शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
2
सावधान! मोटरोलाचा स्मार्टफोन जिन्सच्या खिशातच फुटला; तरुणाचा प्रायव्हेट पार्ट थोडक्यात वाचला...
3
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
4
Viral Video : चालत्या रिक्षेतून उडी मारली अन् थेट रील करू लागला, व्हिडीओ येताच तुफान व्हायरल झाला! 
5
कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
6
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
7
२०२६च्या पहिल्याच दिवशी प्रदोष, ‘असे’ करा व्रतपूजन; शिव मंत्र ठरेल रामबाण, वर्षभर मिळेल लाभ!
8
नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या
9
६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
10
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
11
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
12
टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
13
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
14
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
15
गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
16
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
17
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
18
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
19
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
20
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: भारताला रेड लिस्टमधून बाहेर काढल्यानंतर पाकिस्तानची तडफड; ब्रिटनला लिहिलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 10:26 IST

एप्रिलच्या सुरुवातीला पाकिस्तानला तर १९ एप्रिलदरम्यान भारताला ब्रिटननं रेड लिस्टमध्ये टाकलं होतं.

ठळक मुद्दे५ ऑगस्टला भारताला एम्बर यादीत टाकलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गोंधळ झाला.एम्बर लिस्टमध्ये असलेल्या देशातील प्रवाशांना प्रवासाच्या ३ दिवसापूर्वी कोरोना लसीची चाचणी करावी लागेल.ब्रिटननं त्यांच्या निर्णयात बदल करण्याची गरज आहे, पाकिस्ताानची मागणी

इस्लामाबाद – भारताला प्रवास निर्बंधांच्या यादीतून सूट मिळाल्यानंतर पाकिस्तानची तडफड सुरू झाली आहे. पाकिस्तानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहून लंडनद्वारे कोविड १९ प्रवासी संबंधात लावण्यात आलेल्या निर्बंधात बदल करण्यावरून आक्षेप घेतला आहे. ब्रिटननं भारताला रेड लिस्टमधून काढून एम्बर लिस्टमध्ये टाकलं आहे तर पाकिस्तानला अद्यापही रेड लिस्टमध्ये ठेवल्यानं ब्रिटीश सरकारचं धोरण पक्षपाती असल्याचा आरोप पाकिस्ताननं केला आहे.

एप्रिलच्या सुरुवातीला पाकिस्तानला तर १९ एप्रिलदरम्यान भारताला ब्रिटननं रेड लिस्टमध्ये टाकलं होतं. परंतु अलीकडेच भारतासह काही देशांना रेड लिस्टमधून बाहेर काढलं आहे. ५ ऑगस्टला भारताला एम्बर यादीत टाकलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गोंधळ झाला. ब्रिटनचे परिवहन मंत्री ग्रांट शाप्स यांनी ट्विट केलं की, यूएई, कतार, भारत, बहरिन या देशांना रेड लिस्टमधून वगळण्यात येत आहे. हे देश एम्बर लिस्टमध्ये असतील. हे बदल ८ ऑगस्टच्या सकाळी ४ वाजल्यापासून अंमलात येतील असं म्हटलं होतं.

देशाच्या कायद्यानुसार, एम्बर लिस्टमध्ये असलेल्या देशातील प्रवाशांना प्रवासाच्या ३ दिवसापूर्वी कोरोना लसीची चाचणी करावी लागेल. ब्रिटनमधून जाण्याआधी कोविड १९ च्या दोन चाचण्याची बुकींग करावी. त्याठिकाणी पोहचल्यानंतर पेसेंजर लोकेटर फॉर्म भरावा लागेल. तो प्रवासी १० दिवस घरात किंवा विलगीकरणात राहील. ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांना लिहिलेल्या पत्रात पाकच्या कोरोना आकडेवारीची तुलना शेजारील अन्य देशांसोबत केली आहे.

पाकनं पत्रात म्हटलंय की, संक्रमित लोकांना प्रवास करण्यापासून रोखण्यासाठी तीन पर्यायांचा वापर केला पाहिजे. त्यात जागतिक आरोग्य संघटनेद्वारे कोविड १९ लसीकरण झालेले वैध प्रमाणपत्र, प्रवास करण्याच्या ७२ तासांआधीची आरटीपीसीआर चाचणी आणि हवाई विमानतळाहून उड्डाण करण्यापूर्वी रॅपिड अँटिजेन चाचणीचा समावेश असावा. पाकिस्तानच्या आकडेवारीची तुलना भारत, इराण आणि ईराकशी केली आहे. पाकिस्तानच्या दर १० लाख लोकांमध्ये मृत्यूदर खूप कमी आहे. दिवसाला सरासरी १०० पेक्षा अधिक लोकांचे लसीकरण होते. त्यामुळे ब्रिटननं त्यांच्या निर्णयात बदल करण्याची गरज आहे असं त्यांनी पत्रात सांगितले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतPakistanपाकिस्तान