शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

चीनला थेट धमकी... हा २०२० मधील भारत आहे १९६२ चा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 07:24 IST

मंत्री रविशंकर प्रसाद यांची चीनला धमकी

नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात लडाख सीमेवर वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी चीनला इशारा दिला आहे. चीनने हे लक्षात ठेवावे की, आता २०२० आहे १९६२ नाही. आज भारताचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या धाडसी नेतृत्वाकडे आहे. भारताकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांना उरी आणि बालकोटमध्ये काय अवस्था झाली ती पाहावी असे त्यांनी सांगितले.

रविशंकर प्रसाद हिमाचल प्रदेशात जनसंवाद व्हर्चुअल रॅलीला संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले की, भारत शांततापूर्ण मार्गाने वादावर तोडगा काढेल. पण आज कोणीही भारताकडे डोळे वटारून पाहू शकत नाही. आज २०२० चा भारत आहे, १९६२ चा नाही, भारताचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात आहे, काँग्रेस नेत्यांच्या हातात नाही, असा टोला त्यानी काँग्रेसला लगावला. भारताला १९६२ च्या लढाईत चीनकडून हार पत्करावी लागली होती. चीनच्या सरकारी वृत्तपत्राने लडाखमध्ये सुरु असलेल्या भारत चीन यांच्या सैन्यातील तणावावर भारताला १९६२ च्या युद्धाची आठवण करुन दिली. दोन्ही देशाच्या पातळीवर लाइन आॅफ एक्चुअल कंट्रोलवर तणाव कमी करण्यासाठी सैन्यस्तरीय चर्चा सुरु आहे. ६ जून रोजी लेफ्टनंट जनरल पातळीवर चीनची आक्रमकता कमी झाली पण ते जुन्या स्थितीत परतण्याच्या मानसिकतेत नाही. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सरकारला चीन सीमेवर स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते.

टॅग्स :chinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदी