शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

PM मोदींच्या पॉडकास्टनंतर पाकिस्तानची फडफड सुरू; माजी उच्चायुक्तांनी गरळ ओकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 21:53 IST

नवाज शरीफ यांनी भारताने जी मागणी केली त्याचा स्वीकार करत नवी दिल्लीत कुठल्याही फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतली नाही असंही अब्दुल बासित यांनी सांगितले.

इस्लामाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन पॉडकास्टरच्या मुलाखतीत नवाज शरीफ आणि पाकिस्तान दौऱ्याबाबत केलेल्या विधानावरून पाकिस्तानची फडफड सुरू झाली आहे. पाकिस्तानी परराष्ट्र धोरणाचे तज्ज्ञ आणि भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी व्हिडिओ जारी करत भारताविरोधात गरळ ओकली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीत जे सांगितले ते पूर्ण सत्य नाही. पाकिस्तानशी संबंध सुधारावेत असं भारताला बिल्कुल वाटत नाही. जर भारत काश्मीर मुद्दा सोडवते, तर पाकिस्तानसोबत कुठलाही वादाचा मुद्दा राहणार नाही असंही बासित यांनी म्हटलं आहे.

अब्दुल बासित यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॉडकास्टमध्ये पाकिस्तानसोबतच्या नात्यावर जे काही बोलले ते एकतर्फी आहे. मोदी यांनी त्यांच्या पहिल्या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना बोलावले होते, परंतु त्यांना एकट्याला बोलावले नव्हते. सार्क देशांचे जितके राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांना आमंत्रण दिले होते. जर ते नवाज शरीफांना एकट्याला बोलावलं असते तर मानलं असते. परंतु या गोष्टीचं कौतुक करायला हवं की जेव्हा नवाज शरीफांना आमंत्रण आले तेव्हा इस्लामाबादच्या एका लॉबीने, लोकांनी त्यांना विरोध केला तरीही शरीफ भारतात गेले असं त्यांनी म्हटलं.

फुटीरतावादी नेत्यांना न भेटण्याची अट

तसेच जेव्हा नवाज शरीफ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला भारतात येणार होते, तेव्हा मी भारतात उच्चायुक्त होतो. माझ्या माहितीत नाही परंतु त्यावेळी नवाज शरीफ यांनी भारतात कुठल्याही फुटीरतावादी नेत्यांना भेटू नये असं भारताने मागणी केली होती. यापूर्वी पाकिस्तानी पंतप्रधान भारतात आल्यानंतर फुटिरतावादी नेत्यांना भेटण्याची परंपरा होती. परंतु नवाज शरीफ यांनी भारताने जी मागणी केली त्याचा स्वीकार करत नवी दिल्लीत कुठल्याही फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतली नाही असंही अब्दुल बासित यांनी सांगितले.

भाजपाच्या 'जाहीरनामा'वर डागली तोफ

दरम्यान, बासित यांनी पाकिस्तानशी संबंध सुधारण्याबाबत मोदींचे विधान भाजपाच्या जाहीरनाम्याशी जोडले आहे. जर भारताला पाकिस्तानशी संबंध सुधारायची इच्छा होती मग भाजपाने त्यांच्या जाहीरनाम्यात काश्मीरातून कलम ३७० हटवणे का लिहिले होते, भाजपा आणि पंतप्रधान मोदींना वाटते, त्यांच्या अटींवर पाकिस्तानशी संबंध सुधारायला हवेत. काश्मीरचा जो मुख्य मुद्दा आहे त्यातून पाकिस्तानने हटावे. काश्मीर सोडून बोलावे असं भारताला वाटते, परंतु तसे होऊ शकत नाही असं अब्दुल बासित यांनी व्हिडिओत म्हटलं.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी