शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या जगाला महिनाभर करावा लागला प्रचंड उकाड्याचा सामना; आजारपण, मृत्यूही वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 12:57 IST

१ मे २०२४ ते १ मे २०२५ या काळात अर्ध्या जगाला किमान एक महिना अति उकाड्याचा सामाना

वॉशिंग्टन : विकासाच्या नावाखाली होत असलेल्या निसर्गाच्या न्हासाचे परिणाम हवामान बदलाच्या रूपात दिसू लागले आहेत. हवामान बदलामुळे सातत्याने उष्णतेच वाढ होत आहे. या मानवनिर्मित हवामान बदलाचा फटका जगातील ४ अब्ज लोकांना बसल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. १ मे २०२४ ते १ मे २०२५ या काळात अर्ध्या जगाला किमान एक महिना अति उकाड्याचा सामाना करावा लागल्याचे वर्ल्ड वेदर अॅट्रिब्युशन, क्लायमेट सेंट्रल आणि रेड क्रॉसच्या संशोधनात म्हटले आहे.

वाढत्या उष्णतेमुळे आजारांसोबतच मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले आहे. पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एवढेच नाही, तर हवामान बदलामुळे ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. अचानक येणारे पूर व चक्रीवादळाची चर्चा प्रचारमाध्यमांमध्ये होत असली तरी या संकटापेक्षा भयंकर संकट वाढत्या उष्णतेमुळे निर्माण होत असल्याचा दावा अहवालात केला आहे.

मृत्यूसाठी चुकीची कारणे

जगभरात उष्णतेशी संबंधित कारणामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मात्र, या मृत्यूची योग्यरीत्या नोंद होत नाही. उष्णतेमुळे झालेल्या मृत्यूला हृदयरोग किंवा मूत्रपिंड निकामी होणे यासारखी चुकीची कारणे दिली जातात.

या लाटा 'सायलेंट किलर' 

 उष्णतेच्या लाटेत लोक रस्त्यावर पडून मरत नाहीत. ते रुग्णालयात किंवा घरांमध्ये मरतात. म्हणून अशा लोकांच्या मृत्यूच्या कारणाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे उष्णतेच्या लाटा सायलेंट किलरप्रमाणे काम करत आहेत.

गरिबांना सर्वाधिक त्रास 

गरीब, कमी उत्पन्न असलेले समुदाय, तसेच आजारी, वृद्ध यासारख्या असुरक्षित लोकांना उष्णतेचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा या संशोधनात केला आहे.

...तरच मिळेल दिलासा 

हवामान बदलामुळे सातत्याने वाढत असलेली उष्णता कमी करण्यासाठी जीवाश्म इंधनाचा वापर टप्याटप्याने बंद करावा लागेल. तसे केले नाही तर उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होतील व त्यांचे प्रमाणदेखील वाढेल, अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :TemperatureतापमानHeat Strokeउष्माघात