शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

आफ्रिकेत 'दीक्षितांचं राज्य' ? भारतीय तरुणाची कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 09:37 IST

आपण राजा असतो तर किती बरं झालं असतं, असं तुमच्या आमच्या मनात सतत येत असतं. लहानपणापासूनची ही राजा होण्याची सुप्त इच्छा मनात सतत घोळत असते. पण इंदोरच्या सुयश दीक्षित या तरुणाने आफ्रिकेतील एका भूमीवर स्वतःचे राज्य स्थापन करुन संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करुन टाकलंय.

मुंबई- आपण राजा असतो तर किती बरं झालं असतं, असं तुमच्या आमच्या मनात सतत येत असतं. लहानपणापासूनची ही राजा होण्याची सुप्त इच्छा मनात सतत घोळत असते. पण इंदोरच्या सुयश दीक्षित या तरुणाने आफ्रिकेतील एका भूमीवर स्वतःचे राज्य स्थापन करुन संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करुन टाकलंय. त्याने तेथे स्वतःच्या राज्याचा झेंडा तर रोवलाच तर त्या राज्याला 'किंग्डम ऑफ दीक्षित' म्हणजे 'दीक्षितांचं राज्य' असं नावच देऊन टाकलं आहे. 

बीर ताविल नावाचा एक भूभाग गेली अनेक वर्षे सुदान आणि इजिप्त यांच्यामध्ये आहे. दोन्ही देशांनी दोन वेगवेगळ्या सीमांना प्रमाण मानल्यामुळे हा ८०० चौ मैलांचा भाग तसाच राहिला. दोन्हीही देशांनी हा भाग आपला नसल्याचे सांगून त्यावर स्वामित्त्व हक्क सांगितला नाही. बीर ताविलवर कोणीही राहात नाही कारण ते पूर्णतः वाळंवट आहे. सुयशने इजिप्तमार्गे तेथे प्रवेश केला आणि त्या प्रदेशाचा तो राजा बनला आहे. सुयशने आपल्या वडिलांकडे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लष्कर प्रमुख ही पदे सोपवली आहेत. तेथे त्याला वाळंवटात जगणारी पाल हा एकमेव प्राणी दिसल्याने त्या पालीला सुयशने राष्ट्रीय पशू जाहीर केले आहे. त्याच्या राज्यात जातपात नसेल आणि भारतीय चलन चालेल असं स्पष्ट करत त्याने किंग्डम ऑफ दीक्षित नावाने संकेतस्थळ काढून नव्या नागरिकत्वासाठी लोकांना अर्ज करण्यास सांगितले आहे.

आता राजा व्हायचं तर तिथल्या मातीवर शेतीद्वारे तुमचा हक्क असला पाहिजे , मग या पठ्ठ्याने तेथे दोन बिया खोचून, बाटलीतले पाणी देऊन आपण येथे शेती करत असल्याचेही जाहीर करुन टाकले.  सुयशला हे राजा होणं सहजासहजी साध्य झालेलं नाही. मोठ्या हिकमतीनं तो तेथे पोहोचला. आंतरराष्ट्रीय सीमा असल्यामुळे व दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे शूट अॅट साईटच्या ऑर्डर्सही तेथे होत्या. पण इजिप्तच्या पोलिसांना वारंवार विनंती करुन आणि आपण तेथे फिरायला जातोय असे सांगून ३१८ किमीचा खडतर प्रवास त्याने पूर्ण केला आणि त्याचं राजा होण्याचं  स्वप्न पूर्ण झालं. या नवजात देशात लोकसंख्या कमी असल्यामुळे व्यापार आणि रोजगाराची संधी नक्कीच असणार, त्यामुळे तुम्हीही नागरिकत्वाचा विचार करु शकता.