शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

जपानमध्ये असं होऊच कसं शकतं?

By संतोष भिसे | Updated: July 17, 2022 09:28 IST

गेल्या अर्धशतकात या देशात राजकीय हत्येचे उदाहरण नाही...

डॉ. महेश माधव गोगटे, संशोधक, क्योतो युनिव्हर्सिटी, क्योतो (जपान)

जपानसारख्या शांतताप्रिय देशात असं होऊच कसं शकतं? माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हत्येनंतर जगभरात उमटलेली ही प्रतिक्रिया जपानमध्येही उमटली, पण जपान्यांनी संयमाच्या मुखवट्याआड ती लपविली. हत्येनंतर कोठेही उद्वेग, आंदोलने, हिंसक कारवाया दिसल्या नाहीत. दैनंदिन बातमीसारखीच ही बातमीही लोकांनी पाहिली, पचविली. दु:खाचा कडवट घोट संयमाने सोसला. साधी निषेधाची रॅलीदेखील नाही.

महायुद्धाच्या पराकोटीच्या संकटांचा सामना केलेल्या जपानमध्ये हिंसा निषिद्ध आहे. बुद्धाच्या आणि अहिंसेच्या पुरस्कर्त्या जपानमध्ये थेट माजी पंतप्रधानांचीच भरचौकात हत्या होणे जपान्यांसाठी प्रचंड धक्कादायी ठरले. गेल्या अर्धशतकात तेथे राजकीय हत्येचे उदाहरण नाही. १९६० मध्ये जपान सोशॅलिस्ट पार्टीचे अध्यक्ष इजिरीओ असुनामा यांच्यावर टोकियोमधील एका जाहीर सभेतील हल्ला हाच काय तो विरळ प्रसंग.

जपानमध्ये शस्त्रास्त्र कायदे कडक आहेत. साध्या वाहन परवान्यासाठीही कडक परीक्षेला सामोरे जावे लागते. शस्त्रपरवाना म्हणजे तर मोठेच दिव्य. याकुझांची (टोळ्यांची) गुन्हेगारी नियंत्रणात आहे. कैसात्सुंना (पोलिसांना) मोठ्या कारवाईची वेळ क्वचितच येते. शिंजो आबे यांच्या हल्लेखोराने पिस्तुल स्वत: बनविल्याचे समजते. तो काही काळ सेल्फ डिफेन्स फोर्समध्ये होता. (हिंसेच्या विरोधातील जपानमध्ये सेना असा उल्लेख होत नाही). त्यानंतर एका कारखान्यात फोक लिफ्टर होता. सैनिकी अनुभवातून सुटे भाग जमवून पिस्तुल बनविले.

संवेदनशील जपानी सहसा आक्रमक होत नाही. तावातावाने भांडणारा, जोरजोराने ओरडणारा नागरिक क्वचितच दिसतो. जपानी राजकारणापासून फटकूनच असतात. १०० टक्के साक्षरतेनंतरही मतदान सरासरी ५२ टक्केच होते. सोयीसाठी रविवारीच मतदान ठेवले जाते. घराच्या कोपऱ्यावर केंद्र असूनही लोक येत नाहीत. प्रचारसभांना अवघे १५-२० श्रोतेच असतात. नेत्याचे भाषण आणि लोकांचे दैनंदिन व्यवहार एकाचवेळी सुरू असतात. एक्स, वाय, झेडसारख्या सुरक्षायंत्रणा नसतात. राजकीय नैतिकता प्रचंड महत्त्वाची. जनमत चाचणीत जरा इकडचे तिकडे झाले, तरी पंतप्रधान पायउतार होतात. त्यामुळे राजकारण आक्रमक नाही. तरीही तीन वर्षांत तीन पंतप्रधान झाले.

२०२० मध्ये प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्यानंतरही आबे सक्रिय होते. १९४५ पासून अपवाद वगळता त्यांची लेजिस्टिव्ह डेमोक्रेटिक पार्टीच (एलडीपी) सत्तेत आहे. आबेंविषयी लोकांमध्ये ममत्व होते. बबल इकॉनॉमीनंतर अनेक कंपन्या आर्थिक अडचणीत आल्या. आबे यांनी आर्थिक आघाडीवर महत्त्वाकांक्षी निर्णय घेतले. व्याजदर, कन्झम्प्शन टॅक्समध्ये बदल केले. करवाढीची धोरणे काहींना पटली नाहीत, पण देश सावरला. आबेनॉमिक्स म्हणून ओळखली जाणारी अर्थनीती यशस्वी ठरली. अत्यंत संवेदनशील, सर्वांना सहज उपलब्ध होणारा आणि व्यावहारिक नेता म्हणून ते लोकप्रिय होते. भारताला नैसर्गिक मित्र बनविण्यात पुढाकार घेतला. त्यांच्यामुळेच बुलेट ट्रेन, दिल्ली-मुंबई कॅरिडाॅर ही भारताची स्वप्ने आकाराला येऊ शकली. आता आबे नसले, तरी आबेनॉमिक्स सुरूच राहणार आहे. 

शब्दांकन : संतोष भिसे, सांगली

टॅग्स :Shinzo Abeशिन्जो आबेJapanजपान