शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

RSSची तुलना हिटलरच्या नाझी पक्षाशी; इम्रान खान यांनी तोडले तारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 17:30 IST

RSSच्या हिंदू विचारसरणीची आम्हाला भीती वाटतेय, कारण संघाची विचारसरणी ही नाझींच्या विचारांनी प्रेरित झालेली दिसतेय.

मुझफ्फराबादः भारतातल्या मोदी सरकारनं कलम 370 रद्द करून जम्मू-काश्मीरचं दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन केलं. त्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला असून, भारताविरोधात आगपाखड करत आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवरही काश्मीरच्या मुद्दा उपस्थित करत दाद मागण्याचा प्रयत्न करत आहे. कलम 370 रद्द करण्यावरून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान भाजपा आणि आरएसएसवर टीका करत सुटले आहेत. RSSच्या हिंदू विचारसरणीची आम्हाला भीती वाटतेय, कारण संघाची विचारसरणी ही नाझींच्या विचारांनी प्रेरित झालेली दिसतेय.नाझी विचारसरणीप्रमाणे असलेल्या संघाच्या विचारसरणीमुळेच आज काश्मीरचा प्रश्न चिघळला. संघाच्या विचारधारेमुळे भारतातील मुस्लिम उद्ध्वस्त होतील आणि त्यानंतर पाकिस्तानला टार्गेट करण्यात येईल. हा सर्व प्रकार म्हणजे हिटलरच्या विचारांची पुनरावृत्ती आहे. काश्मीरचा नकाशा बदलण्यासाठी जातीय हिंसाचार केला जातोय. ज्या प्रमाणे हिटलरच्या नरसंहारावर जगातले देश गप्प राहिले होते, त्याप्रमाणे भारताच्या या कृतीवरही आज जग गप्प असल्याची टीकाही इम्रान खान यांनी केली आहे.  मोदी सरकारने संविधानातील 370 कलम हटवून जम्मू आणि काश्मीरचा स्वायत्त राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. मोदींनी जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान भारतावर आगपाखड करत सुटला आहे. कलम 370 रद्द करणं ही भारताची घोडचूकच आहे. काश्मीरमधून पर्यटकांना बाहेर हाकलून सैन्य पाठवून भारतानं काय प्राप्त केलं आहे. मोदींनी ही घोडचूक केली आहे.मोदी जो खेळ खेळत आहे, तो पुढे जाऊन भारताला महागात पडणार आहे. काश्मिरी लोकांसोबत मोदींनी विश्वासघात केला आहे. नेहरूंनी काश्मिरी लोकांना त्यांच्या अधिकारांमध्ये कोणीही हस्तक्षेप करणार नसल्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु मोदी सरकार या उलट कृत्य करत सुटलं आहे. मोदी सरकारला मानवी मूल्य, आंतरराष्ट्रीत पातळीवरचा विरोध, शिमला करार याची काहीही पर्वा नाही. यांची विचारधारा नाझींसारखी झाली आहे. आरएसएसची विचारधाराही नाझींच्या विचारधारेच्या मार्गानं जात असल्याची टीकाही इम्रान खान यांनी केली आहे. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ