शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

Coronavirus: भारताला रेड लिस्टमधून बाहेर काढल्यानंतर पाकिस्तानची तडफड; ब्रिटनला लिहिलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 10:26 IST

एप्रिलच्या सुरुवातीला पाकिस्तानला तर १९ एप्रिलदरम्यान भारताला ब्रिटननं रेड लिस्टमध्ये टाकलं होतं.

ठळक मुद्दे५ ऑगस्टला भारताला एम्बर यादीत टाकलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गोंधळ झाला.एम्बर लिस्टमध्ये असलेल्या देशातील प्रवाशांना प्रवासाच्या ३ दिवसापूर्वी कोरोना लसीची चाचणी करावी लागेल.ब्रिटननं त्यांच्या निर्णयात बदल करण्याची गरज आहे, पाकिस्ताानची मागणी

इस्लामाबाद – भारताला प्रवास निर्बंधांच्या यादीतून सूट मिळाल्यानंतर पाकिस्तानची तडफड सुरू झाली आहे. पाकिस्तानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहून लंडनद्वारे कोविड १९ प्रवासी संबंधात लावण्यात आलेल्या निर्बंधात बदल करण्यावरून आक्षेप घेतला आहे. ब्रिटननं भारताला रेड लिस्टमधून काढून एम्बर लिस्टमध्ये टाकलं आहे तर पाकिस्तानला अद्यापही रेड लिस्टमध्ये ठेवल्यानं ब्रिटीश सरकारचं धोरण पक्षपाती असल्याचा आरोप पाकिस्ताननं केला आहे.

एप्रिलच्या सुरुवातीला पाकिस्तानला तर १९ एप्रिलदरम्यान भारताला ब्रिटननं रेड लिस्टमध्ये टाकलं होतं. परंतु अलीकडेच भारतासह काही देशांना रेड लिस्टमधून बाहेर काढलं आहे. ५ ऑगस्टला भारताला एम्बर यादीत टाकलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गोंधळ झाला. ब्रिटनचे परिवहन मंत्री ग्रांट शाप्स यांनी ट्विट केलं की, यूएई, कतार, भारत, बहरिन या देशांना रेड लिस्टमधून वगळण्यात येत आहे. हे देश एम्बर लिस्टमध्ये असतील. हे बदल ८ ऑगस्टच्या सकाळी ४ वाजल्यापासून अंमलात येतील असं म्हटलं होतं.

देशाच्या कायद्यानुसार, एम्बर लिस्टमध्ये असलेल्या देशातील प्रवाशांना प्रवासाच्या ३ दिवसापूर्वी कोरोना लसीची चाचणी करावी लागेल. ब्रिटनमधून जाण्याआधी कोविड १९ च्या दोन चाचण्याची बुकींग करावी. त्याठिकाणी पोहचल्यानंतर पेसेंजर लोकेटर फॉर्म भरावा लागेल. तो प्रवासी १० दिवस घरात किंवा विलगीकरणात राहील. ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांना लिहिलेल्या पत्रात पाकच्या कोरोना आकडेवारीची तुलना शेजारील अन्य देशांसोबत केली आहे.

पाकनं पत्रात म्हटलंय की, संक्रमित लोकांना प्रवास करण्यापासून रोखण्यासाठी तीन पर्यायांचा वापर केला पाहिजे. त्यात जागतिक आरोग्य संघटनेद्वारे कोविड १९ लसीकरण झालेले वैध प्रमाणपत्र, प्रवास करण्याच्या ७२ तासांआधीची आरटीपीसीआर चाचणी आणि हवाई विमानतळाहून उड्डाण करण्यापूर्वी रॅपिड अँटिजेन चाचणीचा समावेश असावा. पाकिस्तानच्या आकडेवारीची तुलना भारत, इराण आणि ईराकशी केली आहे. पाकिस्तानच्या दर १० लाख लोकांमध्ये मृत्यूदर खूप कमी आहे. दिवसाला सरासरी १०० पेक्षा अधिक लोकांचे लसीकरण होते. त्यामुळे ब्रिटननं त्यांच्या निर्णयात बदल करण्याची गरज आहे असं त्यांनी पत्रात सांगितले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतPakistanपाकिस्तान