शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

Emergency in Pakistan: पाकिस्तानातील परिस्थिती बिघडली, शहबाज कॅबिनेटची आणीबाणीची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 15:45 IST

पाकिस्तानात सध्या परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या मंत्रिमंडळानं आणीबाणी लागू करण्याची शिफारस केलीये.

पाकिस्तानातील सध्याची परिस्थिती पाहता आणीबाणी लागू केली जाऊ शकते. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत देशात आणीबाणी लागू करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज यांनी फेडरल कॅबिनेटला संबोधित केलं. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान आणि त्यांचा पक्ष दोघेही खोटे असल्याचे ते यावेळी म्हणाले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांचं सरकार पाडल्याच्या वृत्ताचंही खंडन केलं.

“पीटीआय देशाला विनाशाकडे घेऊन जात आहे. यापूर्वीच देश अनेक आव्हानांचा सामना करत आहे. त्यात आता असं केलं जात आहे. आपलं चलन मोठ्या प्रमाणात घसरलंय. आम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोय,” असं शहबाज शरीफ म्हणाले. यावेळी त्यांनी इम्रान खान यांच्यावर थेट हल्लाबोल केला. गेल्या सरकारनं आयएमएफसोबतच्या करारांचं उल्लंघन केलंय. आता ते ठीक करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे ते म्हणाले.

न्यायालयांवरही प्रश्नचिन्ह

यावेळी आपल्या मंत्रिमंडळाला संबोधित करताना त्यांनी न्यायालयांवरही प्रश्न उपस्थित केले. इम्रान खान यांच्या सरकारनं आमच्या पक्षाच्या नेत्यांवर सूड उगवला होता तेव्हा न्यायालयं शांत होती. जेव्हा आम्हाला तुरुंगात पाठवलं जात होतं तेव्हा न्यायालयांनी याची दखल घेतली का? असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान