शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

पाकिस्तान आता 'भिकाऱ्यांचा' देश, कर्जाचे सर्व दरवाजे बंद होताच श्रीमंत बोऱ्या बिस्तरा गुंडाळू लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 16:43 IST

पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिंक संकटात सापडला आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. कर्जाचे सर्व दरवाजे बंद झाले असून आता पुन्हा महागाई वाढत आहे.

पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिंक संकटात सापडला आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. कर्जाचे सर्व दरवाजे बंद झाले असून आता पुन्हा महागाई वाढत आहे. चिकन ८०० रुपये किलो तर दुधाचे दरही वाढले आहेत. दिवाळखोरीच्या भीतीने देशातील श्रीमंतांनी देश सोडण्यास सुरुवात केली आहे. 

आर्थिक परिस्थितीमुळे पाकिस्तानने आतापर्यंत जगभरातून अब्जावधी रुपयांचे कर्ज घेतले आहे. देशाचे एकूण कर्ज आणि दायित्वे ६० ट्रिलियन पाकिस्तानी रुपयांपेक्षा जास्त आहेत. हे देशाच्या जीडीपीच्या ८९ टक्के आहे.  यापैकी सुमारे ३५ टक्के कर्ज हे केवळ चीनचे आहे, त्यात चीनच्या सरकारी बँकांच्या कर्जाचाही समावेश आहे. पाकिस्तानचे चीनचे ३० डॉलर अब्ज कर्ज आहे, जे फेब्रुवारी २०२२ मध्ये २५.१ अब्ज डॉलर होते. चीनने पाकिस्तानला दिलेली मदत ही आयएमएफच्या कर्जाच्या तिप्पट आणि जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेच्या निधीपेक्षा जास्त आहे. आता जर पाकिस्तान दिवाळखोरीत निघाला तर त्याची सर्वात मोठा फटका चीनवर होणार आहे.

तूप-तेल, दूध आणि महागाईच्या टंचाईशी झगडणाऱ्या पाकिस्तानी जनतेसाठी रोज सकाळी वाईट बातमी येत आहे. पाकिस्तानातील महागाई आणि खाद्यपदार्थांच्या टंचाईमागे रोख रकमेची कमतरता हे प्रमुख कारण आहे. पाकिस्तानच्या सरकारी बँका आयातदारांना क्रेडिटचे पत्र द्यायला तयार नाहीत, कारण त्यांना पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीची कल्पना आहे आणि हीच स्थिती राहिल्यास गंभीर परिस्थिती होणार आहे.

आता पाकिस्तान सोडून श्रीमंत लोक जात आहेत. पाकिस्तानातून परदेशात जाणाऱ्यांच्या संख्येत अचानक वाढ होत आहे. पाकिस्तानमध्ये २०२२ मध्ये ८३२,३३९ लोकांनी देश सोडला. २०१६ नंतरचा हा सर्वात मोठा आकडा आहे. २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये देश सोडून जाणाऱ्या पाकिस्तानींच्या संख्येत जवळपास २००% वाढ झाली आहे. पाकिस्तानला दिवाळखोरीपासून वाचवण्यासाठी शेहबाज शरीफ सरकारने कर लादून आणि सबसिडी बंद करुन १७० अब्ज रुपये साठी घोषणा केली होती. पण, या आदेशाला  राष्ट्रपतींनी शाहबाज यांच्या अध्यादेशाला मान्यता देण्यास नकार दिला. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानInflationमहागाई