शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

म्यानमारमधून पलायन करताना बोट उलटून 12 रोहिंग्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 17:31 IST

बांगलादेशमध्ये फिशिंग ट्रॉलरमध्ये बसून पळून जाणाऱ्या रोहिंग्यांची बोट बुडून 12 रोहिंग्यांचा मृत्यू झाला आहे. हे रोहिंग्या म्यानमारमधील अशांततेस आणि अराजकतेस कंटाळून दोन्ही देशांच्यामध्ये असणाऱ्या नेफ नदीतून पळून जात होते. तसेच या बोटीमधील 13 लोकांना वाचवण्यात यश आल्याचे बांगलादेशातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्देनेफ नदी ओलांडून बांगलादेशात जाताना रोहिंग्यांच्या बोटींनी आजवर अनेकदा अपघात झाले आहेत.बांगलादेश आणि म्यानमार यांच्यामध्ये नेफ ही नैसर्गिक सीमा आहे.

कॉक्स बझार, दि.9-  बांगलादेशमध्ये फिशिंग ट्रॉलरमध्ये बसून पळून जाणाऱ्या रोहिंग्यांची बोट बुडून 12 रोहिंग्यांचा मृत्यू झाला आहे. हे रोहिंग्या म्यानमारमधील अशांततेस आणि अराजकतेस कंटाळून दोन्ही देशांच्यामध्ये असणाऱ्या नेफ नदीतून पळून जात होते. तसेच या बोटीमधील 13 लोकांना वाचवण्यात यश आल्याचे बांगलादेशातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

रोहिंग्यांची घुसखोरी रोखण्यासाठी बीएसएफने 50 संवेदनशील ठिकाणी वाढवली गस्त, आसाममध्ये हायअलर्ट 

बांगलादेश बॉर्डर गार्डसच्या सैनिकाने सांगितल्याप्रमाणे, हे लोक अत्यंत घाबरलेले होते, त्यांना वाचवल्यावर प्रथमोपचार करण्यात आले. अन्न आणि औषधाची मदत केल्यानंतर यांना कॅम्पमध्ये ठेवण्यात आले आहे. बुडालेल्या 12 व्यक्तींचे मृतदेह बांगलादेशच्या दक्षिणेस असणाऱ्या शाह पारीर द्वीप येथे वाहून आले आहेत.

आंग सान यांची भूमिका धक्कादायक

बांगलादेशच्या स्टेट कौन्सिलर आंग सान सू की यांनी रोहिंग्यांबाबत अजूनही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. रोहिंग्या का पळून जात आहेत ते माहिती नाही असं धक्कादायक विधान त्यांनी केलं आहे. राखिन प्रांतात शांततेसाठी आमचे सरकार आधीपासून प्रयत्न करत आहे. २०१७-२२ अशी राखिनसाठी पंचवार्षिक योजनाही आम्ही केली आहे. त्यामुळे येथे रोजगार उपलब्ध होईल, शिक्षण आरोग्याच्या सुविधा वाढल्या आहेत. तसेच जेथे फक्त बोटीने जाता येत असे अशा प्रदेशातही रस्ते, वीज व पायाभूत सुविधांची सोय माझ्या सरकारने केल्या आहेत. राखिन प्रांतामध्ये नवे रेडिओ स्टेशन सुरु होणार असून त्यात बंगाली, राखिन व म्यानमारी भाषेत आरोग्य व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिलं जाईल. रोहिंग्यांच्या देशाबाहेर जाण्याबाबत  सू की  म्हणाल्या, रोहिंग्यांनी बांगलादेशात जाण्याचे काहीच कारण नाही, ५ सप्टेंबर नंतर कोणतीही हिंसा किंवा लष्करी कारवाई राखिनमध्ये झालेली नाही. तसेच ५०% मुस्लीम गावे आजही तशीच व्यवस्थित आहेत, त्यामुळे त्यांच्या स्थलांतरामागची कारणे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. बांगलादेशाशी संबंध सुधारण्याचे आमचे सरकार प्रयत्न करत आहे.

रोहिंग्यांना सहानुभूती दाखवणे ही देशद्रोहाची शेवटची सीमाच - उद्धव ठाकरे

टॅग्स :Rohingyaरोहिंग्या