शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

डोकलाम वादाला अवास्तव महत्त्व, चर्चेची गरज - भारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 04:02 IST

डोकलाम वाद अतिरंजक स्वरूपात समोर आणला जात असून, चीनसोबतच्या संवदेनशील मुद्यांवर यथास्थिती कायम राहावी, असे भारताचे चीनमधील राजदूत गौतम बम्बावाले यांनी स्पष्ट केले आहे.

बीजिंग: डोकलाम वाद अतिरंजक स्वरूपात समोर आणला जात असून, चीनसोबतच्या संवदेनशील मुद्यांवर यथास्थिती कायम राहावी, असे भारताचे चीनमधील राजदूत गौतम बम्बावाले यांनी स्पष्ट केले आहे.ग्लोबल टाइम्स या चिनी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, चीन-पाकिस्तान कॉरिडॉरसंबंधी(सीपीईसी)वादासह संघर्षाच्या संपूर्ण मुद्यावर चर्चा व्हायला हवी. ५० अब्ज अमेरिकन डॉलर खर्चून हा कॉरिडॉर उभारला जात आहे. डोकलाम वादामुळे दोन देशांचे संबंध बिघडले काय? या प्रश्नावर त्यांनी हा वाद अवास्तव पद्धतीने समोर आणला जात असल्याकडे लक्ष वेधले. द्विपक्षीय संबंध पाहता छोट्या वादांवर मात करण्यासाठी दोन्ही देशातील जनता आणि नेत्यांकडे मोठा अनुभव आणि समजदारी आहे, असे ते म्हणाले. डोकलाममधील घटनेनंतर भारत आणि चीनने नेतृत्वाच्या स्तरावर चर्चा करण्याची गरज आहे. डोकलामजवळ मार्ग तयार करण्यासाठी चीनने प्रयत्न चालविले असल्याच्या वृत्तावर त्यांनी थेट प्रतिक्रिया टाळली.महत्त्वाच्या संवदेनशील मुद्यांवर स्थिती कायम राहिली जावी, असेही त्यांनी सुचविले. डोकलाम वादात भारत, चीन आणि भूतान या तीन देशांचा संबंध असून, दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर उभे ठाकल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले होते. दोन देशांमध्ये युद्धाची स्थिती उभी ठाकल्यानंतर चीनने माघार घेत सैन्य परत पाठविले होते.

टॅग्स :DoklamडोकलामIndiaभारतchinaचीन