शहरं
Join us  
Trending Stories
1
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
11
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
12
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
13
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
14
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
15
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
16
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
17
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
18
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
19
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
20
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
Daily Top 2Weekly Top 5

सौदी अरेबियात नोक-यांमध्ये भूमिपुत्रांना पहिला हक्क! भारतीयांवर येणार गदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 12:56 IST

सौदी अरेबियाने त्यांच्या निताकत या श्रम धोरणात महत्वपूर्ण बदल केला आहे. या सुधारणेमुळे भविष्यात नोकरीच्या उद्देशाने सौदीमध्ये जाण्याची इच्छा असलेल्या भारतीयांच्या अडचणी वाढणार आहेत.

ठळक मुद्देसौदीमधील कंपन्यांनी नोकरीत जास्तीत जास्त स्थानिकांना प्राधान्य दिले तर, भारतीयांच्या नोक-यांवर गदा येईल. सौदी अरेबियात परदेशातून वास्तव्यास आलेल्या प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला 100 रियालची डिपेंडट फी भरावी लागणार आहे.

रियाध, दि. 24 - सौदी अरेबियाने त्यांच्या निताकत या श्रम धोरणात महत्वपूर्ण बदल केला आहे. या सुधारणेमुळे भविष्यात नोकरीच्या उद्देशाने सौदीमध्ये जाण्याची इच्छा असलेल्या भारतीयांच्या अडचणी वाढणार आहेत. सौदी सरकारने निताकतमध्ये केलेल्या बदलामुळे तिथल्या स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापासून सौदीमधील हायग्रेडच्या काही ठराविक कंपन्यांना त्यांच्याकडे असलेली सौदी कर्मचा-यांची संख्या आणि अन्य निकषांच्या आधारावर परदेशी कर्मचा-यांच्या व्हिसासाठी अर्ज करता येतील. 

या निर्णयामुळे सौदीमधील कंपन्यांनी नोकरीत जास्तीत जास्त स्थानिकांना प्राधान्य दिले तर, भारतीयांच्या नोक-यांवर गदा येईल. सौदीमध्ये वेगवेगळया सेक्टरमध्ये लाखो भारतीय नोकरी करत आहेत. 2016 मध्ये सौदीमध्ये नोकरी करणा-या भारतीयांची संख्या 25 लाख होती. लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती देण्यात आली होती. मागच्या काही महिन्यात सौदीमध्ये नोकरी करणा-या भारतीयांची संख्या कमी झाली आहे. 

2016 मध्ये सौदी अरेबियाचे 1.65 लाख व्हिसा मंजूर करण्यात आले होते. 2015 च्या तुलनेत त्यात 46 टक्क्यांनी घट झाली होती. उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यांमधून दरवर्षी मोठया संख्येने तरुण नोकरीसाठी सौदी अरेबियाला जातात.  

सौदीत कुटुंब करसौदी अरेबियात येत्या 1 जुलैपासून कुटुंब कर लागू झाला आहे. त्यामुळे तिथे नोकरीच्या निमित्ताने राहणारे भारतीय आपल्या कुटुंबाला मायदेशी पाठवण्याची तयारीत आहेत. सौदी अरेबियात परदेशातून वास्तव्यास आलेल्या प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला 100 रियालची डिपेंडट फी भरावी लागणार आहे. 100 रियाल म्हणजे सरासरी 1700 रुपये होतात. या करामुळे आर्थिक बोजा वाढणार असल्याने भारतीय आपल्या कुटुंबाला मायदेशी पाठवण्यावर गांर्भीयाने विचार करत आहेत.  

सौदी अरेबियात 41 लाख भारतीय वास्तव्यास आहेत. सौदी अरेबियात राहण्याचा खर्च परवडणार नसल्याने काही कुटुंबांनी हैदराबादला परतण्याचा निर्णय घेतलाय असे मोहम्मद ताहिरने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. दामाम येथे राहणारा ताहिर पेशाने संगणक तज्ञ आहे. मागच्या चार महिन्यात अनेकांनी आपल्या कुटुंबाला माघारी पाठवून दिले आहे अशी माहिती स्थलांतरीताच्या हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते भीम रेड्डी मंधा यांनी दिली.