शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

Imran Khan, Pakistan: पाकिस्तानात शरीफ यांचे सत्तेत येणे, इम्रान खानचे जाणे, भारतासाठी किती फायद्याचे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 08:26 IST

Imran Khan's Government Falls After Midnight No-Trust Vote: इम्रान खान यांनी गेल्या काही वर्षांपासून भारताविरोधात गरळ ओकली होती. सत्तेत आल्यावरही त्यांनी ते सुरुच ठेवले होते. परंतू सत्ता जाताना त्यांनी भारतावर स्तुतीसुमने उधळली होती.

अन्य पंतप्रधानांप्रमाणे क्रिकेटपट्टू इम्रान खान देखील पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची इनिंग पूर्ण करू शकले नाहीत. पाकिस्तानच्या राजकारणात रविवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. मध्यरात्र उलटून गेल्यावर तिथे मोठमोठ्या घडामोडी घडल्या आहेत. सरकारशी संबंधीत एकाही व्यक्तीने देश न सोडण्याचे आदेश निघाले आहेत. एअरपोर्ट अलर्टवर ठेवण्यात आले आहेत. असे असताना पुन्हा शरीफांच्या हातात सत्तेचा चेंडू गेल्याने आता भारतासाठी कितपत फायद्याचे ठरू शकेल, यावर चर्चा होऊ लागली आहे. 

342 सदस्यांच्या नॅशनल असेम्ब्लीमध्ये इम्रान सरकारविरोधात 174 मते पडली. अगदी काठावर मते पडली असली तरी इम्रान यांची खूर्ची गेली आहे. या सत्तापरिवर्तनाचे अवघे जग साक्ष ठरले आहे. नवाझ शरीफ पंतप्रधान असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसाला अचानक पाकिस्तानात हजेरी लावली होती. आता त्यांचे भाऊ शाहबाज शरीफ पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. मतदानावेळी इम्रान खान संसदेत गैरहजर होते. आज दुपारी २ वाजता नवीन पंतप्रधान निवडला जाणार आहे. 

इम्रान खान यांनी गेल्या काही वर्षांपासून भारताविरोधात गरळ ओकली होती. सत्तेत आल्यावरही त्यांनी ते सुरुच ठेवले होते. परंतू सत्ता जाताना त्यांनी भारतावर स्तुतीसुमने उधळली होती. याचबरोबर अमेरिकेला वाकड्यात घेताना पाकिस्तानी सैन्यावरदेखील प्रश्न उपस्थित केले होते. यामुळे शरीफांनादेखील या पावलाचा त्रास होणार आहे. इम्रान खान यांनी नवी दिल्लीशी चर्चेचे मार्ग बंद केले होते. काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यावर तर व्यापारी संबंधही संपविले होते. भाजपा आणि आरएसएसवर त्यांनी टीका सुरुच ठेवली होती. आता त्यांचे सत्तेतून बाहेर गेल्याने दिल्ली-इस्लामाबाद मधील चर्चेचा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. 

चार वर्षांपूर्वी शरीफ यांना सत्ता गमवावी लागली होती. शाहबाज यांच्या रुपाने आता पुन्हा सत्तेत वापसी झाली आहे. इम्रान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. नवाज शरीफ लंडनमध्ये आश्रयाला आहेत. मात्र, शाहबाज यांनी अविश्वास प्रस्तावावेळी त्यांची सतत आठवण काढली. ते भारताशी चांगले संबंध ठेवण्यासाठी प्रयत्नशील होते, असे सांगितले जाते.  

टॅग्स :Imran Khanइम्रान खानNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान