शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

श्रीलंकेत राष्ट्राध्यक्षपदी गोताबाया राजपक्षे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 1:31 AM

दहशतवादी हल्ल्यानंतर सत्तांतर; राष्ट्रवादाला कौल

कोलंबो : सात महिन्यांपूर्वी ईस्टर सण्डेच्या दिवशी काही प्रमुख चर्च आणि हॉटेलांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत श्रीलंकेच्या मतदारांनी सत्तांतराच्या बाजूने कौल दिला आहे. निवडणूक आयोगाने अधिकृत अंतिम निकाल जाहीर केला नसला तरी प्रखर राष्ट्रवादाच्या मुद्यावर निवडणूक लढविलेले श्रीलंका पोदुजना पेरामुना (पीपल्स पार्टी)चे उमेदवार गोताबाया राजपक्षे श्रीलंकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष होतील, हे स्पष्ट झाले आहे. विजयी होण्यासाठी आवश्यक असलेला किमान ५० टक्के मतांचा पल्ला राजपक्षे यांनी रविवारी दुपारीच ओलांडला होता. त्यामुळे त्यांचा विजय याहूनही अधिक मताधिक्याने होईल, असे दिसते.सत्ताधारी ‘युनायटेड नॅशनल पार्टी’चे नेते व मावळते पंतप्रधान रनिल विक्रमसिंगे यांनी स्वत: बाजूला होऊन आपले पक्षाचे उपनेते सजित प्रेमदास यांना उमेदवारी दिली होती. अंतिम निकाल जाहीर होण्याआधीच प्रेमदास यांनी मोठ्या मनाने आपला पराभव मान्य करून राजपक्षे यांचे अभिनंदन केले. ‘पीपल्स पार्टी’चे प्रवक्ते केहेलिया राम्बुकवेला यांनी राजपक्षे यांचा विजय अधिकृतपणे जाहीर करून त्यांचा शपथविधी सोमवार किंवा मंगळवारी होईल, असे सांगितले.गोताबाया राजपक्षे यांच्या विजयाने पाच वर्षांच्या खंडानंतर श्रीलंकेची सत्ता पुन्हा ‘पीपल्स पार्टी’कडे व पर्यायाने अत्यंत प्रभावी अशा राजपक्षे घराण्याकडे आली आहे. गोताबाया हे सन १९९३ मध्ये तामिळ अतिरेक्यांच्या आत्मघाती बॉम्बहल्ल्यात प्राण गमवावे लागलेले माजी राष्ट्राध्यक्ष रणशिंगे प्रेमदास यांचे चिरंजीव व याच पक्षाचे याआधी राष्ट्राध्यक्ष झालेले महिंद राजपक्षे यांचे धाकटे बंधू आहेत. स्वत: निवृत्त लष्करी अधिकारी असलेले ७० वर्षांचे गोताबाया याआधी देशाचे संरक्षणमंत्रीही होते. त्यावेळी त्यांनी निकराने लष्करी कारवाई करून उत्तर व ईशान्य प्रांतांतील तामिळ बंडखोरांचा पाडाव करीत देशात ३७ वर्षे चाललेल्या वांशिक गृहयुद्धाचा कायमचा पायबंद केला होता. आताही ते बहुसंख्य असलेल्या बौद्ध धर्मीय सिंहली मतदारांच्या मतांवरच निवडून आले आहेत. ‘हिंसक कर्दनकाळ’ म्हणून तामिळ व मुस्लिम अल्पसंख्य समाजांमध्ये ते अप्रिय आहेत.निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार एकूण १.६० कोटी मतदारांपैकी सुमारे ८० टक्के मतदारांनी शनिवारच्या मतदानात भाग घेतला होता. त्यापैकी किमान ५३-५४ टक्के मते गोताबाया यांनी मिळविली.(वृत्तसंस्था)मोदींनी केले अभिनंदनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टष्ट्वीट करून गोताबाया राजपक्षे यांचे अभिनंदन करताना म्हटले की, दोन्ही देशांमधील व त्यांच्या जनतेमधील घनिष्ठ बंधुभावाचे संबंध आधिक बळकट करण्यासाठी तसेच जगाच्या या भागात शांतता नांदून समृद्धी यावी यासाठी तुमच्यासोबत जवळिकीने काम करायला मला आवडेल.गोताबाया यांनीही टष्ट्वीट करून त्यांचे तसेच भारतीय जनतेचे सदिच्छांबद्दल आभार मानले. दोन्ही देशांचे नाते इतिहास व सामायिक श्रद्धेने घट्ट जुळलेले आहे व त्यास अधिक मजबूत करण्यासाठी मी काम करीन.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंका