शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
4
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
5
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
6
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
7
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
9
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
10
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
11
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
12
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
13
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
14
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
15
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
16
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
17
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
18
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
19
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
20
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?

"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 22:45 IST

"पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताला पाकिस्तानविरुद्ध स्वसंरक्षणार्थ कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे," असे जॉन बोल्टन यांनी म्हटले आहे...

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडूनपाकिस्तानविरुद्ध करण्यात येत असलेल्या कारवाईसंदर्भात अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) जॉन बोल्टन यांनी मोठे विधान केले आहे. "दक्षिण आशियात व्यापक संघर्ष बघण्याची कुणाचीही इच्छा नाही. मात्र, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतालापाकिस्तानविरुद्ध स्वसंरक्षणार्थ कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे," असे जॉन बोल्टन यांनी म्हटले आहे.

आयएएनएसला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत बोल्टन म्हणाले, "जम्मू आणि काश्मीरमधील लोकांना स्थिर वातावरणात जगू दिले जात नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे. सीमेपलीकडून सातत्याने दहशतवादी कारवाया करून पर्यटकांना या प्रदेशात जाण्यापासून रोखले जात आहे."

पुलवामा हल्ल्यावेळी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते बोल्टन -पुलवामा येथे फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान बोल्टन हे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत होते. हा हल्ला पाकिस्तानस्थित दहशतवादी गट जैश-ए-मोहम्मदने केला होता. या हल्ल्यात ४० सीआरपीएफच्या जवानांना हौतात्म्य आले होते. 

भारताला स्वसंरक्षणार्थ कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार -बोल्टन म्हणाले, "मी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असताना, आम्हाला २०१९ मध्ये अशाच परिस्थितींचा सामना करावा लागला होता. तेव्हा पाकिस्तानी भूमीतून दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी आम्ही वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा केली होती. त्यावेळी, जर भारत सरकारला विश्वास असेल की, हा हल्ला पाकिस्तानी भूमीतून झाला, पाकिस्तान सरकार तो रोखण्यास अयशस्वी ठरले अथवा पाकस्तानने त्यास काही मदत केली, तर नवी दिल्लीला स्वसंरक्षणार्थ कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे," असा आमचा दृष्टिकोन होता

दक्षिण आशियात व्यापक संघर्ष पाहण्याची कुणाचीही इच्छा नाही - संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेचे माजी राजदूत बोल्टन म्हणाले,  "मला वाटते, हाच सिद्धांत आजही लागू होतो. माझ्या मते, जर सैन् कारवाईचा निर्णय घेतला गेला तर तो योग्य सिद्ध करणारी कारणेही त्यांच्याकडे असायला हवीत, हे भारताच्या हिताचे आहे. दक्षिण आशियात व्यापक संघर्ष बघण्याची कुणाचीही इच्छा नाही. मात्र, दहशतवादी हल्ल्यांचा धोका, ही अशी गोष्ट आहे, जी कुणीही सहन करू नये. यामुळे, प्रत्युत्तर आणि स्वसंरक्षण पूर्णपणे स्वीकार्य आहे."

जम्मू-काश्मिरातील पहलगाममधील बैसरन व्हॅलीमध्ये २२ एप्रिलला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर धर्म विचारून गोळीबार केला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.

 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादAmericaअमेरिका