शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 16:09 IST

तवी नदीत पूर येण्याची जास्त शक्यता असल्याने पहिला अलर्ट सोमवारी परराष्ट्र मंत्रालयामार्फत इस्लामाबादला पाठवण्यात आला होता.

गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतातील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, भारतानेपाकिस्तानला पुन्हा एकदा तवी नदीला पूर येण्याचा इशारा दिला आहे. भारताने परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून हा इशारा पाठवला असून, सततच्या पावसामुळे काही धरणांचे दरवाजे उघडावे लागण्याची शक्यता असल्याचं यात नमूद केलं आहे. याआधीही सोमवार आणि मंगळवारी असेच अलर्ट पाठवण्यात आले होते. हे सर्व अलर्ट मानावतेच्या दृष्टिकोनातून देण्यात आले आहेत.

सिंधु जल करार रद्द असूनही अलर्ट जारीया वर्षी २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण बनले होते. त्यामुळे भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधु जल करार रद्द केला आणि पाकिस्तानकडे जाणारे पाणी थांबवले. मात्र, सध्याची पूरस्थिती आणि मानवी जीवनाची सुरक्षा लक्षात घेता, हा करार रद्द झाला असला तरी भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा पूर अलर्ट दिला आहे.

तवी नदीत पूर येण्याची जास्त शक्यता असल्याने पहिला अलर्ट सोमवारी परराष्ट्र मंत्रालयामार्फत इस्लामाबादला पाठवण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी आणि बुधवारीही आणखी अलर्ट पाठवण्यात आले आहेत.

धरणांचे दरवाजे उघडणे अपरिहार्यउत्तर भारतात संततधार पावसामुळे अनेक भागांमध्ये नद्या आणि जलाशयांची पातळी खूप वाढली आहे. त्यामुळे काही धरणांचे दरवाजे उघडण्याशिवाय प्रशासनाकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. हा निर्णय लोकांची सुरक्षा लक्षात घेऊन घेण्यात आला असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

जम्मूमध्ये तवी आणि इतर अनेक नद्यांना पूर आला आहे. त्याचप्रमाणे पंजाबमध्येही सतलज, बियास, रावी आणि इतर छोट्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

टॅग्स :floodपूरPakistanपाकिस्तानIndiaभारत