शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
4
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
5
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
6
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
7
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
8
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
9
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
10
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
11
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
12
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
13
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
14
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
15
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
16
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
17
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
18
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
19
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
20
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण

Coronavirus: भारताला रेड लिस्टमधून बाहेर काढल्यानंतर पाकिस्तानची तडफड; ब्रिटनला लिहिलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 10:26 IST

एप्रिलच्या सुरुवातीला पाकिस्तानला तर १९ एप्रिलदरम्यान भारताला ब्रिटननं रेड लिस्टमध्ये टाकलं होतं.

ठळक मुद्दे५ ऑगस्टला भारताला एम्बर यादीत टाकलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गोंधळ झाला.एम्बर लिस्टमध्ये असलेल्या देशातील प्रवाशांना प्रवासाच्या ३ दिवसापूर्वी कोरोना लसीची चाचणी करावी लागेल.ब्रिटननं त्यांच्या निर्णयात बदल करण्याची गरज आहे, पाकिस्ताानची मागणी

इस्लामाबाद – भारताला प्रवास निर्बंधांच्या यादीतून सूट मिळाल्यानंतर पाकिस्तानची तडफड सुरू झाली आहे. पाकिस्तानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहून लंडनद्वारे कोविड १९ प्रवासी संबंधात लावण्यात आलेल्या निर्बंधात बदल करण्यावरून आक्षेप घेतला आहे. ब्रिटननं भारताला रेड लिस्टमधून काढून एम्बर लिस्टमध्ये टाकलं आहे तर पाकिस्तानला अद्यापही रेड लिस्टमध्ये ठेवल्यानं ब्रिटीश सरकारचं धोरण पक्षपाती असल्याचा आरोप पाकिस्ताननं केला आहे.

एप्रिलच्या सुरुवातीला पाकिस्तानला तर १९ एप्रिलदरम्यान भारताला ब्रिटननं रेड लिस्टमध्ये टाकलं होतं. परंतु अलीकडेच भारतासह काही देशांना रेड लिस्टमधून बाहेर काढलं आहे. ५ ऑगस्टला भारताला एम्बर यादीत टाकलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गोंधळ झाला. ब्रिटनचे परिवहन मंत्री ग्रांट शाप्स यांनी ट्विट केलं की, यूएई, कतार, भारत, बहरिन या देशांना रेड लिस्टमधून वगळण्यात येत आहे. हे देश एम्बर लिस्टमध्ये असतील. हे बदल ८ ऑगस्टच्या सकाळी ४ वाजल्यापासून अंमलात येतील असं म्हटलं होतं.

देशाच्या कायद्यानुसार, एम्बर लिस्टमध्ये असलेल्या देशातील प्रवाशांना प्रवासाच्या ३ दिवसापूर्वी कोरोना लसीची चाचणी करावी लागेल. ब्रिटनमधून जाण्याआधी कोविड १९ च्या दोन चाचण्याची बुकींग करावी. त्याठिकाणी पोहचल्यानंतर पेसेंजर लोकेटर फॉर्म भरावा लागेल. तो प्रवासी १० दिवस घरात किंवा विलगीकरणात राहील. ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांना लिहिलेल्या पत्रात पाकच्या कोरोना आकडेवारीची तुलना शेजारील अन्य देशांसोबत केली आहे.

पाकनं पत्रात म्हटलंय की, संक्रमित लोकांना प्रवास करण्यापासून रोखण्यासाठी तीन पर्यायांचा वापर केला पाहिजे. त्यात जागतिक आरोग्य संघटनेद्वारे कोविड १९ लसीकरण झालेले वैध प्रमाणपत्र, प्रवास करण्याच्या ७२ तासांआधीची आरटीपीसीआर चाचणी आणि हवाई विमानतळाहून उड्डाण करण्यापूर्वी रॅपिड अँटिजेन चाचणीचा समावेश असावा. पाकिस्तानच्या आकडेवारीची तुलना भारत, इराण आणि ईराकशी केली आहे. पाकिस्तानच्या दर १० लाख लोकांमध्ये मृत्यूदर खूप कमी आहे. दिवसाला सरासरी १०० पेक्षा अधिक लोकांचे लसीकरण होते. त्यामुळे ब्रिटननं त्यांच्या निर्णयात बदल करण्याची गरज आहे असं त्यांनी पत्रात सांगितले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतPakistanपाकिस्तान