शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

दरड कोसळून बांगलादेशात 12 रोहिंग्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2018 15:32 IST

मॉन्सून येण्यापुर्वी 29 हजार रोहिंग्यांचे स्थलांतर करण्यात आले होते. दरडीमुळे सध्या 30 घरांचे नुकसान झाले आहे.

ढाका- बांगलादेशात आश्रयासाठी आलेल्या रोहिंग्यांचे प्रश्न अजूनही संपलेले नाहीत. बांगलादेशातील कॉक्स बझार या जिल्ह्यात 10 लाखांच्या आसपास रोहिंग्या छावणीमध्ये राहात आहेत. मॉन्सूननंतर या छावणीतील रोहिंग्यांच्या त्रासामध्ये अधिकच भर पडली आहे. दरड कोसळल्यामुळे 12 रोहिंग्यांचे प्राण गेले आहेत. 

सोमवारी मातीखाली गाडल्या गेल्यामुळे एका लहान मुलाचे कुतुपालोंग छावणीत प्राण गेले होते. रोहिंग्या छावणी डोंगराळ प्रदेशाला लागून असल्यामुळे छावणीतील 2 लाख लोकांना दरडीखाली येण्याचा थेट धोका आहे. तसेच मॉन्सूनमुळेही त्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. आश्रय छावणी बांधण्यासाठी येथील टेकड्यांवरील झाडांची तोड करण्यात आली होती त्यामुळे तेथील उतारावरील जमिनीचा आधारच नाहिसा झाला आहे. मॉन्सून येण्यापुर्वी 29 हजार रोहिंग्यांचे स्थलांतर करण्यात आले होते. दरडीमुळे सध्या 30 घरांचे नुकसान झाले आहे.या परिसरामध्ये आतापर्यंतच 2.5 मी इतका पाऊस पडला आहे. इंग्लंडमध्ये वर्षभरात जितका पाऊस पडतो त्यापेक्षा हा तिप्पट पाऊस आहे. गेल्या वर्षी मॉन्सूनमुळे दरड कोसळून कॉक्स बझार आणि चितगांवच्या डोंगराळ प्रदेशात 70 लोकांचे प्राण गेले होते. दरडींबरोबर पूराचा धोकाही असल्यामुळे रोहिंग्यांच्या छावण्या अधिकच संकटात सापडल्या आहेत. 

टॅग्स :Rohingyaरोहिंग्याBangladeshबांगलादेशMyanmarम्यानमारInternationalआंतरराष्ट्रीय