शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

सौदी अरेबियात नोक-यांमध्ये भूमिपुत्रांना पहिला हक्क! भारतीयांवर येणार गदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 12:56 IST

सौदी अरेबियाने त्यांच्या निताकत या श्रम धोरणात महत्वपूर्ण बदल केला आहे. या सुधारणेमुळे भविष्यात नोकरीच्या उद्देशाने सौदीमध्ये जाण्याची इच्छा असलेल्या भारतीयांच्या अडचणी वाढणार आहेत.

ठळक मुद्देसौदीमधील कंपन्यांनी नोकरीत जास्तीत जास्त स्थानिकांना प्राधान्य दिले तर, भारतीयांच्या नोक-यांवर गदा येईल. सौदी अरेबियात परदेशातून वास्तव्यास आलेल्या प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला 100 रियालची डिपेंडट फी भरावी लागणार आहे.

रियाध, दि. 24 - सौदी अरेबियाने त्यांच्या निताकत या श्रम धोरणात महत्वपूर्ण बदल केला आहे. या सुधारणेमुळे भविष्यात नोकरीच्या उद्देशाने सौदीमध्ये जाण्याची इच्छा असलेल्या भारतीयांच्या अडचणी वाढणार आहेत. सौदी सरकारने निताकतमध्ये केलेल्या बदलामुळे तिथल्या स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापासून सौदीमधील हायग्रेडच्या काही ठराविक कंपन्यांना त्यांच्याकडे असलेली सौदी कर्मचा-यांची संख्या आणि अन्य निकषांच्या आधारावर परदेशी कर्मचा-यांच्या व्हिसासाठी अर्ज करता येतील. 

या निर्णयामुळे सौदीमधील कंपन्यांनी नोकरीत जास्तीत जास्त स्थानिकांना प्राधान्य दिले तर, भारतीयांच्या नोक-यांवर गदा येईल. सौदीमध्ये वेगवेगळया सेक्टरमध्ये लाखो भारतीय नोकरी करत आहेत. 2016 मध्ये सौदीमध्ये नोकरी करणा-या भारतीयांची संख्या 25 लाख होती. लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती देण्यात आली होती. मागच्या काही महिन्यात सौदीमध्ये नोकरी करणा-या भारतीयांची संख्या कमी झाली आहे. 

2016 मध्ये सौदी अरेबियाचे 1.65 लाख व्हिसा मंजूर करण्यात आले होते. 2015 च्या तुलनेत त्यात 46 टक्क्यांनी घट झाली होती. उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यांमधून दरवर्षी मोठया संख्येने तरुण नोकरीसाठी सौदी अरेबियाला जातात.  

सौदीत कुटुंब करसौदी अरेबियात येत्या 1 जुलैपासून कुटुंब कर लागू झाला आहे. त्यामुळे तिथे नोकरीच्या निमित्ताने राहणारे भारतीय आपल्या कुटुंबाला मायदेशी पाठवण्याची तयारीत आहेत. सौदी अरेबियात परदेशातून वास्तव्यास आलेल्या प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला 100 रियालची डिपेंडट फी भरावी लागणार आहे. 100 रियाल म्हणजे सरासरी 1700 रुपये होतात. या करामुळे आर्थिक बोजा वाढणार असल्याने भारतीय आपल्या कुटुंबाला मायदेशी पाठवण्यावर गांर्भीयाने विचार करत आहेत.  

सौदी अरेबियात 41 लाख भारतीय वास्तव्यास आहेत. सौदी अरेबियात राहण्याचा खर्च परवडणार नसल्याने काही कुटुंबांनी हैदराबादला परतण्याचा निर्णय घेतलाय असे मोहम्मद ताहिरने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. दामाम येथे राहणारा ताहिर पेशाने संगणक तज्ञ आहे. मागच्या चार महिन्यात अनेकांनी आपल्या कुटुंबाला माघारी पाठवून दिले आहे अशी माहिती स्थलांतरीताच्या हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते भीम रेड्डी मंधा यांनी दिली.