शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

सैरभैर पाकिस्तानचा फुसका बार; जुन्याच क्षेपणास्त्राची चाचणी नवी, पुन्हा काढले 'गझनवी'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 12:39 IST

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानं पाकिस्तान किती सैरभैर झाला आहे, हे आपण रोजच पाहत आहोत.

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानं पाकिस्तान किती सैरभैर झाला आहे, हे आपण रोजच पाहत आहोत. आपल्या हातातून आता पाकव्याप्त काश्मीरही जाणार, भारत ते काढून घेणार, या भीतीनं त्यांची झोपही उडालीय. म्हणूनच रोज नवनव्या 'पुड्या' सोडण्याचा कार्यक्रम पाकिस्तानी नेत्यांनी सुरू केलाय. त्यातच त्यांनी आज पुढचं पाऊल टाकलं. अनेक चाचण्या केलेल्या 'गझनवी' क्षेपणास्त्राची चाचणी त्यांनी पुन्हा एकदा केली. आम्हाला कमी लेखू नका, हे भारत सरकारला, लष्कराला सांगण्याचाच त्यांचा हा प्रयत्न आहे. परंतु, ही धडपड हास्यास्पदच ठरलीय.  

जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं गझनवी क्षेपणास्त्र २९० किलोमीटरपर्यंत मारा करू शकतं. अण्वस्त्र वाहून नेण्याचीही या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. या क्षेपणास्त्राची चाचणी रात्री करण्यात आल्याचं ट्विट पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी केलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लगेचच या यशस्वी चाचणीबद्दल सैन्याचं अभिनंदनही केलंय. ही चाचणी म्हणजे भारताला इशारा देण्यासाठी केवळ दिखावा असल्याचं स्पष्ट होतं.

आम्हाला डिवचू नका, अन्यथा युद्ध करू, अणुहल्ला करू, अशी दर्पोक्ती पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह पाकचे बरेच नेते करत आहेत. पाकिस्तानचे मंत्री शेख रशीद यांनी तर युद्धाची तारीखही जाहीर केलीय. ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या महिन्यात भारत-पाकिस्तान यांच्या युद्ध होण्याची शक्यता आहे. त्यासाठी जनतेला सतर्क करण्यासाठी मी याठिकाणी आलो आहे. पाकिस्तानी लष्कराकडे जी हत्यारे आहेत ती फक्त दाखविण्यासाठी नाही तर त्याचा वापर करण्यासाठी आहे असा इशारा शेख रशीद यांनी भारताला दिला आहे. 

जम्मू-काश्मीरमधील कलम-३७० हटवणं पाकिस्तानच्या भलतंच जिव्हारी लागल्याचं या विधानांमधून लक्षात येतं. काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करण्यासाठी त्यांचं अमेरिका, चीनपुढे रडगाणंही गाऊन झालंय. परंतु, त्यांचं खरं रूप अनेकदा जगासमोर आल्यानं कुणीच त्यांची बाजू घ्यायला तयार नाही. सगळ्याच महासत्ता भारताच्या पाठीशी उभ्या राहिल्यानं तर ते अधिकच बिथरले आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानIndiaभारतArticle 370कलम 370