Crisis in Middle East: मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये भारतीय ध्वज असलेली 22 जहाजे अडकल्याची माहिती समोर आली आहे. या जहाजांमध्ये सुमारे 3 लाख मेट्रिक टन लिक्विड पेट्रोलियम गॅस (LPG) असून, या जहाजांच्या सुरक्षित सुटकेसाठी भारत सरकारकडून इराणसह संबंधित देशांशी चर्चा सुरू आहे.
सरकारची महत्वाची माहिती
शिपिंग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, एकूण 22 भारतीय ध्वजधारक जहाजे होर्मुजमध्ये अडकली असून, त्यापैकी 6 LPG कॅरियर्स, 1 LNG टँकर, 4 क्रूड ऑइल टँकर्स आणि केमिकल कंटेनर जहाजांचाही समावेश आहे. यातील एका मोठ्या LPG जहाजामध्ये सुमारे 45,000 मेट्रिक टन गॅस वाहून नेली जाऊ शकते. त्यामुळे 6 जहाजांमध्ये मिळून अंदाजे 3 लाख मेट्रिक टन LPG आहे.
काही जहाजांची सुरक्षित सुटका
दरम्यान, दोन भारतीय LPG टँकर्स, ‘शिवालिक’ आणि ‘नंदा देवी’ यांनी 14 मार्च रोजी सुरक्षितपणे होर्मुज पार करत भारतात आगमन केले. या जहाजांद्वारे सुमारे 92,700 मेट्रिक टन LPG भारतात पोहोचली. तसेच, ‘जग लाडकी’ नावाचा क्रूड ऑइल टँकरही यूएईतील फुजैराह येथून 81,000 मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन भारताकडे रवाना झाला आहे.
इराणसोबत चर्चेला वेग
अडकलेल्या जहाजांना सुरक्षित मार्ग मिळावा यासाठी भारत सरकार इराणसह इतर देशांशी सातत्याने संपर्कात आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनीही स्पष्ट केले की, जहाज सुरक्षित परत येणे, ही सरकारची प्राथमिकता आहे आणि यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
‘जहाजांची अदलाबदल’ चर्चेचे खंडन
काही माध्यमांतून भारत आणि इराण यांच्यात जहाजांच्या अदलाबदलीबाबत चर्चा झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, भारत सरकारने हे दावे स्पष्टपणे फेटाळले आहेत. सरकारने सांगितले की, अशा प्रकारची कोणतीही चर्चा झालेली नाही.
युरोपियन संघातही चर्चेचा विषय
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या ब्रुसेल्स दौऱ्यादरम्यानही ही परिस्थिती आणि ऊर्जा सुरक्षेवर चर्चा झाली. युरोपियन देशांनी या संकटावर संवाद आणि कूटनीतीद्वारे तोडगा काढण्यावर भर दिला असून, भारतानेही शांतता आणि स्थैर्याचे समर्थन केले आहे.
Web Summary : Amidst Middle East tensions, 3 lakh metric tons of Indian LPG are stranded in the Strait of Hormuz. The government is in talks with Iran for safe passage, denying any 'exchange' deal. Some tankers safely reached India. Focus on diplomatic solutions is prioritized.
Web Summary : मध्य पूर्व तनाव के बीच, भारत का 3 लाख मेट्रिक टन एलपीजी होर्मुज जलडमरूमध्य में फंसा हुआ है। सरकार सुरक्षित मार्ग के लिए ईरान के साथ बातचीत कर रही है, किसी भी 'एक्सचेंज' सौदे से इनकार किया। कुछ टैंकर सुरक्षित रूप से भारत पहुंचे। राजनयिक समाधानों पर ध्यान केंद्रित किया गया है।