शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद, मुस्लिम देशांकडून पाठिंबा मिळण्याची आशा नको - परराष्ट्रमंत्री महेमूद कुरेशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 03:45 IST

जम्मू आणी काश्मीरला विशेष दर्जा दिलेले कलम ३७० भारताने रद्द केल्याच्या मुद्यावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा, तसेच मुस्लिम जगाचा पाठिंबा मिळवणे हे सोपे नाही.

इस्लामाबाद : जम्मू आणी काश्मीरला विशेष दर्जा दिलेले कलम ३७० भारताने रद्द केल्याच्या मुद्यावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा, तसेच मुस्लिम जगाचा पाठिंबा मिळवणे हे सोपे नाही. त्यामुळे ‘मूर्खांच्या नंदनवनात’ राहू नये, असा सल्ला पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी आपल्या देशवासीयांना दिला आहे.पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादेत सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना कुरेशी यांनी पाकिस्तानी नागरिकांना संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या सदस्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ‘नव्या प्रकारचा संघर्ष’ सुरू करावा, असे म्हटले. ‘तुम्ही लोक मूर्खांच्या नंदनवनात जगू नका. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत कोणीही हार घेऊन स्वागताला उभे राहणार नाही. कोणीही तुमची तेथे वाट बघणार नाही,’ असे कुरेशी म्हणाले. जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तानने आम्ही त्या निर्णयाविरोधात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत दाद मागू, असे जाहीर केले होते. कलम ३७० घटनेतून रद्द करण्याचा निर्णय हा पूर्णपणे आमचा अंतर्गत विषय असल्याचे भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला स्पष्टपणे सांगून पाकिस्तानने ‘वस्तुस्थिती’ स्वीकारावी, असा सल्ला दिला आहे.कुरेशी यांनी कोणत्याही मुस्लिम देशाचे नाव न घेता सांगितले की, ‘मुस्लिम समुदायाचे पालकदेखील (गार्डियन्स आॅफ उम्माह) त्यांच्या आर्थिक हितसंबंधांमुळे काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानच्या बाजूने उभे ठाकणार नाहीत. जगात वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे हितसंबंध असतात. एक अब्जाच्या वर लोकसंख्येचा भारत हा एक मोठी बाजारपेठ आहे. अनेक लोकांनी तेथे गुंतवणूक केलेली आहे. आम्ही नेहमीच उम्माह आणि इस्लामबद्दल बोलतो; परंतु मुस्लिम समुदायाच्या पालकांनीदेखील भारतात गुंतवणूक केलेली असून, त्यांचे स्वत:चे हित तेथे आहे.’

टॅग्स :Pakistanपाकिस्तानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर