शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

दरड कोसळून बांगलादेशात 12 रोहिंग्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2018 15:32 IST

मॉन्सून येण्यापुर्वी 29 हजार रोहिंग्यांचे स्थलांतर करण्यात आले होते. दरडीमुळे सध्या 30 घरांचे नुकसान झाले आहे.

ढाका- बांगलादेशात आश्रयासाठी आलेल्या रोहिंग्यांचे प्रश्न अजूनही संपलेले नाहीत. बांगलादेशातील कॉक्स बझार या जिल्ह्यात 10 लाखांच्या आसपास रोहिंग्या छावणीमध्ये राहात आहेत. मॉन्सूननंतर या छावणीतील रोहिंग्यांच्या त्रासामध्ये अधिकच भर पडली आहे. दरड कोसळल्यामुळे 12 रोहिंग्यांचे प्राण गेले आहेत. 

सोमवारी मातीखाली गाडल्या गेल्यामुळे एका लहान मुलाचे कुतुपालोंग छावणीत प्राण गेले होते. रोहिंग्या छावणी डोंगराळ प्रदेशाला लागून असल्यामुळे छावणीतील 2 लाख लोकांना दरडीखाली येण्याचा थेट धोका आहे. तसेच मॉन्सूनमुळेही त्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. आश्रय छावणी बांधण्यासाठी येथील टेकड्यांवरील झाडांची तोड करण्यात आली होती त्यामुळे तेथील उतारावरील जमिनीचा आधारच नाहिसा झाला आहे. मॉन्सून येण्यापुर्वी 29 हजार रोहिंग्यांचे स्थलांतर करण्यात आले होते. दरडीमुळे सध्या 30 घरांचे नुकसान झाले आहे.या परिसरामध्ये आतापर्यंतच 2.5 मी इतका पाऊस पडला आहे. इंग्लंडमध्ये वर्षभरात जितका पाऊस पडतो त्यापेक्षा हा तिप्पट पाऊस आहे. गेल्या वर्षी मॉन्सूनमुळे दरड कोसळून कॉक्स बझार आणि चितगांवच्या डोंगराळ प्रदेशात 70 लोकांचे प्राण गेले होते. दरडींबरोबर पूराचा धोकाही असल्यामुळे रोहिंग्यांच्या छावण्या अधिकच संकटात सापडल्या आहेत. 

टॅग्स :Rohingyaरोहिंग्याBangladeshबांगलादेशMyanmarम्यानमारInternationalआंतरराष्ट्रीय