शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

जनरल व्ही. के. सिंह उत्तर कोरियामध्ये, 20 वर्षांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच भारतीय नेत्याची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 13:24 IST

1998 नंतर प्रथमच भारतातील उच्चपदस्थ व्यक्तीने उत्तर कोरियाला भेट दिली आहे. 15 आणि 16 मे असा त्यांनी उत्तर कोरियाचा दौरा केला. 

प्योंगयांग- परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी अचानक उत्तर कोरियाला भेट दिली. उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग येथे जाऊन त्यांनी कोरियन सरकारच्या विविध अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. 1998 नंतर प्रथमच भारतातील उच्चपदस्थ व्यक्ती उत्तर कोरियाला गेली आहे. 15 आणि 16 मे असा त्यांनी उत्तर कोरियाचा दौरा केला. सिंह यांनी उत्तर कोरियाचे परराष्ट्र आणि सांस्कृतीक कार्य मंत्री किम योंग दाए यांची भेट घेतली व विविध राजकीय, प्रादेशिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतीक सहकार्य अशा विषयांवर त्यांनी चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने नुकत्याच दक्षिण कोरियासोबत झालेल्या चर्चेबद्दल सिंह यांना माहिती दिली त्याचप्रमाणे सिंह यांनीही उत्तर कोरिया व पाकिस्तान यांच्यामधिल संबंधांचा विषय उपस्थित केला. भारताच्या शेजारील देशात (पाकिस्तानात) कोणत्याही प्रकारे अण्वस्त्रांची वाढ होणे भारतासाठी काळजीचा मुद्दा आहे असे मत सिंह यांनी व्यक्त केले. त्यावर  भारताला कोणत्याही प्रकारचा सुरक्षेच्या बाबतीत प्रश्नास सामोरे जावे लागणार नाही असे आश्वासन उत्तर कोरियातर्फे दिले गेले. यावेळेस भारताचे उत्तर कोरियातील राजदूत अतुल गोतसुर्वे यांनी आपल्या पदासाठी मान्यतापत्र (क्रिडेन्शिअल) उत्तर कोरियाच्या पिपल्स असेम्ब्लीचे अध्यक्ष किम योंग नाम यांना सादर केली. सोमवारीच गोतसुर्वे यांनी पदभार स्वीकारला आहे.व्ही. के. सिंह यांनी अचानक उत्तर कोरियाला भेट दिल्याने आणि त्या भेटीबाबत गुप्तता पाळल्याने भारत या देशाशी आपले संबंध पूर्ववत करण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगण्यात येत आहे.  मार्च 2017मध्ये भारताने अन्न आणि औषधे वगळता इतर कोणत्याही वस्तूंचा उत्तर कोरियाशी व्यापार करण्यावर बंदी घातली होती. अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांमध्ये उत्तर कोरियावर सर्वपरीने बंदी घालण्याची विनंती केली होती. तसेच उत्तर कोरियात प्योंगयांग येथे असणाऱ्या दुतावासाला बंद करण्याची विनंती अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट रेक्स टिलरसन यांनी केली होती. त्या विनंतीला भारताला नाकारले होते. अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यामध्ये तणाव निवळत असल्याचे दिसताच भारताने आपल्या धोरणामध्ये बदल केल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :north koreaउत्तर कोरियाIndiaभारत