शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उगाचच काश्मीरच्या विषयात पडू नका! भारताने पाकिस्तानसह सर्व इस्लामिक देशांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 12:45 IST

आमच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप करु नका असे भारताने संयुक्त राष्ट्रामध्ये इस्लामिक देशांच्या संघटनेला शुक्रवारी स्पष्टपणे सुनावले.

ठळक मुद्देओआयसीला भारताच्या अंतर्गत विषयामध्ये हस्तक्षेप करण्याचा किंवा बोलण्याचा अधिकार नाही.ओआयसीने काश्मीरच्या विषयावर पूर्णपणे चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिली आहे.

नवी दिल्ली, दि. 16 - आमच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप करु नका असे भारताने संयुक्त राष्ट्रामध्ये इस्लामिक देशांच्या संघटनेला शुक्रवारी स्पष्टपणे सुनावले. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रामध्ये काश्मीरच्या मुद्यावरुन भारताला टार्गेट केले होते. त्यासाठी पाकिस्तानने ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन म्हणजेच ओआयसी संघटनेचा आधार घेतला होता. पाकिस्तानने ओआयसी संघटनेच्यावतीने काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे भारताने थेट ओआयसीलाच ताकीद दिली आहे. 

ओआयसीला भारताच्या अंतर्गत विषयामध्ये हस्तक्षेप करण्याचा किंवा बोलण्याचा अधिकार नाही. त्यामुळे भविष्यात ओआयसीने अशा मतप्रदर्शनामध्ये पडू नये असे संयुक्त राष्ट्रातील भारताचे सचिव सुमित सेठ यांनी इस्लामिक देशांना सुनावले. पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उचलल्यानंतर भारताने आपल्या उत्तर देण्याचा अधिकार वापरुन भूमिका स्पष्ट केली. 

ओआयसीने काश्मीरच्या विषयावर पूर्णपणे चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिली आहे. आम्ही हे सर्व आरोप फेटाळून लावतो. जम्मू-काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे असे सुमित सेठ यांनी सांगितले. ओआयसी ही मुस्लिम देशांचे प्रतिनिधीत्व करणारी संघटना असून, या संघटनेत एकूण 57 देश आहेत. मागच्या काहीवर्षात ओआयसीने सातत्याने काश्मीरप्रश्नी विधाने केली आहेत. काश्मीरमध्ये मोठया प्रमाणावर मानवी हक्काचे उल्लंघऩ होत आहे असे ओआयसीने जुलै महिन्यात म्हटले होते. काश्मीर वादामुळे प्रदेशातील शांतता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण होत आहे असे त्यांचे म्हणणे आहे. 

म्यानमारमधील वांशिक तणाव तात्काळ संपवा - संयुक्त राष्ट्र सचिव

म्यानमारमध्ये सुरु असलेला वांशिक तणाव आणि रोहिंग्यावर होणारा अत्याचाक तात्काळ थांबवा अशी मागणी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणिस अँटोनियो ग्युटर्स यांनी केली आहे. म्यानमारच्या राखिन प्रांतात सुरु असलेल्या वांशिक तणाव व दंगली, जाळपोळीच्या सत्रामुळे गेल्या ११ दिवसांमध्ये १ लाख २५ हजार लोकांनी म्यानमारची सीमा ओलांडून बांगलादेशात प्रवेश केला आहे.

याबरोबरच या वांशिक तणावाचे पडसाद युनायटेड किंग्डमच्या हाऊस आँफ काँमन्समध्येही उमटले. मजूर पक्षाच्या सदस्य यास्मिन कुरेशी यांनी परराष्ट्र मंत्री मार्क फिल्ड यांना म्यानमारमधील वंशच्छेदाचा तुम्ही निषेध करणार का असा प्रश्न विचारला. त्याचप्रमाणे गेली अनेक वर्षे रोहिंग्या महिलांवर बलात्कार आणि हत्येचे सत्र सुरु असल्याचे सांगत अजूनही आंतरराष्ट्रीय समुदाय गप्प का असाही प्रश्न त्यांनी हाऊस आँफ काँमन्समध्ये केला. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान