शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

सौदी अरेबियात नोक-यांमध्ये भूमिपुत्रांना पहिला हक्क! भारतीयांवर येणार गदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 12:56 IST

सौदी अरेबियाने त्यांच्या निताकत या श्रम धोरणात महत्वपूर्ण बदल केला आहे. या सुधारणेमुळे भविष्यात नोकरीच्या उद्देशाने सौदीमध्ये जाण्याची इच्छा असलेल्या भारतीयांच्या अडचणी वाढणार आहेत.

ठळक मुद्देसौदीमधील कंपन्यांनी नोकरीत जास्तीत जास्त स्थानिकांना प्राधान्य दिले तर, भारतीयांच्या नोक-यांवर गदा येईल. सौदी अरेबियात परदेशातून वास्तव्यास आलेल्या प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला 100 रियालची डिपेंडट फी भरावी लागणार आहे.

रियाध, दि. 24 - सौदी अरेबियाने त्यांच्या निताकत या श्रम धोरणात महत्वपूर्ण बदल केला आहे. या सुधारणेमुळे भविष्यात नोकरीच्या उद्देशाने सौदीमध्ये जाण्याची इच्छा असलेल्या भारतीयांच्या अडचणी वाढणार आहेत. सौदी सरकारने निताकतमध्ये केलेल्या बदलामुळे तिथल्या स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापासून सौदीमधील हायग्रेडच्या काही ठराविक कंपन्यांना त्यांच्याकडे असलेली सौदी कर्मचा-यांची संख्या आणि अन्य निकषांच्या आधारावर परदेशी कर्मचा-यांच्या व्हिसासाठी अर्ज करता येतील. 

या निर्णयामुळे सौदीमधील कंपन्यांनी नोकरीत जास्तीत जास्त स्थानिकांना प्राधान्य दिले तर, भारतीयांच्या नोक-यांवर गदा येईल. सौदीमध्ये वेगवेगळया सेक्टरमध्ये लाखो भारतीय नोकरी करत आहेत. 2016 मध्ये सौदीमध्ये नोकरी करणा-या भारतीयांची संख्या 25 लाख होती. लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती देण्यात आली होती. मागच्या काही महिन्यात सौदीमध्ये नोकरी करणा-या भारतीयांची संख्या कमी झाली आहे. 

2016 मध्ये सौदी अरेबियाचे 1.65 लाख व्हिसा मंजूर करण्यात आले होते. 2015 च्या तुलनेत त्यात 46 टक्क्यांनी घट झाली होती. उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यांमधून दरवर्षी मोठया संख्येने तरुण नोकरीसाठी सौदी अरेबियाला जातात.  

सौदीत कुटुंब करसौदी अरेबियात येत्या 1 जुलैपासून कुटुंब कर लागू झाला आहे. त्यामुळे तिथे नोकरीच्या निमित्ताने राहणारे भारतीय आपल्या कुटुंबाला मायदेशी पाठवण्याची तयारीत आहेत. सौदी अरेबियात परदेशातून वास्तव्यास आलेल्या प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला 100 रियालची डिपेंडट फी भरावी लागणार आहे. 100 रियाल म्हणजे सरासरी 1700 रुपये होतात. या करामुळे आर्थिक बोजा वाढणार असल्याने भारतीय आपल्या कुटुंबाला मायदेशी पाठवण्यावर गांर्भीयाने विचार करत आहेत.  

सौदी अरेबियात 41 लाख भारतीय वास्तव्यास आहेत. सौदी अरेबियात राहण्याचा खर्च परवडणार नसल्याने काही कुटुंबांनी हैदराबादला परतण्याचा निर्णय घेतलाय असे मोहम्मद ताहिरने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. दामाम येथे राहणारा ताहिर पेशाने संगणक तज्ञ आहे. मागच्या चार महिन्यात अनेकांनी आपल्या कुटुंबाला माघारी पाठवून दिले आहे अशी माहिती स्थलांतरीताच्या हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते भीम रेड्डी मंधा यांनी दिली.