शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

POK वर मंत्री एस जयशंकर यांचं मोठं विधान; पाकिस्तानी पत्रकाराची बोलतीच बंद, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 10:12 IST

पाकिस्तानकडे काश्मीरचा जो भाग आहे, तो त्याने चोरी केला आहे असं सांगत जयशंकर यांनी काश्मीरमध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन होतंय या आरोपाचाही समाचार घेतला

लंडन - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील काश्मीर वादाचा मुद्दा अनेकदा पाकिस्तानकडून जागतिक व्यासपीठावर मांडण्याचा प्रयत्न केला जातो. सध्या भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यूके दौऱ्यावर गेलेत. यावेळी काश्मीरबाबत पाकिस्तानच्या पत्रकाराने जयशंकर यांना प्रश्न विचारला असता त्यावर जयशंकर यांनी दिलेल्या उत्तराने पत्रकाराची बोलती बंद झाली. पाकिस्तानने जर पीओकेवरील ताबा काढला तर काश्मीर प्रश्न सुटेल असं एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. लंडनच्या थिंकटँक हाऊसमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

या कार्यक्रमात पाकिस्तानी पत्रकार निसालने विचारलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचे संबंध वापरून काश्मीर समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू शकतात का, त्यावर एस जयशंकर यांनी एका वाक्यात उत्तर दिले. जर पाकिस्तानने काश्मीरातील एका भागावरील ताबा सोडला तर समस्याच राहणार नाही असं भारतीय परराष्ट्र मंत्र्‍यांनी म्हटलं. ते पुढे म्हणाले, भारताकडून काश्मीरमधील सर्व गोष्टी ठीक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काश्मीरचा विशेष राज्य दर्जा संपवून कलम ३७० हटवणं हे पहिले पाऊल होते. काश्मीरला आर्थिक सक्षम करत सामाजिक न्याय बहाल करणे दुसरं पाऊल होते. जास्त मतदानासह निवडणूक घेणे तिसरं पाऊल होते. आता काश्मीरचा तो भाग ज्यावर पाकिस्तानचा बेकायदेशीर ताबा आहे ते परत घेणे बाकी आहे. जेव्हा ते होईल तेव्हा समस्या सुटेल असं त्यांनी स्पष्ट सुनावले.

तसेच पाकिस्तानकडे काश्मीरचा जो भाग आहे, तो त्याने चोरी केला आहे असं सांगत जयशंकर यांनी काश्मीरमध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन होतंय या आरोपाचाही समाचार घेतला. आम्हाला राजकीय कारणामुळे या मुद्द्यावर टीकेचा सामना करावा लागतो. काही परिस्थितीत सुधारणा गरजेची असते कारण भारतात मानवाधिकार रेकॉर्ड पाहिला तर तो जगातील इतर देशांच्या तुलनेत चांगला आहे. भारतात मानवाधिकार उल्लंघनाबाबत जी चिंता व्यक्त केली जाते ती चुकीची आहे असंही परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सांगितले.

दरम्यान, चीनसोबतच्या संबंधावर बोलताना दोन्ही देशाचा इतिहास जुना आहे. ज्यात वेळोवेळी बऱ्याचदा चढ-उतार आलेत. आज दोन्ही देश चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. मुख्य मुद्दा हा आहे की, हे संबंध स्थिर आणि समतोल कसे बनवले जातील. आम्हाला स्थिर संबंध हवेत, ज्यातून आमच्या हिताचा सन्मान केला जाईल असं एस जयशंकर यांनी म्हटलं.

पाकिस्तानला भारताचे खडे बोल

काश्मीर प्रश्नावरून एस जयशंकर यांनी कठोर भूमिका घेतली. मागील वर्षीही एस जयशंकर यांनी म्हटलं होतं, पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर हा भारताचा भाग आहे. पीओके पुन्हा भारताला मिळावा यासाठी भारतातील प्रत्येक राजकीय पक्ष कटिबद्ध आहे. ही आमची राष्ट्रीय वचनबद्धता आहे असंही एस जयशंकर यांनी सांगितले.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर