शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

लगेचच निवडणुका नकोत, भारत युद्ध करेल; पाकिस्तानी सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिले 'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 16:18 IST

पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयामध्ये पंजाब प्रांतात विधानसभा निवडणुका घेत नसल्याबद्दलच्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे.

पाकिस्तानमध्ये प्रांतीय निवडणुका घेण्यास चालढकल करण्यामागे पाकिस्तानी सरकारने भारतावर खापर फोडले आहे. आर्थिक संकट, राजकीय अस्थिरता आणि दहशतवाद या घटनांमध्ये पाकिस्तानला भारतासोबत युद्ध होण्याची चिंता सतावत आहे. यामुळे निवडणुका घेण्यास होत असलेल्या विलंबामागे भारताशी युद्धाची भीती असल्याचे शाहबाज सरकारने सर्वोच्च न्यायालयात म्हटले आहे. 

पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयामध्ये पंजाब प्रांतात विधानसभा निवडणुका घेत नसल्याबद्दलच्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या पंजाब प्रांतातील निवडणुकांमुळे देशात अस्थिरता वाढेल आणि याचा फायदा घेऊन भारत जलविवादाचा फायदा उठवेल. तसेच इतर अनेक विवादित समस्यांचा लाभ घेऊ शकेल. भारत महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या 'ग्लोबल ग्रेट गेम'चा पाकिस्तान बळी ठरण्याची शक्यता असल्याचे पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात म्हटले आहे. 

तसेच संरक्षण मंत्रालयाने पंजाबमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या तारखेचा आदेश मागे घेण्याची मागणी केली आहे. पंजाब आणि खैबर पख्तुनख्वामध्ये विधानसभा निवडणुका झाल्या, तर इतर प्रांतातील निवडणुकांपूर्वी दहशतवादाचा धोका वाढण्याची शक्यता असल्याचे सरकारने म्हटले आहे. 

सुप्रीम कोर्टाने पंजाब विधानसभेसाठी 14 मे रोजी मतदानाची तारीख निश्चित केली आहे. निवडणूक आयोगाने 10 एप्रिलला होणारी निवडणूक 8 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली होती. 8 एप्रिल रोजी, मुख्य न्यायमूर्ती उमर अता बंदियाल यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द केला होता.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानwarयुद्ध