शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

'ऑपरेशन सिंदूर आठवडाभर सुरू ठेवलं असतं तर...', बलुचिस्तानच्या नेत्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 14:34 IST

मीर यार बलोच यांनी या पत्रात पाकिस्तानने १९९८ मध्ये बलुचिस्तानमध्ये केलेल्या अणु चाचणीला नरसंहाराची सुरुवात म्हटले आहे.

बलुचिस्तानचे मानवाधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार मीर यार बलोच यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला. मीर यार बलोच यांनी या पत्रात पाकिस्तानने १९९८ मध्ये बलुचिस्तानमध्ये केलेल्या अणु चाचणीला नरसंहाराची सुरुवात म्हटले आहे. तर, पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त करण्यात यावीत, अशी मनीषा देखील त्यांनी बोलून दाखवली. तर, भारताने बलुचिस्तानच्या या स्वातंत्र्यलढ्यात साथ द्यावी, अशी विनंती देखील केली.

मीर यार बलोच यांच्या या पत्राची सुरुवात पाकिस्तानने २८ मे १९९८ रोजी पाकिस्तानने बलुचिस्तानच्या चगईमध्ये केलेल्या अणुचाचणीचा उल्लेख करत केली. पाकिस्तानी लष्कराने नवाज शरीफ सरकारसोबत मिळून बलुचची जमीन उद्ध्वस्त केली. या ठिकाणी झालेल्या स्फोटांमुळे आजही चगई और रास कोह या भागांमध्ये स्फोटकांचा वायस येतो. या चाचणीमध्ये अनेकांची शेतजमीन नाहीशी झाली, तर अनेक पिढ्यांची मुले अपंग जन्माला आली.     

पाकिस्तानी लष्कर आतंकवादाचं जनक!या पत्रात, बलुच नेत्याने थेट पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयवर दहशतवादी संघटनांचे जनक असल्याचा आरोप केला. त्यांनी असा दावा केला की, आयएसआय दर महिन्याला एक नवीन दहशतवादी संघटना तयार करते आणि त्यांचा वापर भारत, अफगाणिस्तान, बलुचिस्तान, अगदी अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध करते. बलुच नेत्याने म्हटले की, "पाकिस्तान दहशतवादाचा जनक आहे. जोपर्यंत त्याची मुळे उखडली जात नाहीत, तोपर्यंत दहशतवाद संपणार नाही."

बलुचिस्तानचे सोने, तांबे, वायू, तेल आणि युरेनियम लुटून पाकिस्तान आपली कमकुवत अर्थव्यवस्था चालवत आहे आणि या पैशातून दहशतवादी संघटनांना निधी देत ​​आहे, असा आरोप बलुच नेत्याने केला. पत्रात चीनचाही उल्लेख आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, चीनने बलुचिस्तानात नौदल तळ आणि आशियातील सर्वात मोठे विमानतळ बांधले आहे. चीन पाकिस्तानच्या सैन्याला प्रत्येक पातळीवर पाठिंबा देत आहे.

आता भारतानेही आम्हाला पाठिंबा द्यावा!बलुच नेत्याने असा दावा केला की, जेव्हा भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले, तेव्हा बलुच लोकांनी त्यांना उघडपणे भारताला पाठिंबा दिला. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, जर ऑपरेशन सिंदूर आणखी एक आठवडा चालू राहिले असते, तर आज आपण एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारत आणि जगाशी बोलत असतो. पत्राच्या शेवटी त्यांनी पंतप्रधान मोदींना आवाहन केले आहे की, भारताने बलुचिस्तानशी अधिकृत संबंध प्रस्थापित करावेत आणि बलुचिस्तानचा दूतावास दिल्लीत स्थापित करावा.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPakistanपाकिस्तान