शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Pakistan Flood : पाकिस्तानमध्ये हाहाकार! पुराचे पाणी काढून टाकण्यासाठी लागू शकतात 6 महिने; 3 कोटी लोक बेघर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 16:35 IST

Pakistan Flood : सिंध हा पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झालेला प्रांत आहे, जिथे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. देशभरातील 1396 मृत्यूंपैकी 578 मृत्यू एकट्या सिंधमध्ये झाले आहेत.

पाकिस्तान सध्या पुराच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. आजूबाजूला पाणी आणि पाणी दिसत आहे. लोक अन्नपाण्यासाठी तडफडत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. दरम्यान, पाकिस्तान सरकारने पाण्यामुळे अराजकता कशी निर्माण होत आहे हे सांगितले आहे आणि शहरांमधून पुराचे पाणी काढण्यासाठी किमान 6 महिने लागू शकतात असेही म्हटले आहे. 

पुरामुळे पाकिस्तानमध्ये सुमारे 3 कोटी लोक बेघर झाले आहेत. डॉनमधील वृत्तानुसार, पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी रविवारी सांगितले की, प्रांतातील पूरग्रस्त भागातून पाणी बाहेर काढण्यासाठी तीन ते सहा महिने लागतील. मात्र, पुराचे पाणी रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची धडपड सुरू असल्याचेही ते म्हणाले. सिंध हा पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झालेला प्रांत आहे, जिथे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. देशभरातील 1396 मृत्यूंपैकी 578 मृत्यू एकट्या सिंधमध्ये झाले आहेत.

देशभरात एकूण 12728 लोक जखमी

एनडीएमएच्या ताज्या अपडेटनुसार, सिंधमध्ये जखमींची संख्या 8321 आहे, तर देशभरात एकूण 12728 लोक जखमी झाले आहेत. कराचीमध्ये माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सद्यस्थिती आणि भीषण पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी संपूर्ण जगाला एकत्र यायला हवे, असे ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनीही जगाला पाकिस्तानला मदत करण्याचे आवाहन केले आहे.

सुमारे 35 मिलियन लोक विस्थापित

सुमारे 35 मिलियन लोक विस्थापित झाले आहेत, तर लाखो एकर सुपीक जमिनीला पुराचा फटका बसला आहे. ते पुढे म्हणाले की, सिंधमधील शेतकऱ्यांचे सुमारे 3.5 अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे, तर पशुधन क्षेत्राचे 50 अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे. काही भागात किमान आठ ते दहा फूट पाणी आहे. 

यंदा सरासरीपेक्षा 10-11 पट पाऊस

मुराद अली शाह म्हणाले की, पाकिस्तानात यावर्षी अभूतपूर्व पाऊस झाला आहे. यंदा सरासरीपेक्षा 10-11 पट पाऊस झाला. सरकार लोकांच्या पुनर्वसनावर आणि प्रांतातील मलनिस्सारण ​​आणि सिंचन नेटवर्कवर काम करत आहे. पाणी बाहेर यायला तीन ते सहा महिने लागतील असे आम्हाला वाटते. सिंधच्या मुख्यमंत्र्यांनी देखील कबूल केले की प्रांतात तंबू आणि औषधांचा तुटवडा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानfloodपूर