शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

म्यानमारमधून पलायन करताना बोट उलटून 12 रोहिंग्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 17:31 IST

बांगलादेशमध्ये फिशिंग ट्रॉलरमध्ये बसून पळून जाणाऱ्या रोहिंग्यांची बोट बुडून 12 रोहिंग्यांचा मृत्यू झाला आहे. हे रोहिंग्या म्यानमारमधील अशांततेस आणि अराजकतेस कंटाळून दोन्ही देशांच्यामध्ये असणाऱ्या नेफ नदीतून पळून जात होते. तसेच या बोटीमधील 13 लोकांना वाचवण्यात यश आल्याचे बांगलादेशातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्देनेफ नदी ओलांडून बांगलादेशात जाताना रोहिंग्यांच्या बोटींनी आजवर अनेकदा अपघात झाले आहेत.बांगलादेश आणि म्यानमार यांच्यामध्ये नेफ ही नैसर्गिक सीमा आहे.

कॉक्स बझार, दि.9-  बांगलादेशमध्ये फिशिंग ट्रॉलरमध्ये बसून पळून जाणाऱ्या रोहिंग्यांची बोट बुडून 12 रोहिंग्यांचा मृत्यू झाला आहे. हे रोहिंग्या म्यानमारमधील अशांततेस आणि अराजकतेस कंटाळून दोन्ही देशांच्यामध्ये असणाऱ्या नेफ नदीतून पळून जात होते. तसेच या बोटीमधील 13 लोकांना वाचवण्यात यश आल्याचे बांगलादेशातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

रोहिंग्यांची घुसखोरी रोखण्यासाठी बीएसएफने 50 संवेदनशील ठिकाणी वाढवली गस्त, आसाममध्ये हायअलर्ट 

बांगलादेश बॉर्डर गार्डसच्या सैनिकाने सांगितल्याप्रमाणे, हे लोक अत्यंत घाबरलेले होते, त्यांना वाचवल्यावर प्रथमोपचार करण्यात आले. अन्न आणि औषधाची मदत केल्यानंतर यांना कॅम्पमध्ये ठेवण्यात आले आहे. बुडालेल्या 12 व्यक्तींचे मृतदेह बांगलादेशच्या दक्षिणेस असणाऱ्या शाह पारीर द्वीप येथे वाहून आले आहेत.

आंग सान यांची भूमिका धक्कादायक

बांगलादेशच्या स्टेट कौन्सिलर आंग सान सू की यांनी रोहिंग्यांबाबत अजूनही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. रोहिंग्या का पळून जात आहेत ते माहिती नाही असं धक्कादायक विधान त्यांनी केलं आहे. राखिन प्रांतात शांततेसाठी आमचे सरकार आधीपासून प्रयत्न करत आहे. २०१७-२२ अशी राखिनसाठी पंचवार्षिक योजनाही आम्ही केली आहे. त्यामुळे येथे रोजगार उपलब्ध होईल, शिक्षण आरोग्याच्या सुविधा वाढल्या आहेत. तसेच जेथे फक्त बोटीने जाता येत असे अशा प्रदेशातही रस्ते, वीज व पायाभूत सुविधांची सोय माझ्या सरकारने केल्या आहेत. राखिन प्रांतामध्ये नवे रेडिओ स्टेशन सुरु होणार असून त्यात बंगाली, राखिन व म्यानमारी भाषेत आरोग्य व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिलं जाईल. रोहिंग्यांच्या देशाबाहेर जाण्याबाबत  सू की  म्हणाल्या, रोहिंग्यांनी बांगलादेशात जाण्याचे काहीच कारण नाही, ५ सप्टेंबर नंतर कोणतीही हिंसा किंवा लष्करी कारवाई राखिनमध्ये झालेली नाही. तसेच ५०% मुस्लीम गावे आजही तशीच व्यवस्थित आहेत, त्यामुळे त्यांच्या स्थलांतरामागची कारणे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. बांगलादेशाशी संबंध सुधारण्याचे आमचे सरकार प्रयत्न करत आहे.

रोहिंग्यांना सहानुभूती दाखवणे ही देशद्रोहाची शेवटची सीमाच - उद्धव ठाकरे

टॅग्स :Rohingyaरोहिंग्या