शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद, मुस्लिम देशांकडून पाठिंबा मिळण्याची आशा नको - परराष्ट्रमंत्री महेमूद कुरेशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 03:45 IST

जम्मू आणी काश्मीरला विशेष दर्जा दिलेले कलम ३७० भारताने रद्द केल्याच्या मुद्यावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा, तसेच मुस्लिम जगाचा पाठिंबा मिळवणे हे सोपे नाही.

इस्लामाबाद : जम्मू आणी काश्मीरला विशेष दर्जा दिलेले कलम ३७० भारताने रद्द केल्याच्या मुद्यावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा, तसेच मुस्लिम जगाचा पाठिंबा मिळवणे हे सोपे नाही. त्यामुळे ‘मूर्खांच्या नंदनवनात’ राहू नये, असा सल्ला पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी आपल्या देशवासीयांना दिला आहे.पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादेत सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना कुरेशी यांनी पाकिस्तानी नागरिकांना संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या सदस्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ‘नव्या प्रकारचा संघर्ष’ सुरू करावा, असे म्हटले. ‘तुम्ही लोक मूर्खांच्या नंदनवनात जगू नका. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत कोणीही हार घेऊन स्वागताला उभे राहणार नाही. कोणीही तुमची तेथे वाट बघणार नाही,’ असे कुरेशी म्हणाले. जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तानने आम्ही त्या निर्णयाविरोधात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत दाद मागू, असे जाहीर केले होते. कलम ३७० घटनेतून रद्द करण्याचा निर्णय हा पूर्णपणे आमचा अंतर्गत विषय असल्याचे भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला स्पष्टपणे सांगून पाकिस्तानने ‘वस्तुस्थिती’ स्वीकारावी, असा सल्ला दिला आहे.कुरेशी यांनी कोणत्याही मुस्लिम देशाचे नाव न घेता सांगितले की, ‘मुस्लिम समुदायाचे पालकदेखील (गार्डियन्स आॅफ उम्माह) त्यांच्या आर्थिक हितसंबंधांमुळे काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानच्या बाजूने उभे ठाकणार नाहीत. जगात वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे हितसंबंध असतात. एक अब्जाच्या वर लोकसंख्येचा भारत हा एक मोठी बाजारपेठ आहे. अनेक लोकांनी तेथे गुंतवणूक केलेली आहे. आम्ही नेहमीच उम्माह आणि इस्लामबद्दल बोलतो; परंतु मुस्लिम समुदायाच्या पालकांनीदेखील भारतात गुंतवणूक केलेली असून, त्यांचे स्वत:चे हित तेथे आहे.’

टॅग्स :Pakistanपाकिस्तानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर