शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 16:09 IST

तवी नदीत पूर येण्याची जास्त शक्यता असल्याने पहिला अलर्ट सोमवारी परराष्ट्र मंत्रालयामार्फत इस्लामाबादला पाठवण्यात आला होता.

गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतातील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, भारतानेपाकिस्तानला पुन्हा एकदा तवी नदीला पूर येण्याचा इशारा दिला आहे. भारताने परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून हा इशारा पाठवला असून, सततच्या पावसामुळे काही धरणांचे दरवाजे उघडावे लागण्याची शक्यता असल्याचं यात नमूद केलं आहे. याआधीही सोमवार आणि मंगळवारी असेच अलर्ट पाठवण्यात आले होते. हे सर्व अलर्ट मानावतेच्या दृष्टिकोनातून देण्यात आले आहेत.

सिंधु जल करार रद्द असूनही अलर्ट जारीया वर्षी २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण बनले होते. त्यामुळे भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधु जल करार रद्द केला आणि पाकिस्तानकडे जाणारे पाणी थांबवले. मात्र, सध्याची पूरस्थिती आणि मानवी जीवनाची सुरक्षा लक्षात घेता, हा करार रद्द झाला असला तरी भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा पूर अलर्ट दिला आहे.

तवी नदीत पूर येण्याची जास्त शक्यता असल्याने पहिला अलर्ट सोमवारी परराष्ट्र मंत्रालयामार्फत इस्लामाबादला पाठवण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी आणि बुधवारीही आणखी अलर्ट पाठवण्यात आले आहेत.

धरणांचे दरवाजे उघडणे अपरिहार्यउत्तर भारतात संततधार पावसामुळे अनेक भागांमध्ये नद्या आणि जलाशयांची पातळी खूप वाढली आहे. त्यामुळे काही धरणांचे दरवाजे उघडण्याशिवाय प्रशासनाकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. हा निर्णय लोकांची सुरक्षा लक्षात घेऊन घेण्यात आला असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

जम्मूमध्ये तवी आणि इतर अनेक नद्यांना पूर आला आहे. त्याचप्रमाणे पंजाबमध्येही सतलज, बियास, रावी आणि इतर छोट्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

टॅग्स :floodपूरPakistanपाकिस्तानIndiaभारत