शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 11:46 IST

पाकिस्तानमध्ये चार हिंदू मुलींचे अपहरण झाल्याचे समोर आले असून मुलीच्या आईने जबरदस्तीने धर्म बदलल्याचा आरोप केला आहे.

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात हिंदूंवरील अत्याचाराची एक घटना समोर आली आहे. येथील शहदादपूरमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण करण्यात आले आणि त्यांना जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. २२ वर्षीय जिया बाई, २० वर्षीय दिया बाई आणि १६ वर्षीय दिशा बाई यांच्याव्यतिरिक्त, या तीन बहिणींचा १३ वर्षीय भाऊ हरजीत कुमार याचे अपहरण करून जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. या घटनेमुळे स्थानिक हिंदू समुदायात संतापाची लाट उसळली आहे आणि पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून मुलांची आईने न्यायाची मागणी केली आहे.

Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील आहे. शाहदादपूर येथे एका हिंदू कुटुंबातील चार भावंडांचे अपहरण झाले होते. पीडितांच्या आईने स्थानिक संगणक शिक्षक फरहान खासखेलीवर मुलांना आमिष दाखवून पळवून नेल्याचा आरोप केला. "मला तीन मुली होत्या आणि फरहानने त्या सर्वांना घेऊन गेला," असे तिने डोळ्यात अश्रू आणत सांगितले. आईने तिच्या १३ वर्षांच्या मुलाला परत आणण्याची विनंती केली,  यावेळी त्या म्हणाल्या की, इतक्या लहान वयात धर्म समजू शकत नाही. तिने पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये या मुलांचे तथाकथित "धर्मांतर" दाखवले आहे, याला अनेकांनी "सांस्कृतिक दहशतवाद" म्हटले आहे. हिंदू पंचायत प्रमुख राजेश कुमार यांनी ही घटना केवळ कौटुंबिक शोकांतिका नसून एक सामुदायिक आपत्ती असल्याचे म्हटले. त्यांनी पीडितांचे फोटो शेअर केले आहेत. 'ही मुले स्वेच्छेने धर्म बदलण्याचा निर्णय घेण्याइतकी प्रौढ आहेत का?', असा प्रश्न उपस्थित केला आहे. 

पोलिसांची कारवाई आणि पाक मीडियाचा दावा

पाकिस्तानी मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार, कुटुंबाच्या निषेधानंतर पोलिसांनी या मुलांना शहदादपूर येथील न्यायालयात हजर केले. दोन प्रौढ मुलींना आश्रयगृहात पाठवण्याचे आदेश देण्यात आले, तर एका अल्पवयीन मुली आणि मुलाला त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. पाक मीडियाचा दावा आहे की या चार भावंडांनी कोणत्याही दबावाशिवाय स्वेच्छेने धर्म बदलला आहे. पोलिसांच्या दबावामुळे मुले घाबरली आहेत असे कुटुंबाचे म्हणणे आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत