शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सगळे काही ‘मेड इन चायना’, त्यामुळेच भारतात बेरोजगारी; राहुल गांधींचा परदेशातून निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 07:22 IST

राहुल गांधी यांचा अमेरिकेतील विद्यार्थी, भारतीयांशी संवाद

वॉशिंग्टन : “जगभरात सर्व काही ‘मेड इन चायना’ आहे. जागतिक उत्पादनात चीनची आघाडी आहे, त्यामुळेच तेथे बेरोजगारीचा प्रश्न कमी आहे. या उलट परिस्थिती पश्चिमी देश आणि भारतात असल्यामुळे तेथे बेरोजगारीची समस्या मोठी आहे”, असे सांगत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतात निर्मितीवर भर द्यायला हवा यावर भर दिला.

अमेरिकेच्या चार दिवसांच्या दौऱ्यादरम्यान टेक्सास विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल म्हणाले की, भारतात कौशल्याची कमतरता नाही, त्याला फक्त निर्मितीशी जोडले तर देश चीनशी स्पर्धा करू शकतो. देशात व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन दिले पाहिजे. “तुम्ही १९४०,१८५०, १९६० चा अमेरिका पाहिल्यास लक्षात येईल की, या काळात अमेरिका जगाचे उत्पादन केंद्र होते. सध्या चीनचे त्यावर वर्चस्व आहे. पश्चिमी देश, अमेरिका, भारताने उत्पादन निर्मितीकडे दुर्लक्ष करून ते चीनकडे दिले. उत्पादन निर्मितीतूनच रोजगार निर्मिती होते, भारताला याबाबत विचार करावा लागेल,” असे राहुल म्हणाले. 

भारतीय राजकारणात प्रेम, आदर, नम्रतेचा जाणवतो अभावभारतीय राजकारणात प्रेम, आदर, नम्रतेचा अभाव आहे, अशी खंत राहुल यांनी टेक्सासमधील भारतीय समुदायाशी संवाद साधताना व्यक्त केली. ‘भारत हा एक विचार आहे’, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) विचारसरणीवरही त्यांनी टीका केली. ‘भारत हा एक विचार आहे, असे आरएसएस मानते, परंतु भारत हा विविध विचारांचा विविधतेने नटलेला देश आहे, असे आम्ही मानतो.आम्ही अमेरिकेसारखेच आहोत, जेथे प्रत्येकाला सहभागाची संधी दिली पाहिजे, असे मानले जाते”, असे ते म्हणाले.

राहुल लोकशाहीवरील काळा डाग : भाजपराहुल गांधी हे भारतीय लोकशाहीवरील काळा डाग आहेत,” अशी टीका अमेरिका दौऱ्यातील त्यांच्या वक्तव्यावरून भाजपने केली. राहुल यांच्यावर लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करीत गौरव भाटिया यांनी राहुल गांधी हे अपरिपक्व आणि अंशकालीन नेते असल्याची टीका केली.

‘राहुल गांधी आता बनले रणनीतीकार’‘राहुल गांधी आता पप्पू राहिले नाहीत, तर ते आता सखोल विचार असणारे, उच्च शिक्षित रणनीतीकार बनले आहेत,” असे मत सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केले. “राहुल गांधींची विचारसरणी सर्वसमावेशक आहे. त्यांच्याकडे असा दृष्टिकोन आहे की भाजपकडून कोट्यवधी रुपये खर्चून प्रसार करण्यात येत असलेल्या दृष्टिकोनापेक्षा तो वेगळा आहे,” असे ते म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा