शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

'ऑपरेशन सिंदूर आठवडाभर सुरू ठेवलं असतं तर...', बलुचिस्तानच्या नेत्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 14:34 IST

मीर यार बलोच यांनी या पत्रात पाकिस्तानने १९९८ मध्ये बलुचिस्तानमध्ये केलेल्या अणु चाचणीला नरसंहाराची सुरुवात म्हटले आहे.

बलुचिस्तानचे मानवाधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार मीर यार बलोच यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला. मीर यार बलोच यांनी या पत्रात पाकिस्तानने १९९८ मध्ये बलुचिस्तानमध्ये केलेल्या अणु चाचणीला नरसंहाराची सुरुवात म्हटले आहे. तर, पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त करण्यात यावीत, अशी मनीषा देखील त्यांनी बोलून दाखवली. तर, भारताने बलुचिस्तानच्या या स्वातंत्र्यलढ्यात साथ द्यावी, अशी विनंती देखील केली.

मीर यार बलोच यांच्या या पत्राची सुरुवात पाकिस्तानने २८ मे १९९८ रोजी पाकिस्तानने बलुचिस्तानच्या चगईमध्ये केलेल्या अणुचाचणीचा उल्लेख करत केली. पाकिस्तानी लष्कराने नवाज शरीफ सरकारसोबत मिळून बलुचची जमीन उद्ध्वस्त केली. या ठिकाणी झालेल्या स्फोटांमुळे आजही चगई और रास कोह या भागांमध्ये स्फोटकांचा वायस येतो. या चाचणीमध्ये अनेकांची शेतजमीन नाहीशी झाली, तर अनेक पिढ्यांची मुले अपंग जन्माला आली.     

पाकिस्तानी लष्कर आतंकवादाचं जनक!या पत्रात, बलुच नेत्याने थेट पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयवर दहशतवादी संघटनांचे जनक असल्याचा आरोप केला. त्यांनी असा दावा केला की, आयएसआय दर महिन्याला एक नवीन दहशतवादी संघटना तयार करते आणि त्यांचा वापर भारत, अफगाणिस्तान, बलुचिस्तान, अगदी अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध करते. बलुच नेत्याने म्हटले की, "पाकिस्तान दहशतवादाचा जनक आहे. जोपर्यंत त्याची मुळे उखडली जात नाहीत, तोपर्यंत दहशतवाद संपणार नाही."

बलुचिस्तानचे सोने, तांबे, वायू, तेल आणि युरेनियम लुटून पाकिस्तान आपली कमकुवत अर्थव्यवस्था चालवत आहे आणि या पैशातून दहशतवादी संघटनांना निधी देत ​​आहे, असा आरोप बलुच नेत्याने केला. पत्रात चीनचाही उल्लेख आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, चीनने बलुचिस्तानात नौदल तळ आणि आशियातील सर्वात मोठे विमानतळ बांधले आहे. चीन पाकिस्तानच्या सैन्याला प्रत्येक पातळीवर पाठिंबा देत आहे.

आता भारतानेही आम्हाला पाठिंबा द्यावा!बलुच नेत्याने असा दावा केला की, जेव्हा भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले, तेव्हा बलुच लोकांनी त्यांना उघडपणे भारताला पाठिंबा दिला. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, जर ऑपरेशन सिंदूर आणखी एक आठवडा चालू राहिले असते, तर आज आपण एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारत आणि जगाशी बोलत असतो. पत्राच्या शेवटी त्यांनी पंतप्रधान मोदींना आवाहन केले आहे की, भारताने बलुचिस्तानशी अधिकृत संबंध प्रस्थापित करावेत आणि बलुचिस्तानचा दूतावास दिल्लीत स्थापित करावा.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPakistanपाकिस्तान