शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:08 IST

झेलम नदीवरील मंगला धरण आणि सिंधू नदीवरील तुर्बेला धरण ही पाकिस्तानमधील दोन प्रमुख जलाशयं आता कोरडी पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत.

एप्रिल महिन्यात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने १९६० मधील सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे गंभीर परिणाम आता पाकिस्तानवर दिसून येऊ लागले आहेत. झेलम नदीवरील मंगला धरण आणि सिंधू नदीवरील तुर्बेला धरण ही पाकिस्तानमधील दोन प्रमुख जलाशयं आता कोरडी पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत.

पाकिस्तानच्या सिंधू नदी प्रणाली प्राधिकरणच्या (IRSA) माहितीनुसार, बुधवारी पाकिस्तानला आपल्या प्रमुख जलस्रोतांमधून मिळणाऱ्या पाण्यापेक्षा सुमारे ११,१८० क्युसेक अधिक पाणी सोडावे लागले. या अतिरिक्त वापरामुळे पंजाब आणि सिंध या महत्त्वाच्या प्रांतांमधील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेवर थेट परिणाम झाला आहे.

पाकिस्तानची झाली कोंडी!

दरम्यान, भारताने आपल्या बाजूने असलेल्या जम्मू आणि काश्मीरमधील धरणांमध्ये फ्लशिंग आणि स्वच्छतेची कामे सुरू केली असून, त्यामुळे पाकिस्तानकडे जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात आणखी घट झाली आहे. भारताने पाकिस्तानसोबत पाण्याच्या प्रवाहावरील माहिती शेअर करणंही थांबवलं आहे, जे पूर्वी सिंधू करारानुसार नियमित होत असायचं.

आयआरएसएच्या आकडेवारीनुसार, सध्या पाकिस्तानमध्ये एकूण २,४१,६११ क्युसेक पाणी येत आहे, तर २,५२,७९१ क्युसेक पाणी वापरले जात आहे, त्यामुळे दररोजचा तुटवडा मोठा आहे. पंजाबला यावर्षी १,१४,६०० क्युसेक पाणी मिळाले, जे गेल्या वर्षीच्या १,४३,६०० क्युसेकच्या तुलनेत २० टक्के कमी आहे. सिंध प्रांतातही अशीच टंचाई अनुभवली जात आहे.

पाण्यावाचून पाकिस्तानमध्ये हाहाकार 

याआधी आयआरएसएच्या सल्लागार समितीने १ मे ते १० जून या कालावधीसाठी २१% पाणीटंचाईचा इशारा दिला होता. आता जून ते सप्टेंबर अखेर ही टंचाई ७% दरम्यान राहण्याची शक्यता असल्याचे अनुमान वर्तवण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, या टंचाईचा खरीप हंगामावर मोठा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. पाण्यावाचून आता पाकिस्तानमध्ये चांगलाच गदारोळ माजला आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूर