शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
2
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
3
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
4
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
5
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
6
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
7
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
8
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
9
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
10
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
11
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
12
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
13
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
14
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
15
Car Offers: निसान मॅग्नाइट, होंडा एलिव्हेटसह 'या' लोकप्रिय मॉडेल्सवर ३.२५ लाखांपर्यंत सूट!
16
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
17
पोलिसांनी लाईनमनला केली अटक, संतापलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी असा घेतला बदला, अखेरीस...
18
संतापजनक! "आधी ४ लाख भरा, मग मृतदेह न्या"; बिल पाहून नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप
19
'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक
20
Travel : भारतातून १००००० रुपये घेऊन थायलंड ट्रिपला निघताय? राहणं, खाणं आणि फिरणं एकूण किती होईल खर्च?
Daily Top 2Weekly Top 5

"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 11:00 IST

पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढलेला असताना पाकिस्तानी नेत्याने केलेल्या विधानाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

India-Pak Tension: पहलगाम हल्ल्यानंतर भारतपाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे संपूर्ण पाकिस्तान घाबरला आहे. पाकिस्तानात सगळीकडे भीतीचे वातावरण आहे. सामान्य जनतेपासून ते सरकार आणि राजकारण्यांपर्यंत, सर्वजण भीतीच्या वातावरणात जगत आहेत. ही दहशत किती आहे याचे एक उदाहरण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सभेचे सदस्य शेर अफजल खान मारवत यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक भूमिका घेत अनेक निर्बंध लादले आहेत. भारताची तयारी पाहून तिथले सरकार आणि नेते चिंतेत पडले असून ते आता ते देश सोडून जाण्याबद्दल बोलत आहेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाची भीती वाढताना दिसत आहे. अशातच पाकिस्तानी खासदार आणि इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे नेते शेर अफजल खान मारवत यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका पाकिस्तानी रिपोर्टरशी बोलत आहे. 

पत्रकाराने मारवतला यांना विचारले की, जर युद्ध वाढले तर तुम्ही बंदूक घेऊन सीमेवर जाल का? त्यावर उत्तर देताना, मारवत यांनी असे काही म्हटलं की ज्यामुळे पाकिस्तानची मान शरमेने झुकली आहे. पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना मारवत यांनी "नाही, जर युद्ध वाढले तर मी इंग्लंडला निघू जाई," असं म्हटलं.

यानंतर पत्रकाराने दुसरा प्रश्न विचारला की, अशावेळी परिस्थिती सामान्य होण्यासाठी पंतप्रधा मोदींनी थोडे मागे हटावे असे तुम्हाला वाटत नाही का? यावर उत्तर देताना शेर अफझल खान मारवत यांनी, "मोदी माझ्या मावशीचा मुलगा आहे का की ते माझ्या शब्दांवर माघार घेतील?" असं म्हटलं.

शेर अफजल खान मारवत यांचे हे विधान काही तासांतच सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर नेटकऱ्यांनी पाकिस्तानच्या राजकारणावर टीका करत जेव्हा नेत्यांना त्यांच्या सैन्यावर विश्वास नाही, तर सामान्य लोकांनी काय अपेक्षा करावी? असं म्हटलं आहे. शेर अफजल खान मारवत हे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयशी संबंधित आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी काळात त्यांनी पक्ष आणि त्यांच्या नेतृत्वावर टीका केली होती. यामुळे संतप्त होऊन इम्रान खान यांनी त्यांना पक्षातील अनेक महत्त्वाच्या पदांवरून काढून टाकले.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी