शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

गलवान हिंसा: चीनी सैनिकांच्या मृत्यूबाबत प्रश्न विचाराल तर तुरुंगात जाल!; चीनचा नवा कायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 17:22 IST

गलवान खोऱ्यात (Galwan Valley Clash) भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर बराच काळ चीननं आपल्या सैनिकांच्या मृत्यूबाबतची माहिती दडवून ठेवली होती.

गलवान खोऱ्यात (Galwan Valley Clash) भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर बराच काळ चीननं आपल्या सैनिकांच्या मृत्यूबाबतची माहिती दडवून ठेवली होती. जूनमध्ये झालेल्या या घटनेनंतर तब्बल ८ महिन्यांनी चीननं नुकतंच या हिंसाचारात चीनचे सैनिक मारले गेल्याचं अधिकृतरित्या मान्य केलं. पण आता यात मारले गेलेल्या चीनी सैनिकांबाबत प्रश्न विचारणं हा गुन्हा ठरवणारा एक कायदा चीनमध्ये लागू करण्यात आला आहे. 

१ मार्चपासून चीनमध्ये एक नवा कायदा लागू करण्यात आला आहे. यात सोशल मीडियावर किंवा इंटरनेटवर कुठंही सैनिकांच्या मृत्यूबाबत प्रश्न विचारणाऱ्यांना कमीत कमी तीन वर्षांची शिक्षेची तरतूद केली आहे. चीनच्या म्हणण्यानुसार गलवान खोऱ्यातील संघर्षात चार सैनिक मारले गेले आहेत. पण भारतानं चीनचे अनेक सैनिक ठार झाल्याचा दावा केला आहे. भारतीय लष्करातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दाव्यानुसार चीनचे २० हून अधिक सैनिक झटापटीत मारले गेले होते. 

एका ब्लॉगरला तुरुंगवासाची शिक्षागेल्याच महिन्यात लिटिल स्पायसी पेन बॉल नावाचा ब्लॉग लिहिणाऱ्या किऊ जिमिंग याला चीनकडून अटक करण्यात आली होती. त्यानं आपल्या ब्लॉगमध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षात चीनी सैनिकांच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. "चीनी सैनिकांचा मृत्यू आपल्या साथीदार सैनिकांचे प्राण वाचवताना झाला असं जर असेल तर असे आणखी काही सैनिक असतील की ज्यांना वाचविण्यात यश आलं नाही. म्हणजेच यात अनेक सैनिक दगावले असू शकतात", असं या ब्लॉगरनं लिहिलं होतं. सोशल मीडियात या ब्लॉगरचे तब्बल २५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. गलवान हिंसेवर प्रश्न उपस्थित केल्याप्रकरणी या ब्लॉगरला आता तीन वर्षांपर्यंतची शिक्षा होण्याची शक्यता आहे. 

आतापर्यंत ६ जणांना शिक्षाचीनी सैनिक शहीद झाल्याच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे किंवा सरकारला सवाल विचारण्याच्या आरोपाखाली आतापर्यंत ६ जणांना अक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षासाठी बलिदान देणाऱ्यांनाही 'क्रांतिकारी' आणि 'शहीदा'चा दर्जा दिला जातो आणि याबाबत सवाल उपस्थित करणाऱ्यांना अटक केली जाते.  

टॅग्स :chinaचीनIndian Armyभारतीय जवान