शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

भारत, बांगलादेशात पावसाचे ६०० बळी; २.५ कोटी लोकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 01:18 IST

बांगलादेशमध्ये पुरामुळे ४० लाख लोकांना फटका बसला आहे.

संयुक्त राष्ट्रे : भारत, बांगलादेश, नेपाळ आणि म्यानमारमध्ये मुसळधार पावसाने आलेल्या पुरात ६०० लोकांचा मृत्यू झाला, तर २.५ कोटी लोकांना या पुराचा फटका बसला आहे. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनियो गुतारेस यांचे उप प्रवक्ते फरहान हक यांनी सांगितले की, या पुरामुळे पाच लाखांपेक्षा अधिक लोक विस्थापित झाले आहेत.हक यांनी सांगितले की, भारत, बांगलादेश, नेपाळ आणि म्यानमारमध्ये काही भागांत मुसळधार पावसाने पूर आला आहे. यामुळे अडीच कोटी लोक विस्थापित झाले आहेत. भारतात आसाम, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये युनिसेफ राज्य सरकारांच्या मदतीने समन्वयासाठी प्रयत्न करीत आहे.संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीने म्हटले आहे की, नुकसान झालेले रस्ते, पूल आणि रेल्वे ट्रॅक यामुळे अनेक भागांत अद्याप पोहोचणे शक्य होत नाही. मुलांसाठी सर्वात मोठी गरज स्वच्छ पाणी, आजार रोखण्यासाठीच्या वस्तू, खाद्यपदार्थांचा पुरवठा आणि विस्थापित ठिकाणी मुलांसाठी स्वच्छ जागा हे आवश्यक आहे. भारतात आसाम, बिहार, उत्तर प्रदेशच्या काही भागांत आणि अन्य पूर्वोत्तर राज्यांत एक कोटीपेक्षा अधिक लोकांना याचा फटका बसला आहे. यात ४३ लाख मुले आहेत. पुरामुळे परिस्थिती आणखी बिघडली, तर या आकड्यांमध्ये वाढ होऊ शकते. एकट्या आसाममध्ये पुरामुळे जवळपास २००० शाळांचे नुकसान झाले आहे. (वृत्तसंस्था)तीन देशांत ९३ मुलांचा मृत्यूबांगलादेशमध्ये पुरामुळे ४० लाख लोकांना फटका बसला आहे. म्यानमारमध्ये पुरामुळे ४० हजार लोक विस्थापित झाले आहेत. मागील आठवड्यात संयुक्त राष्ट्रांच्या चिल्ड्रन एजन्सीने युनिसेफने सांगितले होते की, नेपाळ, भारत आणि बांगलादेशात पुरामुळे ९३ मुलांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊस