शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

सौदी अरेबियात नोक-यांमध्ये भूमिपुत्रांना पहिला हक्क! भारतीयांवर येणार गदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 12:56 IST

सौदी अरेबियाने त्यांच्या निताकत या श्रम धोरणात महत्वपूर्ण बदल केला आहे. या सुधारणेमुळे भविष्यात नोकरीच्या उद्देशाने सौदीमध्ये जाण्याची इच्छा असलेल्या भारतीयांच्या अडचणी वाढणार आहेत.

ठळक मुद्देसौदीमधील कंपन्यांनी नोकरीत जास्तीत जास्त स्थानिकांना प्राधान्य दिले तर, भारतीयांच्या नोक-यांवर गदा येईल. सौदी अरेबियात परदेशातून वास्तव्यास आलेल्या प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला 100 रियालची डिपेंडट फी भरावी लागणार आहे.

रियाध, दि. 24 - सौदी अरेबियाने त्यांच्या निताकत या श्रम धोरणात महत्वपूर्ण बदल केला आहे. या सुधारणेमुळे भविष्यात नोकरीच्या उद्देशाने सौदीमध्ये जाण्याची इच्छा असलेल्या भारतीयांच्या अडचणी वाढणार आहेत. सौदी सरकारने निताकतमध्ये केलेल्या बदलामुळे तिथल्या स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापासून सौदीमधील हायग्रेडच्या काही ठराविक कंपन्यांना त्यांच्याकडे असलेली सौदी कर्मचा-यांची संख्या आणि अन्य निकषांच्या आधारावर परदेशी कर्मचा-यांच्या व्हिसासाठी अर्ज करता येतील. 

या निर्णयामुळे सौदीमधील कंपन्यांनी नोकरीत जास्तीत जास्त स्थानिकांना प्राधान्य दिले तर, भारतीयांच्या नोक-यांवर गदा येईल. सौदीमध्ये वेगवेगळया सेक्टरमध्ये लाखो भारतीय नोकरी करत आहेत. 2016 मध्ये सौदीमध्ये नोकरी करणा-या भारतीयांची संख्या 25 लाख होती. लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती देण्यात आली होती. मागच्या काही महिन्यात सौदीमध्ये नोकरी करणा-या भारतीयांची संख्या कमी झाली आहे. 

2016 मध्ये सौदी अरेबियाचे 1.65 लाख व्हिसा मंजूर करण्यात आले होते. 2015 च्या तुलनेत त्यात 46 टक्क्यांनी घट झाली होती. उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यांमधून दरवर्षी मोठया संख्येने तरुण नोकरीसाठी सौदी अरेबियाला जातात.  

सौदीत कुटुंब करसौदी अरेबियात येत्या 1 जुलैपासून कुटुंब कर लागू झाला आहे. त्यामुळे तिथे नोकरीच्या निमित्ताने राहणारे भारतीय आपल्या कुटुंबाला मायदेशी पाठवण्याची तयारीत आहेत. सौदी अरेबियात परदेशातून वास्तव्यास आलेल्या प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला 100 रियालची डिपेंडट फी भरावी लागणार आहे. 100 रियाल म्हणजे सरासरी 1700 रुपये होतात. या करामुळे आर्थिक बोजा वाढणार असल्याने भारतीय आपल्या कुटुंबाला मायदेशी पाठवण्यावर गांर्भीयाने विचार करत आहेत.  

सौदी अरेबियात 41 लाख भारतीय वास्तव्यास आहेत. सौदी अरेबियात राहण्याचा खर्च परवडणार नसल्याने काही कुटुंबांनी हैदराबादला परतण्याचा निर्णय घेतलाय असे मोहम्मद ताहिरने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. दामाम येथे राहणारा ताहिर पेशाने संगणक तज्ञ आहे. मागच्या चार महिन्यात अनेकांनी आपल्या कुटुंबाला माघारी पाठवून दिले आहे अशी माहिती स्थलांतरीताच्या हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते भीम रेड्डी मंधा यांनी दिली.