शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

'जैश' म्हणतं, आम्ही केला हल्ला... इम्रान खान भारताला म्हणतात, पुरावे द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 14:22 IST

पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ठळक मुद्दे भारतावर हल्ला करून पाकिस्तानला काय फायदा होणार ?पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात नाही, कुठलेही पुरावे नसताना भारत पाकिस्तानवर आरोप करत सुटला आहे.भारतानं पहिल्यांदा आम्हाला पुरावे द्यावेत, मग आम्ही कारवाई करू, असंही इम्रान खान म्हणाले आहेत.

इस्लामाबाद- पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवण्याऐवजी त्यांनी भारतालाच खडे बोल सुनावले आहेत. भारतावर हल्ला करून पाकिस्तानला काय फायदा होणार ?, पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात नाही, कुठलेही पुरावे नसताना भारत पाकिस्तानवर आरोप करत सुटला आहे. भारतानं पहिल्यांदा आम्हाला पुरावे द्यावेत, मग आम्ही कारवाई करू, असंही इम्रान खान म्हणाले आहेत.तसेच दहशतवादाच्या मुद्द्यावर आमची भारताबरोबर चर्चेची तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. परंतु जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनंच स्वतः पुलवाम्यात घडवून आणलेल्या हल्ल्याची कबुली दिली आहेत. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तरीही पाकिस्तानचे पंतप्रधान यासंदर्भात भारताकडे पुरावे मागत असल्यानं देशपातळीवरून संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानच्या धर्तीवरूनच दहशतवाद पोसला जातोय. दहशतवाद्यांना पाकिस्तान हा देशच आश्रय देत असल्याचं नेहमीच सिद्ध झालं आहे. पुलवामा हल्ल्याचा साधा निषेध नोंदवण्यापेक्षा इम्रान खान यांनी भारतालाच धमकावण्याचा प्रयत्न केला. भारतात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे पाकिस्तानवर हल्ला झाल्यास राजकीय लाभ मिळू शकतो.मात्र पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तानही त्याला प्रत्युत्तर देईल, अशी धमकी इम्रान खान यांनी दिली. पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर चौफेर दबाव आला असून, भारताकडूनही आक्रमक कारवाईसाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बाळगलेले मौन सोडत आज देशाला संबोधित केले. या संबोधनामध्ये इम्रान खान यांनी पुलवामा हल्लात पाकिस्तानचा हात असल्याचा दावा फेटाळून लावला. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाImran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी