शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

अपुऱ्या स्तनपानामुळे भारताला होईल 90 हजार कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 18:45 IST

वेगवेगळ्या कारणांमुळे तान्ह्या मुलांना स्तनपान करण्याचे प्रमाण गेल्या काही काळात कमालीचे घटले आहे. भारतातही आपल्या मुलांना स्तनपान करणाऱ्या महिलांची संख्या घटली आहे. मात्र  मुलांना होणारे अपुऱे स्तनपान भारतासाठी जबर आर्थिक नुकसानकारक ठरण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देभारतात आपल्या मुलांना स्तनपान करणाऱ्या महिलांची संख्या घटली आहे. मात्र  मुलांना होणारे अपुऱे स्तनपान भारतासाठी जबर आर्थिक नुकसानकारक ठरण्याची शक्यता आहे. देशात दरवर्षी सुमारे एक लाख मुलांचा विविध आजारांची शिकार होऊन मृत्यू होत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार या मुलांना योग्य प्रमाणात स्तनपान करण्यात आले तर त्यांच्या मृत्यू टाळता येऊ शकेल. चीन, भारत, नायजेरिया, मॅक्सिको आणि इंडोनेशिया या देशांमध्ये अपुऱ्या स्तनपानामुळे दरवर्षी 2 लाख 36 हजार मुलांचा मृत्यू होतो. या मृत्युंमुळे या देशांना येत्या काळात दरवर्षी 119 अब्ज डॉलर सुमारे 7.59 लाख कोटी रुपये एवढे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

संयुक्त राष्ट्रे, दि. 2 - वेगवेगळ्या कारणांमुळे तान्ह्या मुलांना स्तनपान करण्याचे प्रमाण गेल्या काही काळात कमालीचे घटले आहे. भारतातही आपल्या मुलांना स्तनपान करणाऱ्या महिलांची संख्या घटली आहे. मात्र  मुलांना होणारे अपुऱे स्तनपान भारतासाठी जबर आर्थिक नुकसानकारक ठरण्याची शक्यता आहे. देशात दरवर्षी सुमारे एक लाख मुलांचा विविध आजारांची शिकार होऊन मृत्यू होत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार या मुलांना योग्य प्रमाणात स्तनपान करण्यात आले तर त्यांच्या मृत्यू टाळता येऊ शकेल. अपुऱ्या स्तनपानामुळे होत असलेल्या आकस्मिक मृत्युमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला तब्बल 14 अब्ज डॉलरचे (सुमारे 89.446 हजार कोटी रुपयांचे) नुकसान होऊ शकते, असे या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.   ग्लोबल ब्रेस्टफिडिंग कलेटिव्हच्या सहकार्याने युनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटनेने ग्लोबल ब्रेस्टफिडिंग स्कोअरकार्डच्या नवा अहवाल तयार केला आहे. स्तनपानामुळे बालमृत्यूची दोन मोठी कारणे असलेल्या अतिसार आणि न्यूमोनिया यांना अटकाव करण्यासाठी मदत मिळते. तसेच महिलांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरणाऱ्या ओवरी आणि स्तनाच्या कर्करोगापासून महिलांचे संरक्षण होऊ शकते, असे या अहवालात म्हटले आहे.  केवळ चीन, भारत, नायजेरिया, मॅक्सिको आणि इंडोनेशिया या देशांमध्ये अपुऱ्या स्तनपानामुळे दरवर्षी 2 लाख 36 हजार मुलांचा मृत्यू होतो. या मृत्युंमुळे या देशांना येत्या काळात दरवर्षी 119 अब्ज डॉलर सुमारे 7.59 लाख कोटी रुपये एवढे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. सहा महिन्यांपेक्षा लहान मुलांना स्तनपानाचे प्रमाण 55 टक्क्यांहून अधिक असूनही भारतात बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामध्ये पाच वर्षांहून कमी वयाच्या मुलांचे प्रमाण अधिक आहे, असे हा अहवाल सांगतो. अतिसार आणि न्युमोनियामुळे भारतात दरवर्षी सुमारे 99 हजार 499 मुलांचा मृत्यू होत असतो. या मुलांना योग्य प्रमाणात स्तनपान केल्यास त्यांचे मृत्यू टाळता येतील.  कमी स्तनपानामुळे तान्ह्या मुलांसोबतच कर्करोग आणि टाइप-2 प्रकारच्या डायबिटीसशी झुंजत असलेल्या महिलांच्या मृत्युमुळेही देशाच्या अर्थव्यवस्थेला 7 अब्ज डॉलर एवढे नुकसान होण्याचा अंदाज आहे. तसेच या नुकसानामुळे देशाच्या जीडीपीमध्ये 0.70 टक्के घट होण्याची शक्यता आहे.