शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

डोकलाम वादाला अवास्तव महत्त्व, चर्चेची गरज - भारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 04:02 IST

डोकलाम वाद अतिरंजक स्वरूपात समोर आणला जात असून, चीनसोबतच्या संवदेनशील मुद्यांवर यथास्थिती कायम राहावी, असे भारताचे चीनमधील राजदूत गौतम बम्बावाले यांनी स्पष्ट केले आहे.

बीजिंग: डोकलाम वाद अतिरंजक स्वरूपात समोर आणला जात असून, चीनसोबतच्या संवदेनशील मुद्यांवर यथास्थिती कायम राहावी, असे भारताचे चीनमधील राजदूत गौतम बम्बावाले यांनी स्पष्ट केले आहे.ग्लोबल टाइम्स या चिनी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, चीन-पाकिस्तान कॉरिडॉरसंबंधी(सीपीईसी)वादासह संघर्षाच्या संपूर्ण मुद्यावर चर्चा व्हायला हवी. ५० अब्ज अमेरिकन डॉलर खर्चून हा कॉरिडॉर उभारला जात आहे. डोकलाम वादामुळे दोन देशांचे संबंध बिघडले काय? या प्रश्नावर त्यांनी हा वाद अवास्तव पद्धतीने समोर आणला जात असल्याकडे लक्ष वेधले. द्विपक्षीय संबंध पाहता छोट्या वादांवर मात करण्यासाठी दोन्ही देशातील जनता आणि नेत्यांकडे मोठा अनुभव आणि समजदारी आहे, असे ते म्हणाले. डोकलाममधील घटनेनंतर भारत आणि चीनने नेतृत्वाच्या स्तरावर चर्चा करण्याची गरज आहे. डोकलामजवळ मार्ग तयार करण्यासाठी चीनने प्रयत्न चालविले असल्याच्या वृत्तावर त्यांनी थेट प्रतिक्रिया टाळली.महत्त्वाच्या संवदेनशील मुद्यांवर स्थिती कायम राहिली जावी, असेही त्यांनी सुचविले. डोकलाम वादात भारत, चीन आणि भूतान या तीन देशांचा संबंध असून, दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर उभे ठाकल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले होते. दोन देशांमध्ये युद्धाची स्थिती उभी ठाकल्यानंतर चीनने माघार घेत सैन्य परत पाठविले होते.

टॅग्स :DoklamडोकलामIndiaभारतchinaचीन