शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपवर श्रीलंकेने घातली बंदी; दोन धर्मीयांत तणाव, देशभर सहा तासांची संचारबंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 5:20 AM

फेसबुकवरील एका पोस्टमुळे मशिदींवर तसेच मुस्लिमांच्या मालकीच्या व्यवसायांवर हल्ले सुरू झाले आणि धार्मिक तणाव भडकल्यामुळे श्रीलंकेने समाजमाध्यमांवर सोमवारी बंदी घातली.

कोलंबो : फेसबुकवरील एका पोस्टमुळे मशिदींवर तसेच मुस्लिमांच्या मालकीच्या व्यवसायांवर हल्ले सुरू झाले आणि धार्मिक तणाव भडकल्यामुळे श्रीलंकेने समाजमाध्यमांवर सोमवारी बंदी घातली.श्रीलंकेत सतत हिंसाचार पसरत चालल्यामुळे सोमवारी अधिकाऱ्यांनी संपूर्ण देशभर सहा तासांची संचारबंदी लागू केली आहे. सोमवारी रात्री नऊ ते पहाटे चार वाजेपर्यंत ही संचारबंदी राहील, असे पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले.ईस्टर संडेला झालेल्या हल्ल्यांनंतरची ही सगळ्यात मोठी सामाजिक अशांतता आहे. ईस्टर संडेच्या हल्ल्यांत २६० जण ठार तर ५०० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. देशाच्या पश्चिम किनाºयावरील गाव चिलावमध्ये जमावाने मशिदीवर व मुस्लिमांच्या मालकीच्या काही दुकानांवर हल्ले केल्यानंतर श्रीलंकेच्या पोलिसांनी दुसºया दिवशी गावात संचारबंदी लागू केली व त्यानंतर समाजमाध्यमांवर बंदी घालण्यात आली. (वृत्तसंस्था)आणखी हसू नका...एका मुस्लिम दुकानदाराने फेसबुकवर पोस्ट टाकल्यानंतर वादाला सुरुवात झाली होती. फेसबुकवर पोस्ट टाकणाºयाचे नाव अब्दुल हमीद मोहम्मद हासमर (३८) असे असून, त्याने ‘आणखी हसू नका, एकेदिवशी तुम्ही रडाल’ असे त्या पोस्टमध्ये म्हटले होते.मुस्लिम दुकानदाराच्या या टिपणीला स्थानिक ख्रिश्चन्स आणखी हल्ले होणार आहेत, अशी धमकी समजले. अल्पसंख्य मुस्लिम आणि बहुसंख्य सिंहली समाजात हिंसक घटना सुरू होताच मध्यरात्रीपासून फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली.रविवारी सायंकाळी उशिरा कुलियापित्यामध्ये मशीद आणि मुस्लिमांची मालकी असलेल्या काही दुकानांवर हल्ले झाल्यानंतर अशांतता पसरली व अधिकाऱ्यांनी वायव्येकडील शहरात संचारबंदी लागू केली होती. कुलियापित्या आणि चिलावमधील संचारबंदी मागे घेण्यात आल्याचे पोलिसांचे प्रवक्ते रुवान गुणसेकरा यांनी सांगितले.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंका