शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
2
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
3
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
4
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
5
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
6
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
7
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
8
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
9
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
10
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
11
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
12
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
13
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
14
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
15
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
16
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
17
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारने लोकसभेत दिली 'डेटलाइन'
18
करून दाखवलं! हात गमावले पण 'तो' खचला नाही; पायांनी रचला इतिहास, ११ गोल्डसह १८ मेडल्स
19
ऑस्ट्रेलियन तरुणीवर सपासप वार, वाळूत अर्ध्यापर्यंत पुरलं, भारतात पळून आला; पण अखेर सापडलाच!
20
ट्रेनमध्ये भीक मागत होती अनाथ मुलगी; गोलूने वाईट नजरेपासून वाचवलं, घरी आणलं अन् लग्नच केलं
Daily Top 2Weekly Top 5

इम्रान खानचा विजय भारतासाठी अडचणीचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 01:19 IST

अतिरेकी व कट्टरवाद्यांशी संबंध; लष्कर व आयएसआयचाही वाढणार दबाव

इस्लामाबाद/ नवी दिल्ली : कट्टरवादी व अतिरेकी गटांशी संबध असल्याने पाकिस्तानात तालिबान खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इम्रान खानने भारताशी संबंध सुधारावेत अशी इच्छा इम्रान खान यांनी व्यक्त केली असली तरी त्याचे विजयी होणे भारताला अडचणीचेच ठरण्याची शक्यता आहे. ते पंतप्रधान झाले तरी पाकिस्तानवर तेथील लष्कर तसेच आयएसआय ही गुप्तचर संघटना यांचा दबाव असेल, असे भारत व पाकिस्तानातील तज्ज्ञांचे मत आहे.काश्मीर प्रश्न हा दोन्ही देशांतील महत्त्वाचा मुद्दा असून त्यावर चर्चेद्वारे तोडगा काढण्याची पाकिस्तानची भूमिका आहे, असे सांगतानाच, गेल्या ३० वर्षांत काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने मोठ्या प्रमाणावर मानवी हक्कांचा भंग केला आहे असाही आरोप त्यांनी केला. गरिबी व दारिद्र्य ही पाकिस्तानसमोरील सर्वात मोठी आव्हाने असून, ती सोडवण्यासाठी आमच्यापुढे चीन हा आदर्श आहे, असे मत त्याने व्यक्त केले. जिना यांच्या स्वप्नातील पाकिस्तान निर्माण करण्यासाठी आपण झटणार आहोत असेही ते म्हणाले.भारतीय प्रसार माध्यमांनी माझे वाईट पद्धतीने चित्रण केले. त्याचे मला दु:ख आहे, मला भारताशी चांगले संबंध हवेत आणि पाकिस्तान व भारत यांच्यातील व्यापार वाढावा, अशी माझी इच्छा आहे, असे ते इम्रान खान म्हणाले. मात्र नवाज शरीफ हे भारताबाबत सौम्य भूमिका घेतात, असा आरोप ते करीत. त्यांच्या पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या असल्या तरी निवडणुकांत गैरप्रकार झाल्यानेच हे घडल्याचा आरोप नवाज शरीफ यांच्या पक्षाने केले. पण गैरप्रकारांचे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले. (वृत्तसंस्था)नवाज शरीफ व त्यांची कन्या मरियम तुरुंगात आहेत. आपण तुरुंगात असल्याचा फायदा आपल्या पक्षाला मिळेल, हा त्यांचा अंदाज पूर्णपणे चुकला आहे. उलट इम्रान खान सत्तेत आल्यास त्यांच्या अडचणी वाढतील.कट्टरवाद्यांना शिकवला धडामुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याचे पाठबळ असलेली अल्ला हो अकबर तहरीक व बंदी घातलेल्या इतर संघटना तसेच दहशतवादी, कट्टरपंथी विचारांची मंडळी पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांच्या रिंगणात उतरली होती. पण त्यांना मतदारांनी अजिबात थारा दिला नाही.दहशतवादी गटाशी संबंधित असलेल्या एकालाही मतदारांनी विजयी केले नाही. कट्टरपंथी इस्लामी गट या निवडणुकांत उतरल्याने चिंता व्यक्त होत होती. पण आता या सर्व गटांना व व्यक्तींना पाकिस्तानातील मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली.सईदचा मुलगा, नातूही पराभूतहाफिज सईदने आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक सभा घेतल्या. पण त्याचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. सईदचा मुलगा हाफिज तल्हा सईद व नातू खालिद वालिग्द पराभूत झाले. तहरीक-ए-लाबैक पाकिस्तान या सुन्नी संघटनेनेही उभे केलेले १०० उमेदवार विजयाच्या जवळपासही फिरकू शकले नाहीत. मुत्तहिदा मजलिस-ए-अम्ल या काही पक्षांच्या आघाडीच्या उमेदवारांपैकी बहुतेक जणांना पराभव पाहावा लागला.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistan Electionsपाकिस्तान निवडणूकhafiz saedहाफीज सईदIndiaभारत