शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

'कुराण वाचताना मजा येत नाही', सलमान रश्‍दी यांचं वक्तव्य, पुन्हा एकदा इस्लामिक कट्टरपंथींच्या निशाण्यावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 15:34 IST

वादग्रस्त पुस्तक 'द सॅटनिक व्हर्सेस'चे लेखक सलमान रश्दी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. इस्लामचा पवित्र धर्मग्रंथ कुराणवर केलेल्या वक्तव्यामुळे सलमान रश्दी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कुराण वाचताना सुख किंवा आनंद होत असल्याचा अनुभव येत नाही असं सलमान रश्दी बोलले आहेत.

ठळक मुद्देकुराण वाचताना सुख किंवा आनंद होत असल्याचा अनुभव येत नाही असं सलमान रश्दी बोलले आहेतब्रिटनमधील चेलटेनहम लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंमी कुराण वाचू शकत नाही. कारण मला ते वाचताना आनंद मिळत नाही

मुंबई - वादग्रस्त पुस्तक 'द सॅटनिक व्हर्सेस'चे लेखक सलमान रश्दी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. इस्लामचा पवित्र धर्मग्रंथ कुराणवर केलेल्या वक्तव्यामुळे सलमान रश्दी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कुराण वाचताना सुख किंवा आनंद होत असल्याचा अनुभव येत नाही असं सलमान रश्दी बोलले आहेत. ब्रिटनमधील चेलटेनहम लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. ते बोलले की, 'मी कुराण वाचू शकत नाही. कारण मला ते वाचताना आनंद मिळत नाही'. 

'द सॅटनिक व्हर्सेस' पुस्तकानंतर इस्लामिक कट्टरपंथींच्या निशाण्यावर राहिलेले सलमान रुश्दी पुन्हा एकदा यानिमित्ताने चर्चेत आले असून, पुन्हा एकदा त्यांच्यावर टिकेची झोड उठण्याची शक्यता आहे. इस्लामिक कट्टरपंथींना अजून एक मुद्दा मिळाला असून ते पुन्हा एकदा निशाणा साधण्याची शक्यता आहे. 'द सॅटनिक व्हर्सेस' पुस्तकानंतर मुस्लिम समाजातील अनेकांनी संताप व्यक्त केला होता. इतकंच नाही तर त्यांच्या हत्येसाठी फतवाही जारी झाला होता. यामध्ये इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्लाह खुमैनी यांचा फतवा चर्चेत राहिला. त्यांनी सलमान रश्दी यांची हत्या करणा-याला लाखो डॉलर्स बक्षिस म्हणून देण्याची घोषणा केली होती. 

'द सॅटनिक व्हर्सेस या कादंबरीवर भारतानं मुस्लिम कट्टरपंथीयांच्या दबावाला बळी पडून 1988 मध्ये बंदी घातली होती. तेव्हा खुद्द रश्‍दी यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली होती. रश्‍दी यांनी त्या पत्रात म्हटलं होतं की, 'हे पुस्तक इस्लामवर टीका-टिपणी करणारं नाही, ही बाब आपण सा-यांनीच लक्षात घ्यायला हवी. हे पुस्तक आहे स्थलांतर, आपली दुभंगलेली व्यक्‍तिमत्त्वं, प्रेम, मृत्यू आणि लंडन व मुंबई ही दोन महानगरं... यांच्याविषयीचं.' पण रश्‍दी यांचा हा प्रतिवाद मान्य झाला नाही आणि या पुस्तकावर सरकारनं घातलेली बंदी सुरूच राहिली. 

ब्रिटनमधील वृत्तपत्र डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार, जगातील सर्वात जुन्या लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये सामील झालेल्या सलमान रश्दी यांनी यावेळी सांगितलं की, 'कुराण वाचणं आनंददायी नाही, कारण यामधील जास्तीत जास्त भाग कथेच्या स्वरुपात नाहीये'. सलमान रश्दी यांच्या म्हणण्यानुसार, 'कुराणमध्ये फार कमी जागा कथेला देण्यात आली आहे. कुराणचा एक तृतीयांश भाग इस्लामवर विश्वास न ठेवणा-यांवर आहे. ज्यामध्ये इस्लामवर विश्वास न ठेवल्यास कशाप्रकारे नरकात जावं लागेल हे सांगण्यात आलं आहे. दुसरा एक तृतीयांश भागात कायद्याची माहिती आहे. म्हणजे तुम्ही कशाप्रकारे एखाद्याशी वागलं पाहिजे वैगेरे'. 

'धर्माविना जगायचं ठरलं तर हे जग एक उत्तम ठिकाण सिद्ध होईल. धर्म बकवास आहे, कारण तो लोकांची हत्या करायला लावतो', असंही सलमान रश्दी बोलले आहेत. 

टॅग्स :Salman Rushdieसलमान रश्दीMuslimमुस्लीम