शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरुन ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान ठरले अपात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 13:35 IST

उपपंतप्रधान बार्नबी जॉयस हे आता पोटनिवडणुकीत उभे राहू शकतात. जर मतदारांनी निवडणूकीत त्यांना पुन्हा कौल दिला नाही तर सध्याचे सरकार कोसळू शकते.

ठळक मुद्देस्कॉटिश वडिलांमुळे ब्रिटिश नागरिकत्त्व मिळालेल्या मंत्री फियोना नॅश यांचाही पात्रता गमावलेल्या सदस्यांमध्ये समावेश आहे.मॅट कॅनावान यांचे आजी-आजोबा इटालियन होते पण त्यांची आई ऑस्ट्रेलियात जन्मास आली असल्यामुळे यांचे पद शाबूत राहिले आहे

कॅनबेरा- ऑस्ट्रेलियाचा उच्च न्यायालयाने उपपंतप्रधान बार्नबी जॉयस आणि चार इतर सिनेटर्सना दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्द्यावर अपात्र ठरवत संसदेत प्रवेश करण्यास मज्जाव केला आहे. यामुळे संसदेत अत्यंत कमी बहुमत असलेल्या सरकारच्या अस्तित्वाला धोका पोहोचू शकतो. हा निर्णय 116 वर्षे जुन्या घटनात्मक निर्बंधाला आधार मानून घेण्यात आला आहे. बार्नबी अपात्र ठरल्यामुळे डिसेंबर महिन्यामध्ये पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. 150 सदस्यांच्या लोकप्रतिनिधी सभागृहामध्ये पंतप्रधान यांच्या आघाडीला केवळ 1 सदस्याने बहुमत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तीन दिवस झालेल्या सुनावणीनंतर कोर्टाने सहा पैकी चार सिनेटर्सना अपात्र ठरवले आहे.स्कॉटिश वडिलांमुळे ब्रिटिश नागरिकत्त्व मिळालेल्या मंत्री फियोना नॅश यांचाही पात्रता गमावलेल्या सदस्यांमध्ये समावेश आहे. तसेच दुसरे मंत्री मॅट कॅनावान यांचे आजी-आजोबा इटालियन होते पण त्यांची आई ऑस्ट्रेलियात जन्मास आली असल्यामुळे यांचे पद शाबूत राहिले आहे. मॅट यांच्याप्रमाणे निक झेनोफोन यांचेही संसदेचे सदस्यत्व कायम राहणार आहे. त्यांचे आई-वडिल सायप्रस आणि ग्रीसचे होते. या दोन्ही देशांच्या दुतावासांनी निक आमचे नागरीक नाहीत असा निर्वाळा दिला. अपात्र ठरवलेल्या सदस्यांची जागा त्यांचे पक्षातील दुसरे सहकारी घेऊ शकतात.

(संसदेतील विरोधी पक्षनेते बिल शॉर्टन यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकारवर टीका केली आहे.)

बार्नबी जॉयस हे आता पोटनिवडणुकीत उभे राहू शकतात. जर मतदारांनी निवडणूकीत त्यांना पुन्हा कौल दिला नाही तर सध्याचे सरकार कोसळू शकते. सात संसद सदस्यांनी आपल्याकडे दुहेरी नागरिकत्व आहे हे गेल्या वर्षी निवडणक लढवताना माहिती नव्हते असे कोर्टात सांगतिले. तर खटला कोर्टात जाण्यापुर्वीच दोन सिनेटर्सनी राजीनामा देणे पसंत केले होते.दुहेरी नागरिकत्वाच्या लोकांना संसदेत जाण्यापासून ऑस्ट्रेलियात घटनात्मक बंदी घातलेली आहे. परंतु ज्या देशाचे अर्ध्याहून अधिक नागरिक स्थलांतरित आहेत किंवा परदेशात जन्माला आलेल्या पालकांच्या पोटी जन्माला आले आहेत तेथे हा कायदा अयोग्य आहे असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.  सात न्यायाधिशांनी हा निर्णय दिला असून जर तो 24 तास आधी दिला गेला असता तर जॉयस यांच्यावर संसदेतून बाहेर पडण्याची नामुष्की आली आसती. संसद स्थगित झाल्यानंतर आल्यामुळे ही नामुष्की टळली.