शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पृथ्वीवर २५ कोटी वर्षांपूर्वी आला होता प्रलय, ९० टक्के जीव भस्मसात; यामागचं कारण कळालं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 16:05 IST

पृथ्वीवर आजपासून तब्बल २५ कोटी वर्षांपूर्वी महाप्रलय आला होता आणि यात जवळपास ९० टक्के जीव भस्मसात झाले होते.

बीजिंग

पृथ्वीवर आजपासून तब्बल २५ कोटी वर्षांपूर्वी महाप्रलय आला होता आणि यात जवळपास ९० टक्के जीव भस्मसात झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून वैज्ञानिक यामागचं कारण शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. या संपूर्ण घटनेचा अभ्यास करत आहेत. आता चीनी वैज्ञानिकांनी या प्रलयामागचं कारण शोधून काढलं आहे. वैज्ञानिकांच्या दाव्यानुसार २५ कोटी वर्षांपूर्वी ज्वालामुखीचा स्फोट झाला होता आणि त्यानंतर पृथ्वीवर हाडं गोठतील अशा थंडीला सुरुवात झाली. यात जवळपास ९० टक्के जीव संपुष्टात आले होते. 

चायनीज अकादमी ऑफ सायन्सनं दक्षिण चीनच्या सिचुआन प्रांतात तांब्याच्या खाणींचा अभ्यास करुन अनेक निष्कर्ष काढले आहेत. या खाणीमध्ये खडकांच्या विसंगतीवरुन शास्त्रज्ञांनी महत्त्वाची माहिती शोधून काढली आहे. सल्फरनं भरलेल्या उत्सर्जनाचे निशाण खडकांवर सापडले आहेत. दगडांवरील राखेच्या थरातून याची माहिती मिळाली आहे. ज्वालामुखीतून सल्फर बाहेर पडून त्यातील एरोसॉल जेव्हा वायूमंडळात पोहोचला तेव्हा सूर्याच्या किरणांची प्रखरता अत्यंत कमी झाली होती. 

तापमान काही काळासाठी थेट ४ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचलंज्वालामुखी झालेल्या वातावरणातील बदलामुळे आणि सूर्याची किरणं परत गेल्यानं पृथ्वीवरील तापमानात खूप घट झाली होती. बर्फाळ वातावरणामुळे जवळपास ९० टक्के सजीवांचा मृत्यू झाला होता. शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार चीनमधील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे धरतीवरील सरासरी तापमान काही काळासाठी ४ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचलं होतं. वातावरणातील सल्फर ज्वालामुखीमुळे २५ कोटी वर्षांपूर्वी प्रचंड प्रमाणात सजीव गोष्टींचा अंत झाला होता. 

टॅग्स :scienceविज्ञानchinaचीन