शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सुवर्णसंधीचा लाभ घेऊन जागतिक उद्योजकांनी भारतात गुंतवणूक करावी-मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 06:51 IST

जागतिक स्तरावरील उद्योजकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन

न्यू यॉर्क : कॉर्पोरेट करांमध्ये मोठी कपात करण्याचा ऐतिहासिक निर्णय भारताने घेतला आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी जागतिक स्तरावरील उद्योजकांनी भारतात गुंतवणूक करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले.ब्लूमबर्ग ग्लोबल बिझनेस फोरममधील भाषणात ते म्हणाले, भारतात उद्योगांना अधिक अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे. उद्योजकांना गुंतवणूक करायची असेल तर त्यांनी भारतात यावे. तुम्हाला स्टार्ट अप कंपन्या सुरू करायच्या असतील तर त्यासाठी आमची मोठी बाजारपेठ तुम्हाला खुणावते आहे.३५ टक्के असलेल्या कॉर्पोरेट करांत कपात करून मोदी सरकारने ते प्रमाण २५.१७ टक्क्यांवर आणले. हे प्रमाण जगातील प्रमुख देशांमध्ये असलेल्या कॉर्पोरेट करांइतकेच आहे. मोदी पुढे म्हणाले, भारतातील शहरांचे झपाट्याने आधुनिकीकरण होत आहे. आधुनिक तंत्रज्ञान व अनेक सुविधांनी ही शहरे सुसज्ज होत आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावरील उद्योजकांनी या शहरांतील नागरी प्रकल्पांमध्येही गुंतवणूक करायला हवी. भारताच्या संरक्षण क्षेत्रातही परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. उत्तम रीतीने व्यवसाय करता यावा म्हणून ५० कायदे रद्दबातल करण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)अजून मोठा पल्ला गाठायचा आहे!भारतातील वातावरण उद्योगांना अनुकूल करण्यासाठी आम्ही अतिशय मोठे निर्णय घेत आहोत. अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. २०२४-२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियनची करण्याचे ध्येय आम्ही बाळगले आहे. लोकशाही राजवट, राजकीय स्थैर्य, ठोस धोरणे, निष्पक्ष न्यायव्यवस्था हे भारतातील वातावरण गुंतवणुकीसाठी आश्वासक आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी