शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

PM मोदींच्या पॉडकास्टनंतर पाकिस्तानची फडफड सुरू; माजी उच्चायुक्तांनी गरळ ओकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 21:53 IST

नवाज शरीफ यांनी भारताने जी मागणी केली त्याचा स्वीकार करत नवी दिल्लीत कुठल्याही फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतली नाही असंही अब्दुल बासित यांनी सांगितले.

इस्लामाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन पॉडकास्टरच्या मुलाखतीत नवाज शरीफ आणि पाकिस्तान दौऱ्याबाबत केलेल्या विधानावरून पाकिस्तानची फडफड सुरू झाली आहे. पाकिस्तानी परराष्ट्र धोरणाचे तज्ज्ञ आणि भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी व्हिडिओ जारी करत भारताविरोधात गरळ ओकली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीत जे सांगितले ते पूर्ण सत्य नाही. पाकिस्तानशी संबंध सुधारावेत असं भारताला बिल्कुल वाटत नाही. जर भारत काश्मीर मुद्दा सोडवते, तर पाकिस्तानसोबत कुठलाही वादाचा मुद्दा राहणार नाही असंही बासित यांनी म्हटलं आहे.

अब्दुल बासित यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॉडकास्टमध्ये पाकिस्तानसोबतच्या नात्यावर जे काही बोलले ते एकतर्फी आहे. मोदी यांनी त्यांच्या पहिल्या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना बोलावले होते, परंतु त्यांना एकट्याला बोलावले नव्हते. सार्क देशांचे जितके राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांना आमंत्रण दिले होते. जर ते नवाज शरीफांना एकट्याला बोलावलं असते तर मानलं असते. परंतु या गोष्टीचं कौतुक करायला हवं की जेव्हा नवाज शरीफांना आमंत्रण आले तेव्हा इस्लामाबादच्या एका लॉबीने, लोकांनी त्यांना विरोध केला तरीही शरीफ भारतात गेले असं त्यांनी म्हटलं.

फुटीरतावादी नेत्यांना न भेटण्याची अट

तसेच जेव्हा नवाज शरीफ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला भारतात येणार होते, तेव्हा मी भारतात उच्चायुक्त होतो. माझ्या माहितीत नाही परंतु त्यावेळी नवाज शरीफ यांनी भारतात कुठल्याही फुटीरतावादी नेत्यांना भेटू नये असं भारताने मागणी केली होती. यापूर्वी पाकिस्तानी पंतप्रधान भारतात आल्यानंतर फुटिरतावादी नेत्यांना भेटण्याची परंपरा होती. परंतु नवाज शरीफ यांनी भारताने जी मागणी केली त्याचा स्वीकार करत नवी दिल्लीत कुठल्याही फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतली नाही असंही अब्दुल बासित यांनी सांगितले.

भाजपाच्या 'जाहीरनामा'वर डागली तोफ

दरम्यान, बासित यांनी पाकिस्तानशी संबंध सुधारण्याबाबत मोदींचे विधान भाजपाच्या जाहीरनाम्याशी जोडले आहे. जर भारताला पाकिस्तानशी संबंध सुधारायची इच्छा होती मग भाजपाने त्यांच्या जाहीरनाम्यात काश्मीरातून कलम ३७० हटवणे का लिहिले होते, भाजपा आणि पंतप्रधान मोदींना वाटते, त्यांच्या अटींवर पाकिस्तानशी संबंध सुधारायला हवेत. काश्मीरचा जो मुख्य मुद्दा आहे त्यातून पाकिस्तानने हटावे. काश्मीर सोडून बोलावे असं भारताला वाटते, परंतु तसे होऊ शकत नाही असं अब्दुल बासित यांनी व्हिडिओत म्हटलं.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी