शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या स्तनपानामुळे भारताला होईल 90 हजार कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 18:45 IST

वेगवेगळ्या कारणांमुळे तान्ह्या मुलांना स्तनपान करण्याचे प्रमाण गेल्या काही काळात कमालीचे घटले आहे. भारतातही आपल्या मुलांना स्तनपान करणाऱ्या महिलांची संख्या घटली आहे. मात्र  मुलांना होणारे अपुऱे स्तनपान भारतासाठी जबर आर्थिक नुकसानकारक ठरण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देभारतात आपल्या मुलांना स्तनपान करणाऱ्या महिलांची संख्या घटली आहे. मात्र  मुलांना होणारे अपुऱे स्तनपान भारतासाठी जबर आर्थिक नुकसानकारक ठरण्याची शक्यता आहे. देशात दरवर्षी सुमारे एक लाख मुलांचा विविध आजारांची शिकार होऊन मृत्यू होत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार या मुलांना योग्य प्रमाणात स्तनपान करण्यात आले तर त्यांच्या मृत्यू टाळता येऊ शकेल. चीन, भारत, नायजेरिया, मॅक्सिको आणि इंडोनेशिया या देशांमध्ये अपुऱ्या स्तनपानामुळे दरवर्षी 2 लाख 36 हजार मुलांचा मृत्यू होतो. या मृत्युंमुळे या देशांना येत्या काळात दरवर्षी 119 अब्ज डॉलर सुमारे 7.59 लाख कोटी रुपये एवढे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

संयुक्त राष्ट्रे, दि. 2 - वेगवेगळ्या कारणांमुळे तान्ह्या मुलांना स्तनपान करण्याचे प्रमाण गेल्या काही काळात कमालीचे घटले आहे. भारतातही आपल्या मुलांना स्तनपान करणाऱ्या महिलांची संख्या घटली आहे. मात्र  मुलांना होणारे अपुऱे स्तनपान भारतासाठी जबर आर्थिक नुकसानकारक ठरण्याची शक्यता आहे. देशात दरवर्षी सुमारे एक लाख मुलांचा विविध आजारांची शिकार होऊन मृत्यू होत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार या मुलांना योग्य प्रमाणात स्तनपान करण्यात आले तर त्यांच्या मृत्यू टाळता येऊ शकेल. अपुऱ्या स्तनपानामुळे होत असलेल्या आकस्मिक मृत्युमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला तब्बल 14 अब्ज डॉलरचे (सुमारे 89.446 हजार कोटी रुपयांचे) नुकसान होऊ शकते, असे या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.   ग्लोबल ब्रेस्टफिडिंग कलेटिव्हच्या सहकार्याने युनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटनेने ग्लोबल ब्रेस्टफिडिंग स्कोअरकार्डच्या नवा अहवाल तयार केला आहे. स्तनपानामुळे बालमृत्यूची दोन मोठी कारणे असलेल्या अतिसार आणि न्यूमोनिया यांना अटकाव करण्यासाठी मदत मिळते. तसेच महिलांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरणाऱ्या ओवरी आणि स्तनाच्या कर्करोगापासून महिलांचे संरक्षण होऊ शकते, असे या अहवालात म्हटले आहे.  केवळ चीन, भारत, नायजेरिया, मॅक्सिको आणि इंडोनेशिया या देशांमध्ये अपुऱ्या स्तनपानामुळे दरवर्षी 2 लाख 36 हजार मुलांचा मृत्यू होतो. या मृत्युंमुळे या देशांना येत्या काळात दरवर्षी 119 अब्ज डॉलर सुमारे 7.59 लाख कोटी रुपये एवढे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. सहा महिन्यांपेक्षा लहान मुलांना स्तनपानाचे प्रमाण 55 टक्क्यांहून अधिक असूनही भारतात बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामध्ये पाच वर्षांहून कमी वयाच्या मुलांचे प्रमाण अधिक आहे, असे हा अहवाल सांगतो. अतिसार आणि न्युमोनियामुळे भारतात दरवर्षी सुमारे 99 हजार 499 मुलांचा मृत्यू होत असतो. या मुलांना योग्य प्रमाणात स्तनपान केल्यास त्यांचे मृत्यू टाळता येतील.  कमी स्तनपानामुळे तान्ह्या मुलांसोबतच कर्करोग आणि टाइप-2 प्रकारच्या डायबिटीसशी झुंजत असलेल्या महिलांच्या मृत्युमुळेही देशाच्या अर्थव्यवस्थेला 7 अब्ज डॉलर एवढे नुकसान होण्याचा अंदाज आहे. तसेच या नुकसानामुळे देशाच्या जीडीपीमध्ये 0.70 टक्के घट होण्याची शक्यता आहे.