शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

Corona Vaccine: दिलदार हिंदुस्थान! संयुक्त राष्ट्रांच्या शांती दूतांना 2 लाख कोरोना लसीचे डोस भेट देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 13:00 IST

Corona Vaccine for peacekeepers : संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटारेस यांनी कोरोना व्हायरसच्या विरोधात जागतिक लढाईसाठी आणि जागतिक बाजारात कोरोना लसीच्या अत्यावश्यक पुरवठ्याच्या प्रयत्नांबाबत भारताची स्तुती केली आहे.

कोरोना विरोधातील लढाईमध्ये भारताने अवघ्या जगाला आशेचा किरण दाखविला आहे. भारतात पुन्हा कोरोना परतला असून रुग्ण वाढू लागले आहेत. अशातदेखील देशात खरी गरज असताना भारताने जगाशी असलेले देणे न विसरता कोरोना लस विविध देशांना पुरवत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैनिकांना भारताने दोन लाख कोरोना लसीचे डोस दिले आहेत. (S jaishankar Offers 2 lakhs corona vaccine dose for UN peacekeepers.)

संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटारेस यांनी कोरोना व्हायरसच्या विरोधात जागतिक लढाईसाठी आणि जागतिक बाजारात कोरोना लसीच्या अत्यावश्यक पुरवठ्याच्या प्रयत्नांबाबत भारताची स्तुती केली आहे. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी़ एस़ तिरुमूर्ति यांनी शनिवारी ट्विट करून यांची माहिती दिली. गुटारेस यांनी 17 फेब्रुवारीला भारताला आभारप्रदर्शन करणारे पत्र पाठविले. यामध्ये त्यांनी कोरोना लढ्यासाठी भारताने 2 लाख डोस दिले, याबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वैयक्तीक आभार मानले आहेत. 

तिरुमूर्ति यांनीदेखील संयुक्त राष्ट्र प्रमुखांचे आभार व्यक्त केला आहेत. कोरोना महामारीविरोधात लढण्यात भारत एक जागतिक नेता बनला आहे. 150 पेक्षा अधिक देशांना महत्वाची औषधे, किट आणि व्हेंटिलेटर तसेच वैयक्तिक सुरक्षा उपकरणे देऊन भारताने जागतिक महामारीविरोधात लढण्याच्या प्रयत्नांना बळ दिले आहे. यामुळे भारत हा खरोखरच जागतिक नेता बनला आहे, असे गुटारेस यांनी पत्रात म्हटल्याचे तिरुमूर्ति यांनी ट्विट केले आहे. 

डब्ल्यूएचओने आपत्कालीन वापरासाठी नुकत्याच दोन लसींना परवानगी दिली आहे. यापैकी एक लस ही भारतात विकसित आणि तयार झाली आहे. भारताने ही लस जगासाठी दिली आहे. कोव्हॅक्स सुविधेला समर्थन देणे आणि त्यासाठी प्रयत्न केले, म्हणून मी भारताचे आभार मानत आहे, असे गुटारेस यांनी म्हटले आहे. 

जगभरात एकूण 12 मोहिमांमध्ये संयुक्त राष्ट्रांचे एकूण 94,484 कर्मचारी तैनात आहेत. यामध्ये 121 देशांचे लोक काम करतात. ज्यामध्ये सर्वाधिक सैनिक हे भारताचे आहेत. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी, काही दिवसांपूर्वी युएनच्या बैठकीत या शांतीदुतांना 2 लाख कोरोना लसीचे डोस भेट म्हणून देणार असल्याची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी भगवतगीतेचा उल्लेख करत नेहमी दुसऱ्यांच्या कल्याणाची बाब मनात ठेवून आपले काम करावे, असेही म्हटले होते. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसunited nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतS. Jaishankarएस. जयशंकरcorona virusकोरोना वायरस बातम्या