शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

मालदीवमध्ये भारतानं हस्तक्षेप केल्यास शांत नाही बसणार, चीनचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 23:40 IST

मालदीवमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर सध्या भारताजवळ फक्त चिंता व्यक्त करण्याशिवाय कोणताही उपाय नाही. परंतु भारताच्या भूमिकेवर चीन बारीक लक्ष ठेवून आहे.

नवी दिल्ली- मालदीवमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर सध्या भारताजवळ फक्त चिंता व्यक्त करण्याशिवाय कोणताही उपाय नाही. परंतु भारताच्या भूमिकेवर चीन बारीक लक्ष ठेवून आहे. भारताला ब-याचदा मालदीवपासून दूर राहण्याचा सल्ला देणा-या चीननं आता भारताला गंभीर इशारा दिला आहे. भारतानं मालदीवमध्ये लष्करी कारवाई केल्यास चीन त्यांना रोखण्यासाठी योग्य पाऊल उचलेल, असं चीननं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या संपादकीयमधून छापलं आहे.अर्थातच चीननं भारताला सैन्य कारवाईचा अप्रत्यक्षपणे इशारा देऊन टाकला आहे. तर दुसरीकडे मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद यांनी भारतानं 1988साला सारखं पाऊल उचलत सैन्य कारवाई केली पाहिजे, असा सल्ला दिला आहे. मात्र भारतानं अद्यापही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ग्लोबल टाइम्समधून छापलेल्या लेखात भारताला सबुरीला सल्ला देण्यात आला आहे. मालेमधली तणावपूर्ण स्थिती पाहता भारतानं संयम बाळगला पाहिजे. मालदीव सद्यस्थितीत अराजकतेचा सामना करतोय. मालदीवचा हा अंतर्गत प्रश्न आहे, त्यामुळे बाहेरील देशाच्या हस्तक्षेपाचा चीन कडाडून विरोध करेल. जर भारतानं तिथे सैन्य घुसवलेच तर त्यांना रोखण्यासाठी चीनला महत्त्वाचे पाऊल उचलावे लागेल, असंही लेखात नमूद करण्यात आलं आहे.काही भारतीय हे मालदीवमध्ये लष्करी हस्तक्षेप करावा, अशी वकिली करतायत. परंतु आंतरराष्ट्रीय दृष्ट्या हे योग्य नाही. सर्व देश स्वतःचं स्वातंत्र्य, सार्वभौमत्वाच्या सिद्धांताचा सन्मान करतात. मालदीवमधील परिस्थिती आणखी चिघळल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यावरचा तोडगा काढला जाईल. एकतर्फी सैन्य हस्तक्षेपानं जागतिक व्यवस्था बिघडवली आहे. ग्लोबल टाइम्सनं छापलेल्या लेखात 1988मधल्या मालदीवमधल्या भारताच्या हस्तक्षेपाचाही उल्लेख केला आहे. संपादकीयमध्ये लिहिलं आहे की, 1988मध्ये सरकारच्या विरोधातील काही बंडखोर लोक श्रीलंकेतून आलेल्या शस्त्रास्त्रधारी सैनिकांच्या मदतीनं सत्ता उलटवून टाकण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळी मालदीवचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अब्दुल गयूम यांच्या विनंतीवरून भारतानं 1600 सैनिकांना मालदीवमध्ये पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणली होती.काही लोकांच्या मते मालदीवच्या माध्यमातून भारतानं शक्तिप्रदर्शन केलं होतं. तर काहींना वाटतं भारतानं मालदीवमधलं तत्कालीन सरकार वाचवलं. सुरक्षेसाठी मालदीव भारतावर निर्भर राहत असल्यानं भारताला गर्विष्ठ केलं आहे. त्यामुळेच भारत मालदीवला स्वतःच्या प्रभावाखाली आणू इच्छितो. परंतु मालदीवला राजनैतिकदृष्ट्या भारत नेहमीच दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न करत असल्यानं मालदीवही वैतागला आहे. मालदीव हा चीन, अमेरिका, सौदी अरेबिया, पाकिस्तानकडे झुकत असल्यानं भारताचा तीळपापड होतोय, असंही लेखातून छापण्यात आलं आहे. ग्लोबल टाइम्सच्या लेखानुसार भारतावर आगपाखड करण्यात आली आहे.   

टॅग्स :chinaचीन