शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

लगेचच निवडणुका नकोत, भारत युद्ध करेल; पाकिस्तानी सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिले 'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 16:18 IST

पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयामध्ये पंजाब प्रांतात विधानसभा निवडणुका घेत नसल्याबद्दलच्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे.

पाकिस्तानमध्ये प्रांतीय निवडणुका घेण्यास चालढकल करण्यामागे पाकिस्तानी सरकारने भारतावर खापर फोडले आहे. आर्थिक संकट, राजकीय अस्थिरता आणि दहशतवाद या घटनांमध्ये पाकिस्तानला भारतासोबत युद्ध होण्याची चिंता सतावत आहे. यामुळे निवडणुका घेण्यास होत असलेल्या विलंबामागे भारताशी युद्धाची भीती असल्याचे शाहबाज सरकारने सर्वोच्च न्यायालयात म्हटले आहे. 

पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयामध्ये पंजाब प्रांतात विधानसभा निवडणुका घेत नसल्याबद्दलच्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या पंजाब प्रांतातील निवडणुकांमुळे देशात अस्थिरता वाढेल आणि याचा फायदा घेऊन भारत जलविवादाचा फायदा उठवेल. तसेच इतर अनेक विवादित समस्यांचा लाभ घेऊ शकेल. भारत महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या 'ग्लोबल ग्रेट गेम'चा पाकिस्तान बळी ठरण्याची शक्यता असल्याचे पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात म्हटले आहे. 

तसेच संरक्षण मंत्रालयाने पंजाबमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या तारखेचा आदेश मागे घेण्याची मागणी केली आहे. पंजाब आणि खैबर पख्तुनख्वामध्ये विधानसभा निवडणुका झाल्या, तर इतर प्रांतातील निवडणुकांपूर्वी दहशतवादाचा धोका वाढण्याची शक्यता असल्याचे सरकारने म्हटले आहे. 

सुप्रीम कोर्टाने पंजाब विधानसभेसाठी 14 मे रोजी मतदानाची तारीख निश्चित केली आहे. निवडणूक आयोगाने 10 एप्रिलला होणारी निवडणूक 8 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली होती. 8 एप्रिल रोजी, मुख्य न्यायमूर्ती उमर अता बंदियाल यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द केला होता.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानwarयुद्ध