शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

इम्रान खानचा विजय भारतासाठी अडचणीचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 01:19 IST

अतिरेकी व कट्टरवाद्यांशी संबंध; लष्कर व आयएसआयचाही वाढणार दबाव

इस्लामाबाद/ नवी दिल्ली : कट्टरवादी व अतिरेकी गटांशी संबध असल्याने पाकिस्तानात तालिबान खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इम्रान खानने भारताशी संबंध सुधारावेत अशी इच्छा इम्रान खान यांनी व्यक्त केली असली तरी त्याचे विजयी होणे भारताला अडचणीचेच ठरण्याची शक्यता आहे. ते पंतप्रधान झाले तरी पाकिस्तानवर तेथील लष्कर तसेच आयएसआय ही गुप्तचर संघटना यांचा दबाव असेल, असे भारत व पाकिस्तानातील तज्ज्ञांचे मत आहे.काश्मीर प्रश्न हा दोन्ही देशांतील महत्त्वाचा मुद्दा असून त्यावर चर्चेद्वारे तोडगा काढण्याची पाकिस्तानची भूमिका आहे, असे सांगतानाच, गेल्या ३० वर्षांत काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने मोठ्या प्रमाणावर मानवी हक्कांचा भंग केला आहे असाही आरोप त्यांनी केला. गरिबी व दारिद्र्य ही पाकिस्तानसमोरील सर्वात मोठी आव्हाने असून, ती सोडवण्यासाठी आमच्यापुढे चीन हा आदर्श आहे, असे मत त्याने व्यक्त केले. जिना यांच्या स्वप्नातील पाकिस्तान निर्माण करण्यासाठी आपण झटणार आहोत असेही ते म्हणाले.भारतीय प्रसार माध्यमांनी माझे वाईट पद्धतीने चित्रण केले. त्याचे मला दु:ख आहे, मला भारताशी चांगले संबंध हवेत आणि पाकिस्तान व भारत यांच्यातील व्यापार वाढावा, अशी माझी इच्छा आहे, असे ते इम्रान खान म्हणाले. मात्र नवाज शरीफ हे भारताबाबत सौम्य भूमिका घेतात, असा आरोप ते करीत. त्यांच्या पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या असल्या तरी निवडणुकांत गैरप्रकार झाल्यानेच हे घडल्याचा आरोप नवाज शरीफ यांच्या पक्षाने केले. पण गैरप्रकारांचे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले. (वृत्तसंस्था)नवाज शरीफ व त्यांची कन्या मरियम तुरुंगात आहेत. आपण तुरुंगात असल्याचा फायदा आपल्या पक्षाला मिळेल, हा त्यांचा अंदाज पूर्णपणे चुकला आहे. उलट इम्रान खान सत्तेत आल्यास त्यांच्या अडचणी वाढतील.कट्टरवाद्यांना शिकवला धडामुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याचे पाठबळ असलेली अल्ला हो अकबर तहरीक व बंदी घातलेल्या इतर संघटना तसेच दहशतवादी, कट्टरपंथी विचारांची मंडळी पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांच्या रिंगणात उतरली होती. पण त्यांना मतदारांनी अजिबात थारा दिला नाही.दहशतवादी गटाशी संबंधित असलेल्या एकालाही मतदारांनी विजयी केले नाही. कट्टरपंथी इस्लामी गट या निवडणुकांत उतरल्याने चिंता व्यक्त होत होती. पण आता या सर्व गटांना व व्यक्तींना पाकिस्तानातील मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली.सईदचा मुलगा, नातूही पराभूतहाफिज सईदने आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक सभा घेतल्या. पण त्याचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. सईदचा मुलगा हाफिज तल्हा सईद व नातू खालिद वालिग्द पराभूत झाले. तहरीक-ए-लाबैक पाकिस्तान या सुन्नी संघटनेनेही उभे केलेले १०० उमेदवार विजयाच्या जवळपासही फिरकू शकले नाहीत. मुत्तहिदा मजलिस-ए-अम्ल या काही पक्षांच्या आघाडीच्या उमेदवारांपैकी बहुतेक जणांना पराभव पाहावा लागला.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistan Electionsपाकिस्तान निवडणूकhafiz saedहाफीज सईदIndiaभारत