शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Corona Vaccine: दिलदार हिंदुस्थान! संयुक्त राष्ट्रांच्या शांती दूतांना 2 लाख कोरोना लसीचे डोस भेट देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 13:00 IST

Corona Vaccine for peacekeepers : संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटारेस यांनी कोरोना व्हायरसच्या विरोधात जागतिक लढाईसाठी आणि जागतिक बाजारात कोरोना लसीच्या अत्यावश्यक पुरवठ्याच्या प्रयत्नांबाबत भारताची स्तुती केली आहे.

कोरोना विरोधातील लढाईमध्ये भारताने अवघ्या जगाला आशेचा किरण दाखविला आहे. भारतात पुन्हा कोरोना परतला असून रुग्ण वाढू लागले आहेत. अशातदेखील देशात खरी गरज असताना भारताने जगाशी असलेले देणे न विसरता कोरोना लस विविध देशांना पुरवत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैनिकांना भारताने दोन लाख कोरोना लसीचे डोस दिले आहेत. (S jaishankar Offers 2 lakhs corona vaccine dose for UN peacekeepers.)

संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटारेस यांनी कोरोना व्हायरसच्या विरोधात जागतिक लढाईसाठी आणि जागतिक बाजारात कोरोना लसीच्या अत्यावश्यक पुरवठ्याच्या प्रयत्नांबाबत भारताची स्तुती केली आहे. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी़ एस़ तिरुमूर्ति यांनी शनिवारी ट्विट करून यांची माहिती दिली. गुटारेस यांनी 17 फेब्रुवारीला भारताला आभारप्रदर्शन करणारे पत्र पाठविले. यामध्ये त्यांनी कोरोना लढ्यासाठी भारताने 2 लाख डोस दिले, याबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वैयक्तीक आभार मानले आहेत. 

तिरुमूर्ति यांनीदेखील संयुक्त राष्ट्र प्रमुखांचे आभार व्यक्त केला आहेत. कोरोना महामारीविरोधात लढण्यात भारत एक जागतिक नेता बनला आहे. 150 पेक्षा अधिक देशांना महत्वाची औषधे, किट आणि व्हेंटिलेटर तसेच वैयक्तिक सुरक्षा उपकरणे देऊन भारताने जागतिक महामारीविरोधात लढण्याच्या प्रयत्नांना बळ दिले आहे. यामुळे भारत हा खरोखरच जागतिक नेता बनला आहे, असे गुटारेस यांनी पत्रात म्हटल्याचे तिरुमूर्ति यांनी ट्विट केले आहे. 

डब्ल्यूएचओने आपत्कालीन वापरासाठी नुकत्याच दोन लसींना परवानगी दिली आहे. यापैकी एक लस ही भारतात विकसित आणि तयार झाली आहे. भारताने ही लस जगासाठी दिली आहे. कोव्हॅक्स सुविधेला समर्थन देणे आणि त्यासाठी प्रयत्न केले, म्हणून मी भारताचे आभार मानत आहे, असे गुटारेस यांनी म्हटले आहे. 

जगभरात एकूण 12 मोहिमांमध्ये संयुक्त राष्ट्रांचे एकूण 94,484 कर्मचारी तैनात आहेत. यामध्ये 121 देशांचे लोक काम करतात. ज्यामध्ये सर्वाधिक सैनिक हे भारताचे आहेत. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी, काही दिवसांपूर्वी युएनच्या बैठकीत या शांतीदुतांना 2 लाख कोरोना लसीचे डोस भेट म्हणून देणार असल्याची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी भगवतगीतेचा उल्लेख करत नेहमी दुसऱ्यांच्या कल्याणाची बाब मनात ठेवून आपले काम करावे, असेही म्हटले होते. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसunited nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतS. Jaishankarएस. जयशंकरcorona virusकोरोना वायरस बातम्या