शहरं
Join us  
Trending Stories
1
एक्झिट पोलवर सोनिया गांधी यांची पहिली प्रतिक्रिया! जाणून घ्या, काय म्हणाल्या?
2
Mumbai Local: मुंबईकरांची आठवड्याची सुरुवात लेटमार्कने! पश्चिम रेल्वे विस्कळीत, बोरीवलीत तांत्रिक बिघाड
3
शहाजीबापू पाटील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात; CM एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, केली तब्येतीची विचारपूस
4
Fact Check : राहुल गांधी पुढचे पंतप्रधान होतील असा दावा करणारी शाहरुख खानची 'ती' पोस्ट खोटी
5
अंध:कार दूर होणार, मोदी जाणार, भाजपा २२५ वर अडणार, तर इंडिया आघाडी..., सामनाचा दावा
6
T20 WC 2024 : पोलार्ड इंग्लंडच्या ताफ्यात! गतविजेत्यांना पुन्हा एकदा चॅम्पियन करण्यासाठी मैदानात
7
Anil Ambaniच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी; रिलायन्स पॉवर, इन्फ्रामध्ये जोरदार वाढ; जाणून घ्या?
8
Gold Price Today: ३ जून रोजी स्वस्त झालं Gold, निवडणुकांच्या निकालापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण
9
“NDAत येण्यासाठी उद्धव ठाकरेंचा PM मोदींना अनेक लोकांच्या माध्यमातून मेसेज”; शिंदे गटाचा दावा
10
OMA vs NAM : नामिबियाचा 'सुपर' विजय! ओमानची कडवी झुंज; केवळ ११० धावा पण सामना गाजला
11
“थोरातांची वैचारिक दिवाळखोरी दिसून येते, स्वतःला नेते समजतात पण...”: राधाकृष्ण विखे पाटील
12
रवीना टंडनवर झालेल्या खोट्या आरोपांवर कंगना रणौतची प्रतिक्रिया, म्हणाली, "ही धोक्याची घंटा..."
13
Exit Poll सुद्धा 'कन्फ्युज'! महाराष्ट्राचा नेमका कौल असणार तरी काय?
14
आरोग्य सांभाळा! जास्त तहान लागत असेल तर सावधान; 'या' ५ आजारांचा वाढू शकतो धोका
15
अल्लाह तुमच्या सर्व समस्या जाणून आहे, त्यामुळे संयम ठेवा; Sania Mirza ची पोस्ट
16
Share Market : शेअर बाजाराला 'एक्झिट पोल'चा बूस्टर; सेन्सेक्समध्ये २६०० अंकांपेक्षा अधिक तेजी
17
"EVM मध्ये छेडछाड झाली नाही तर हिमाचलमधील चारही जागा काँग्रेसला मिळतील"
18
NAM vs OMA : WHAT A MATCH! ओमानने नामिबियाच्या तोंडचा घास पळवला, Super Over मध्ये निकाल
19
अनेक वर्षे होती सत्ता, पण या राज्यात काँग्रेसला उमेदवार मिळेनात, ४१ जागांवर केलं सरेंडर
20
लग्नमंडपात पसरली शोककळा; मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू, 15 जखमी

चिनी रंगभूमीवर हिंदी मातीचा महाल

By admin | Published: May 18, 2017 6:39 PM

आपल्याच देशात अस्तित्व टिकवण्यासाठी झगडणा-या भारतीय नाट्यसृष्टीसाठी 22 एप्रिल हा दिवस ऐतिहासीक ठरला.

ऑनलाइन लोकमत
शांघाय, दि. 18 - आपल्याच देशात अस्तित्व टिकवण्यासाठी झगडणा-या भारतीय नाट्यसृष्टीसाठी 22 एप्रिल हा दिवस ऐतिहासीक ठरला. कारण चीनच्या शांघाय येथे महान कवी कालिदास यांच्या जीवनावर आधारित प्रसिद्ध नाटककार मोहन राकेश( 1925-1972) यांच्या "आषाढ़ का एक दिन" या नाटकाचा यशस्वी प्रयोग सादर करण्यात आला. आधुनिक शांघायच्या इतिहासात  एखाद्या हिंदी नाटकाचा प्रयोग करण्याची ही पहिलीच वेळ होती. 
 
शांघायसारख्या व्यस्त शहरात "आषाढ़ का एक दिन" या नाटकाच्या यशस्वी प्रयोगामुळे अनेक वर्षांपासून आपली माती, आपल्या भाषेपासून दूर राहूनही हिंदी रंगभूमीवर प्रेम करणा-यांची  संख्या कमी झाली नसल्याचं दाखवून दिलं. शांघायमधल्या यशानंतर आता बिजिंग आणि ग्वॉगजौ या शहरांतूनही नाटकाचं आयोजन करण्याचा आग्रह धरला जात आहे. 
 
हिंदी भाषा माहीत नसलेले दर्शक ज्यांनी कधीच रंगभूमीसाठी काम केलेलं नाही अशा कलाकारांसह काम करण्याचा निर्णय आव्हानात्मक होता असं नाटकाचे  दिग्दर्शक आणि कालिदासाची भूमिका करणारे मुकेश शर्मा म्हणाले. नाटकाची तयारी करण्यासाठीही वेळ मिळत नव्हता कारण टीममधील अनेक सदस्य वेगवेगळ्या खासगी कंपनीत कार्यरत आहेत. त्यामुळे स्काइपवर नाटकाची तयारी करावी लागत असे. पण कलाकारांनी 5 महिने घेतलेल्या कठोर मेहनतीमुळे नाटक यशस्वी ठरलं असं ते म्हणाले. 
 
महान कवी कालिदास यांच्या जीवनावर आधारित या नाटकात कालिदास यांची प्रेयसी मल्लिका हिच्या भूमिकेत  प्रियंका जोशी, मातुलच्या भूमिकेत अमित वायकर कालिदासांचा स्वयंघोषीत मित्र आर्य विलोम याच्या भूमिकेत अमित मेघणे, मल्लिकाची आई अंबिका हिच्या भूमिकेत धनश्री आणि राज वधूच्या भूमिकेत अपर्णा वायकर आदींनी आपल्या अफलातून अदाकारीने केवळ प्रेक्षकांना 2 तास थांबवून ठेवलं नाही तर त्यांना मंत्रमुग्ध केलं.   
 
विशेष म्हणजे स्त्रीप्रधान असलेल्या या नाटकाची सर्व जबाबदारी ही महिलांच्याच खांद्यावर होती. बीना वाघेला यांचा यामध्ये मोठा वाटा होता. हिंदी समजत नसलेल्या दर्शकांना नाट्यगृहापर्यंत आणण्याचं काम हे आव्हानात्मक होतं पण सर्वांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हे शक्य झालं असं त्या म्हणाल्या. 
 
यावेळी शांघायमधील भारताचे कॉन्सल जनरल प्रकाश गुप्ता हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अनेक वर्षांपूर्वी हे काव्य वाचलं होतं पण शांघायमध्ये प्रत्यक्ष हे नाटक पाहून खरंच खूप आनंद झाला असं म्हणत त्यांनी सर्व कलाकारांनी घेतलेल्या मेहनतीचं कौतूक केलं. 
 
शांघाय रंगमंचाचे अकादमीचे उपाध्यक्ष "यूउ" यांची उपस्थितीही यावेळी लक्षणीय होती. त्यांनीही कलाकारांचं कौतूक केलं तसंच भविष्यात चीनी भाषेत हिंदी नाटकं व्हायला हवीत अशी इच्छा व्यक्त केली.  
 
आपल्याच देशात अस्तित्व टिकवण्यासाठी झगडणा-या हिंदी रंगभूमीसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.