शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 11:00 IST

पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढलेला असताना पाकिस्तानी नेत्याने केलेल्या विधानाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

India-Pak Tension: पहलगाम हल्ल्यानंतर भारतपाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे संपूर्ण पाकिस्तान घाबरला आहे. पाकिस्तानात सगळीकडे भीतीचे वातावरण आहे. सामान्य जनतेपासून ते सरकार आणि राजकारण्यांपर्यंत, सर्वजण भीतीच्या वातावरणात जगत आहेत. ही दहशत किती आहे याचे एक उदाहरण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सभेचे सदस्य शेर अफजल खान मारवत यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक भूमिका घेत अनेक निर्बंध लादले आहेत. भारताची तयारी पाहून तिथले सरकार आणि नेते चिंतेत पडले असून ते आता ते देश सोडून जाण्याबद्दल बोलत आहेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाची भीती वाढताना दिसत आहे. अशातच पाकिस्तानी खासदार आणि इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे नेते शेर अफजल खान मारवत यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका पाकिस्तानी रिपोर्टरशी बोलत आहे. 

पत्रकाराने मारवतला यांना विचारले की, जर युद्ध वाढले तर तुम्ही बंदूक घेऊन सीमेवर जाल का? त्यावर उत्तर देताना, मारवत यांनी असे काही म्हटलं की ज्यामुळे पाकिस्तानची मान शरमेने झुकली आहे. पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना मारवत यांनी "नाही, जर युद्ध वाढले तर मी इंग्लंडला निघू जाई," असं म्हटलं.

यानंतर पत्रकाराने दुसरा प्रश्न विचारला की, अशावेळी परिस्थिती सामान्य होण्यासाठी पंतप्रधा मोदींनी थोडे मागे हटावे असे तुम्हाला वाटत नाही का? यावर उत्तर देताना शेर अफझल खान मारवत यांनी, "मोदी माझ्या मावशीचा मुलगा आहे का की ते माझ्या शब्दांवर माघार घेतील?" असं म्हटलं.

शेर अफजल खान मारवत यांचे हे विधान काही तासांतच सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर नेटकऱ्यांनी पाकिस्तानच्या राजकारणावर टीका करत जेव्हा नेत्यांना त्यांच्या सैन्यावर विश्वास नाही, तर सामान्य लोकांनी काय अपेक्षा करावी? असं म्हटलं आहे. शेर अफजल खान मारवत हे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयशी संबंधित आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी काळात त्यांनी पक्ष आणि त्यांच्या नेतृत्वावर टीका केली होती. यामुळे संतप्त होऊन इम्रान खान यांनी त्यांना पक्षातील अनेक महत्त्वाच्या पदांवरून काढून टाकले.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी