शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:08 IST

झेलम नदीवरील मंगला धरण आणि सिंधू नदीवरील तुर्बेला धरण ही पाकिस्तानमधील दोन प्रमुख जलाशयं आता कोरडी पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत.

एप्रिल महिन्यात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने १९६० मधील सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे गंभीर परिणाम आता पाकिस्तानवर दिसून येऊ लागले आहेत. झेलम नदीवरील मंगला धरण आणि सिंधू नदीवरील तुर्बेला धरण ही पाकिस्तानमधील दोन प्रमुख जलाशयं आता कोरडी पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत.

पाकिस्तानच्या सिंधू नदी प्रणाली प्राधिकरणच्या (IRSA) माहितीनुसार, बुधवारी पाकिस्तानला आपल्या प्रमुख जलस्रोतांमधून मिळणाऱ्या पाण्यापेक्षा सुमारे ११,१८० क्युसेक अधिक पाणी सोडावे लागले. या अतिरिक्त वापरामुळे पंजाब आणि सिंध या महत्त्वाच्या प्रांतांमधील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेवर थेट परिणाम झाला आहे.

पाकिस्तानची झाली कोंडी!

दरम्यान, भारताने आपल्या बाजूने असलेल्या जम्मू आणि काश्मीरमधील धरणांमध्ये फ्लशिंग आणि स्वच्छतेची कामे सुरू केली असून, त्यामुळे पाकिस्तानकडे जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात आणखी घट झाली आहे. भारताने पाकिस्तानसोबत पाण्याच्या प्रवाहावरील माहिती शेअर करणंही थांबवलं आहे, जे पूर्वी सिंधू करारानुसार नियमित होत असायचं.

आयआरएसएच्या आकडेवारीनुसार, सध्या पाकिस्तानमध्ये एकूण २,४१,६११ क्युसेक पाणी येत आहे, तर २,५२,७९१ क्युसेक पाणी वापरले जात आहे, त्यामुळे दररोजचा तुटवडा मोठा आहे. पंजाबला यावर्षी १,१४,६०० क्युसेक पाणी मिळाले, जे गेल्या वर्षीच्या १,४३,६०० क्युसेकच्या तुलनेत २० टक्के कमी आहे. सिंध प्रांतातही अशीच टंचाई अनुभवली जात आहे.

पाण्यावाचून पाकिस्तानमध्ये हाहाकार 

याआधी आयआरएसएच्या सल्लागार समितीने १ मे ते १० जून या कालावधीसाठी २१% पाणीटंचाईचा इशारा दिला होता. आता जून ते सप्टेंबर अखेर ही टंचाई ७% दरम्यान राहण्याची शक्यता असल्याचे अनुमान वर्तवण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, या टंचाईचा खरीप हंगामावर मोठा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. पाण्यावाचून आता पाकिस्तानमध्ये चांगलाच गदारोळ माजला आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूर