएसएस या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, चौधरी यांनी म्हटेल आहे की, ‘‘जे लोक मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या आरोपाखाली आयसीटीमध्ये खटल्याला सामोरे जात आहेत, अशांना परत आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत." आयसीटीने अटक वॉरंट जारी केलेल्या 100 हून अधिक आरोपिंच्या अटकेसंदर्भात सरकारने उचलेल्या पावलांसंदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना, त्यांनी हे भाष्य केले. चौधरी म्हणाले, “आम्ही देशातील लोकांना अटक करत आहोत. मुख्य व्यक्ती (हसीना) देशात नाही. परदेशात असलेल्यांना आपण कसे अटक करणार?" ते पुढे म्हणाले, त्यांना परत आणण्यासाठी कायदेशीर प्रयत्न सुरू आहेत. हसिना यांच्याविरोधात रेड नोटीस जारी करण्यासंदर्भात विचारले असता, पोलिस प्रमुख बहरुल आलम म्हणाले, इंटरपोल लवकरच आयसीटीला हव्या असलेल्या व्यक्तींविरोधात नोटीस जारी करेल, अशी आशा आहे. तसेच, "आयसीटीने रेड नोटीस जारी केल्याने, त्यांना अटक करण्याची जबाबदारी यजमान देशाची आहे," असेही ते म्हणाले.

"...तर भारत जबाबदार असले" -संबंधित वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, माहिती आणि प्रसारण सल्लागार नाहिद इस्लाम म्हणाले, "आम्ही, शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठविण्याची मागणी भारत सरकारकडे केली आहे. हा एक राजकीय मुद्दा आहे. मात्र, शेख हसीना यांनी तेथून (भारतातून) राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि भारतात राजकीय बैठका घेतल्या, तर त्यासाठी भारत सरकार जबाबदार असेल.’’ 

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारत