शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 11:46 IST

पाकिस्तानमध्ये चार हिंदू मुलींचे अपहरण झाल्याचे समोर आले असून मुलीच्या आईने जबरदस्तीने धर्म बदलल्याचा आरोप केला आहे.

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात हिंदूंवरील अत्याचाराची एक घटना समोर आली आहे. येथील शहदादपूरमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण करण्यात आले आणि त्यांना जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. २२ वर्षीय जिया बाई, २० वर्षीय दिया बाई आणि १६ वर्षीय दिशा बाई यांच्याव्यतिरिक्त, या तीन बहिणींचा १३ वर्षीय भाऊ हरजीत कुमार याचे अपहरण करून जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. या घटनेमुळे स्थानिक हिंदू समुदायात संतापाची लाट उसळली आहे आणि पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून मुलांची आईने न्यायाची मागणी केली आहे.

Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील आहे. शाहदादपूर येथे एका हिंदू कुटुंबातील चार भावंडांचे अपहरण झाले होते. पीडितांच्या आईने स्थानिक संगणक शिक्षक फरहान खासखेलीवर मुलांना आमिष दाखवून पळवून नेल्याचा आरोप केला. "मला तीन मुली होत्या आणि फरहानने त्या सर्वांना घेऊन गेला," असे तिने डोळ्यात अश्रू आणत सांगितले. आईने तिच्या १३ वर्षांच्या मुलाला परत आणण्याची विनंती केली,  यावेळी त्या म्हणाल्या की, इतक्या लहान वयात धर्म समजू शकत नाही. तिने पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये या मुलांचे तथाकथित "धर्मांतर" दाखवले आहे, याला अनेकांनी "सांस्कृतिक दहशतवाद" म्हटले आहे. हिंदू पंचायत प्रमुख राजेश कुमार यांनी ही घटना केवळ कौटुंबिक शोकांतिका नसून एक सामुदायिक आपत्ती असल्याचे म्हटले. त्यांनी पीडितांचे फोटो शेअर केले आहेत. 'ही मुले स्वेच्छेने धर्म बदलण्याचा निर्णय घेण्याइतकी प्रौढ आहेत का?', असा प्रश्न उपस्थित केला आहे. 

पोलिसांची कारवाई आणि पाक मीडियाचा दावा

पाकिस्तानी मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार, कुटुंबाच्या निषेधानंतर पोलिसांनी या मुलांना शहदादपूर येथील न्यायालयात हजर केले. दोन प्रौढ मुलींना आश्रयगृहात पाठवण्याचे आदेश देण्यात आले, तर एका अल्पवयीन मुली आणि मुलाला त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. पाक मीडियाचा दावा आहे की या चार भावंडांनी कोणत्याही दबावाशिवाय स्वेच्छेने धर्म बदलला आहे. पोलिसांच्या दबावामुळे मुले घाबरली आहेत असे कुटुंबाचे म्हणणे आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत