शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan: खुर्ची सोडल्यानंतर अटक करु नका; राजीनामा देण्यापूर्वी इम्रान खान यांनी ठेवल्या 'या' ३ अटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 09:29 IST

सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर विरोधी पक्षातील नेते शाहबाझ खान यांनी सभागृहाच्या अध्यक्षांना अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्याचे आणि घटनेसोबत उभे राहण्याचा आवाहन केले.

पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) सरकारने नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास प्रस्ताव रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही पंतप्रधान इम्रान खान यांना सत्तेतून बाहेर पडावे लागले. पाकिस्तानी संसदेत इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठरावात त्यांच्या सरकारचा पराभव झाला. 

सुप्रिम कोर्टाने नॅशनल असेंब्ली पुन्हा स्थापित केल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव पारित झाला. त्यानंतर अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने १७४ मते पडली. त्यामुळे अविश्वास प्रस्तावाचा सामना करून पंतप्रधानपद सोडावे लागणारे इम्रान खान पहिले पंतप्रधान ठरले आहेत. दरम्यान, विरोधी पक्षांकडून नवे पंतप्रधान म्हणून नवाझ शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्याचा राष्ट्रपतींचा निर्णय फिरवत सभागृह पुन्हा स्थापित केल्यानंतर विरोधकांकडून आणण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू झाली. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर विरोधी पक्षातील नेते शाहबाझ खान यांनी सभागृहाच्या अध्यक्षांना अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्याचे आणि घटनेसोबत उभे राहण्याचा आवाहन केले. त्यानंतर परराष्ट्रमंत्री शाह मोहम्ंमद कुरेशी यांनी इम्रान खान सरकारची बाजू मांडताना विरोधी पक्षांवर परकीय शक्तींसोबत मिळून कट रचल्याचा आरोप केला. त्यानंतर सभागृहात पुन्हा गोंधळ झाला. मात्र अखेरीस मतदान होऊन त्यात इम्रान खान सरकारचा पराभव झाला.

सरकार पडण्याचे संकेत मिळू लागल्यावर इम्रान खान यांनी पंतप्रधानांचे निवासस्थान सोडले आणि ते इस्लामाबादेतील आपल्या खासगी निवासस्थानी गेले. त्यानंतर नवे पंतप्रधान म्हणून विरोधी पक्षांचे नेते आणि पीएमएल-एन चे नेते शाहबाझ शरीफ यांचे नाव निश्चित झाले आहे. इम्रान खान सरकारविरोधात विरोधाचे नेतृत्व त्यांनीच केले होते. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे. पण आपण शेवटच्या चेंडूपर्यंत खेळत राहू असं ते म्हणाले होते. त्यामुळे शेवटपर्यंत काही ना काही मार्ग निघेल अशी आशा त्यांना आहे. त्यामुळे त्यांनी आता नवीन राजकीय खेळी खेळली असून राजीनामा द्यायचं कबूल केलं आहे, पण त्यासाठी तीन अटी असल्याचं स्पष्ट केलं आहे. 

काय आहेत या तीन अटी? 

१. पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं आहे की खुर्ची सोडल्यानंतर त्यांना अटक करण्यात येऊ नये. तसेच त्यांच्या कोणत्याही मंत्र्याला अटक करण्यात येऊ नये.

२. दूसरी अट अशी आहे की शहबाज शरीफ यांच्या ठिकाणी दुसरं कोणीतरी पंतप्रधान बनायला हवं. 

३. तिसरी अट अशी आहे की त्यांना NAB अंतर्गत अटक करण्यात येऊ नये. व्होटिंग नको तर  NRO असावं अशी मागणी त्यांनी केली आहे. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान