शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
5
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
6
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
7
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
8
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
9
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
10
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
11
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
12
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
13
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
14
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
15
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
16
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
17
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
18
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
19
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
20
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी

लगेचच निवडणुका नकोत, भारत युद्ध करेल; पाकिस्तानी सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिले 'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 16:18 IST

पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयामध्ये पंजाब प्रांतात विधानसभा निवडणुका घेत नसल्याबद्दलच्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे.

पाकिस्तानमध्ये प्रांतीय निवडणुका घेण्यास चालढकल करण्यामागे पाकिस्तानी सरकारने भारतावर खापर फोडले आहे. आर्थिक संकट, राजकीय अस्थिरता आणि दहशतवाद या घटनांमध्ये पाकिस्तानला भारतासोबत युद्ध होण्याची चिंता सतावत आहे. यामुळे निवडणुका घेण्यास होत असलेल्या विलंबामागे भारताशी युद्धाची भीती असल्याचे शाहबाज सरकारने सर्वोच्च न्यायालयात म्हटले आहे. 

पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयामध्ये पंजाब प्रांतात विधानसभा निवडणुका घेत नसल्याबद्दलच्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या पंजाब प्रांतातील निवडणुकांमुळे देशात अस्थिरता वाढेल आणि याचा फायदा घेऊन भारत जलविवादाचा फायदा उठवेल. तसेच इतर अनेक विवादित समस्यांचा लाभ घेऊ शकेल. भारत महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या 'ग्लोबल ग्रेट गेम'चा पाकिस्तान बळी ठरण्याची शक्यता असल्याचे पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात म्हटले आहे. 

तसेच संरक्षण मंत्रालयाने पंजाबमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या तारखेचा आदेश मागे घेण्याची मागणी केली आहे. पंजाब आणि खैबर पख्तुनख्वामध्ये विधानसभा निवडणुका झाल्या, तर इतर प्रांतातील निवडणुकांपूर्वी दहशतवादाचा धोका वाढण्याची शक्यता असल्याचे सरकारने म्हटले आहे. 

सुप्रीम कोर्टाने पंजाब विधानसभेसाठी 14 मे रोजी मतदानाची तारीख निश्चित केली आहे. निवडणूक आयोगाने 10 एप्रिलला होणारी निवडणूक 8 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली होती. 8 एप्रिल रोजी, मुख्य न्यायमूर्ती उमर अता बंदियाल यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द केला होता.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानwarयुद्ध