शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

Imran Khan, Pakistan: पाकिस्तानात शरीफ यांचे सत्तेत येणे, इम्रान खानचे जाणे, भारतासाठी किती फायद्याचे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 08:26 IST

Imran Khan's Government Falls After Midnight No-Trust Vote: इम्रान खान यांनी गेल्या काही वर्षांपासून भारताविरोधात गरळ ओकली होती. सत्तेत आल्यावरही त्यांनी ते सुरुच ठेवले होते. परंतू सत्ता जाताना त्यांनी भारतावर स्तुतीसुमने उधळली होती.

अन्य पंतप्रधानांप्रमाणे क्रिकेटपट्टू इम्रान खान देखील पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची इनिंग पूर्ण करू शकले नाहीत. पाकिस्तानच्या राजकारणात रविवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. मध्यरात्र उलटून गेल्यावर तिथे मोठमोठ्या घडामोडी घडल्या आहेत. सरकारशी संबंधीत एकाही व्यक्तीने देश न सोडण्याचे आदेश निघाले आहेत. एअरपोर्ट अलर्टवर ठेवण्यात आले आहेत. असे असताना पुन्हा शरीफांच्या हातात सत्तेचा चेंडू गेल्याने आता भारतासाठी कितपत फायद्याचे ठरू शकेल, यावर चर्चा होऊ लागली आहे. 

342 सदस्यांच्या नॅशनल असेम्ब्लीमध्ये इम्रान सरकारविरोधात 174 मते पडली. अगदी काठावर मते पडली असली तरी इम्रान यांची खूर्ची गेली आहे. या सत्तापरिवर्तनाचे अवघे जग साक्ष ठरले आहे. नवाझ शरीफ पंतप्रधान असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसाला अचानक पाकिस्तानात हजेरी लावली होती. आता त्यांचे भाऊ शाहबाज शरीफ पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. मतदानावेळी इम्रान खान संसदेत गैरहजर होते. आज दुपारी २ वाजता नवीन पंतप्रधान निवडला जाणार आहे. 

इम्रान खान यांनी गेल्या काही वर्षांपासून भारताविरोधात गरळ ओकली होती. सत्तेत आल्यावरही त्यांनी ते सुरुच ठेवले होते. परंतू सत्ता जाताना त्यांनी भारतावर स्तुतीसुमने उधळली होती. याचबरोबर अमेरिकेला वाकड्यात घेताना पाकिस्तानी सैन्यावरदेखील प्रश्न उपस्थित केले होते. यामुळे शरीफांनादेखील या पावलाचा त्रास होणार आहे. इम्रान खान यांनी नवी दिल्लीशी चर्चेचे मार्ग बंद केले होते. काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यावर तर व्यापारी संबंधही संपविले होते. भाजपा आणि आरएसएसवर त्यांनी टीका सुरुच ठेवली होती. आता त्यांचे सत्तेतून बाहेर गेल्याने दिल्ली-इस्लामाबाद मधील चर्चेचा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. 

चार वर्षांपूर्वी शरीफ यांना सत्ता गमवावी लागली होती. शाहबाज यांच्या रुपाने आता पुन्हा सत्तेत वापसी झाली आहे. इम्रान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. नवाज शरीफ लंडनमध्ये आश्रयाला आहेत. मात्र, शाहबाज यांनी अविश्वास प्रस्तावावेळी त्यांची सतत आठवण काढली. ते भारताशी चांगले संबंध ठेवण्यासाठी प्रयत्नशील होते, असे सांगितले जाते.  

टॅग्स :Imran Khanइम्रान खानNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान