शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 22:45 IST

"पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताला पाकिस्तानविरुद्ध स्वसंरक्षणार्थ कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे," असे जॉन बोल्टन यांनी म्हटले आहे...

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडूनपाकिस्तानविरुद्ध करण्यात येत असलेल्या कारवाईसंदर्भात अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) जॉन बोल्टन यांनी मोठे विधान केले आहे. "दक्षिण आशियात व्यापक संघर्ष बघण्याची कुणाचीही इच्छा नाही. मात्र, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतालापाकिस्तानविरुद्ध स्वसंरक्षणार्थ कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे," असे जॉन बोल्टन यांनी म्हटले आहे.

आयएएनएसला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत बोल्टन म्हणाले, "जम्मू आणि काश्मीरमधील लोकांना स्थिर वातावरणात जगू दिले जात नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे. सीमेपलीकडून सातत्याने दहशतवादी कारवाया करून पर्यटकांना या प्रदेशात जाण्यापासून रोखले जात आहे."

पुलवामा हल्ल्यावेळी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते बोल्टन -पुलवामा येथे फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान बोल्टन हे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत होते. हा हल्ला पाकिस्तानस्थित दहशतवादी गट जैश-ए-मोहम्मदने केला होता. या हल्ल्यात ४० सीआरपीएफच्या जवानांना हौतात्म्य आले होते. 

भारताला स्वसंरक्षणार्थ कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार -बोल्टन म्हणाले, "मी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असताना, आम्हाला २०१९ मध्ये अशाच परिस्थितींचा सामना करावा लागला होता. तेव्हा पाकिस्तानी भूमीतून दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी आम्ही वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा केली होती. त्यावेळी, जर भारत सरकारला विश्वास असेल की, हा हल्ला पाकिस्तानी भूमीतून झाला, पाकिस्तान सरकार तो रोखण्यास अयशस्वी ठरले अथवा पाकस्तानने त्यास काही मदत केली, तर नवी दिल्लीला स्वसंरक्षणार्थ कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे," असा आमचा दृष्टिकोन होता

दक्षिण आशियात व्यापक संघर्ष पाहण्याची कुणाचीही इच्छा नाही - संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेचे माजी राजदूत बोल्टन म्हणाले,  "मला वाटते, हाच सिद्धांत आजही लागू होतो. माझ्या मते, जर सैन् कारवाईचा निर्णय घेतला गेला तर तो योग्य सिद्ध करणारी कारणेही त्यांच्याकडे असायला हवीत, हे भारताच्या हिताचे आहे. दक्षिण आशियात व्यापक संघर्ष बघण्याची कुणाचीही इच्छा नाही. मात्र, दहशतवादी हल्ल्यांचा धोका, ही अशी गोष्ट आहे, जी कुणीही सहन करू नये. यामुळे, प्रत्युत्तर आणि स्वसंरक्षण पूर्णपणे स्वीकार्य आहे."

जम्मू-काश्मिरातील पहलगाममधील बैसरन व्हॅलीमध्ये २२ एप्रिलला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर धर्म विचारून गोळीबार केला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.

 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादAmericaअमेरिका