शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

सलाम! भारतीय सैन्यानं 22 मुलांना 'चाइल्ड सोल्जर' होण्यापासून वाचवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 17:05 IST

भारताच्या सैनिकांनी काँगोमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली आहे. भारताच्या जवानांनी 22 मुलांना 'चाइल्ड सोल्जर' होण्यापासून वाचवलं आहे.

नवी दिल्ली - भारताच्या सैनिकांनी काँगोमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली आहे. भारताच्या जवानांनी 22 मुलांना 'चाइल्ड सोल्जर' होण्यापासून वाचवलं आहे. भारतीय सैनिकांची एक तुकडी सध्या युनायटेड नेशन ऑर्गनायजेशन मिशन अंतर्गत रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये आहे. 

काँगोच्या पूर्व भागातील न्याबिऑन्डो गावांमध्ये भारतीय सैन्यांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली.  48 तासांच्या मोठ्या मोहिमेनंतर भारतीय सैन्याला 16 मुलं आणि सहा मुलींना वाचवण्यात यश आल्याचे काल भारतीय सैन्यातील एका अधिकाऱ्यानं सांगितलं.  16 सप्टेंबर रोजी गावांतील लोकांकडून लहान मुलांना काही शस्त्रधारी लोकांची एक तुकडी 'चाइल्ड सोल्जर' बनवत असल्याचे समजलं. त्यानंतर भारतीय सैन्यांनी त्यांच्या तावडीतून 22 जणांची सुटका केली. त्या लहान मुलांना भारतीय सैनिकांनी यूएनच्या चाइल्ड प्रोटेक्शन एजन्सीकडे सुपूर्द केलं.  तर लहान मुलांची सुटका केल्यानंतर त्याच दिवशी भारतीय सैन्याच्या दुसऱ्या एका तुकडीनं मिरकी भागातील 200 कुटुंबांना स्थलांतरीत होण्यापासून अडवलं. दोन स्थानिक विरोधी गटांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे ही कुटुंबं स्थलांतरीत होतं होती. त्या सर्वच लोकांमध्ये भयग्रस्थ वातावरणही निर्माण झालं होतं असं सैन्याच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. पुढे ते म्हणाले की, भारतीय सैन्यांनी त्या समुहाला तेथून बाहेर काढलं त्यामुळे तेथील स्थिती नियंत्रणात आली. 

जगभरात सध्या 2600 पेक्षा आधिक भारतीय सैनिक युनायटेड नेशन ऑर्गनायजेशन मिशन अंतर्गत कार्यरत आहेत. सर्वात मोठा आणि अवडघड संयुक्त राष्ट्राच्या शांतता मिशनसाठी हे काम करतात. मध्य आफ्रिकातील राष्टांमध्ये सर्वाधिक भारतीय सैनिक तैनात आहेत. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान