शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएल फायनलपूर्वी मोठी बातमी! दोन्ही संघांचे दोन महत्वाचे खेळाडू अनफिट; आणखी एक खेळाडू... 
2
“राज ठाकरे आहेत, तोपर्यंत कुणीही ठाकरे ब्रँड संपवू शकत नाहीत”; मनसे नेते थेट बोलले
3
IPL 2025 Final: RCB की PBKS? पाऊस पडला तर कुणाचं स्वप्न जाईल 'पाण्यात'? नियमात स्पष्ट म्हटलंय की...
4
१ लाखाचे २३,००,०००! तेही फक्त ५ वर्षांत; 'पॉवर'फुल्ल स्टॉकने 'मीटर'च टाकला राव!
5
या प्रेमाला म्हणावं तरी काय? ज्याच्याशी पोटच्या मुलीचं लग्न ठरवलं, त्याच्याशीच आईनं बांधली लग्नगाठ!
6
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात, माजी मंत्र्याशीही होतं कनेक्शन!
7
IPL 2025: आयपीएल जिंकणारा संघ होणार मालामाल! उपविजेत्यालाही मिळणार 'इतके' कोटी रुपये
8
खळबळजनक! लेकाला हवी होती BMW; वडिलांनी दुसरी कार घेताच तरुणाने संपवलं जीवन
9
युक्रेनला हवे होते तेच रशियाने केले! एक हल्ला होताच विमाने ४०००-५५०० किमी आत नेऊन ठेवली, अन्...
10
“तुमच्या १० पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही, बाळासाहेबांनी...”; राऊतांची भाजपावर टीका
11
आग लगने वाली है! 'धुरंधर' सेटवरील रणवीर अन् संजूबाबाचा व्हिडिओ लीक; चाहत्यांना आठवला 'खिलजी'
12
भारत आणि रशियाच्या मैत्रीने अमेरिकेला जळजळ; शस्त्रे खरेदीवर ट्रम्प सरकारने घेतला आक्षेप
13
इवल्याशा पक्ष्याच्या धडकेमुळे महाकाय विमानाला भगदाड कसं पडलं? असं आहे त्यामागचं कारण
14
परेश रावल यांची खंत, 'हेरा फेरी ३'मधून साइडलाइन केल्यामुळे घेतली एक्झिट?, म्हणाले - "मी तर हिरो होतो..."
15
Corona Virus Update: कोरोनाने घेतले आणखी ५ बळी; सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार पार! महाराष्ट्रात किती रुग्ण?
16
Mumbai Suicide: मुंबईतील प्रसिद्ध मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी, ३८ वर्षीय व्यक्तीच्या मृत्युने परिसरात खळबळ
17
एसबीआय, पीएनबी, बीओबीसब ५ सरकारी बँका बनवणार एकत्रित कंपनी, काय आहे प्लान?
18
थायलंड फिरून परतला, पण एकटा नाही...! तरुणाची बॅग उघडताच मुंबई विमानतळावर सगळ्यांनाच बसला धक्का
19
ज्याला कष्टानं बनवलं, आता तोच खातोय नोकरी! मायक्रोसॉफ्टमध्ये दुसऱ्यांदा मोठी नोकरकपात
20
कमल हासन यांच्या कन्नड-तमिळ भाषेबाबत केलेल्या वक्तव्याने वाद; हायकोर्टाने फटकारले...

अर्ध्या जगाला महिनाभर करावा लागला प्रचंड उकाड्याचा सामना; आजारपण, मृत्यूही वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 12:57 IST

१ मे २०२४ ते १ मे २०२५ या काळात अर्ध्या जगाला किमान एक महिना अति उकाड्याचा सामाना

वॉशिंग्टन : विकासाच्या नावाखाली होत असलेल्या निसर्गाच्या न्हासाचे परिणाम हवामान बदलाच्या रूपात दिसू लागले आहेत. हवामान बदलामुळे सातत्याने उष्णतेच वाढ होत आहे. या मानवनिर्मित हवामान बदलाचा फटका जगातील ४ अब्ज लोकांना बसल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. १ मे २०२४ ते १ मे २०२५ या काळात अर्ध्या जगाला किमान एक महिना अति उकाड्याचा सामाना करावा लागल्याचे वर्ल्ड वेदर अॅट्रिब्युशन, क्लायमेट सेंट्रल आणि रेड क्रॉसच्या संशोधनात म्हटले आहे.

वाढत्या उष्णतेमुळे आजारांसोबतच मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले आहे. पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एवढेच नाही, तर हवामान बदलामुळे ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. अचानक येणारे पूर व चक्रीवादळाची चर्चा प्रचारमाध्यमांमध्ये होत असली तरी या संकटापेक्षा भयंकर संकट वाढत्या उष्णतेमुळे निर्माण होत असल्याचा दावा अहवालात केला आहे.

मृत्यूसाठी चुकीची कारणे

जगभरात उष्णतेशी संबंधित कारणामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मात्र, या मृत्यूची योग्यरीत्या नोंद होत नाही. उष्णतेमुळे झालेल्या मृत्यूला हृदयरोग किंवा मूत्रपिंड निकामी होणे यासारखी चुकीची कारणे दिली जातात.

या लाटा 'सायलेंट किलर' 

 उष्णतेच्या लाटेत लोक रस्त्यावर पडून मरत नाहीत. ते रुग्णालयात किंवा घरांमध्ये मरतात. म्हणून अशा लोकांच्या मृत्यूच्या कारणाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे उष्णतेच्या लाटा सायलेंट किलरप्रमाणे काम करत आहेत.

गरिबांना सर्वाधिक त्रास 

गरीब, कमी उत्पन्न असलेले समुदाय, तसेच आजारी, वृद्ध यासारख्या असुरक्षित लोकांना उष्णतेचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा या संशोधनात केला आहे.

...तरच मिळेल दिलासा 

हवामान बदलामुळे सातत्याने वाढत असलेली उष्णता कमी करण्यासाठी जीवाश्म इंधनाचा वापर टप्याटप्याने बंद करावा लागेल. तसे केले नाही तर उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होतील व त्यांचे प्रमाणदेखील वाढेल, अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :TemperatureतापमानHeat Strokeउष्माघात