शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

CoronaVirus News: पाकिस्तानमध्ये मोठा प्रादुर्भाव; सर्व प्रांतांत धोका वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 06:45 IST

रुग्णांची संख्या १ लाख ४४ हजारांवर

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंजाब, सिंध, बलुचिस्तान, गिलगिट-बाल्टिस्तान, पाकव्याप्त काश्मीर, खैबर बख्तुनवा तसेच राजधानीचे शहर असलेल्या इस्लामाबादमध्ये ‘कोविड-१९’च्या रुग्णांमध्ये सतत वाढ होत असून, त्यामुळे पाकिस्तानी जनताच घाबरून गेली आहे, तर इम्रान खान सरकार हतबल झाल्याचे दिसत आहे.पाकिस्तानात महागाईने कहर केला आहे. अन्नधान्य, भाज्या यांचे भाव आकाशाला भिडले आहेत आणि त्यामुळे लोक आधीच संतापले आहेत. त्यामुळे इम्रान खान सरकार पूर्ण अपयशी ठरल्याची भावना देशात दिसत आहे. त्यातच रुग्णसंख्या वेगाने वाढत असून, त्या प्रमाणात तिथे वैद्यकीय सुविधा मात्र उपलब्ध नाहीत. त्यामुळे सरकारवर सर्व स्तरांतून जोरदार टीका होत आहे. रुग्णांसाठी पुरेशी रुग्णालये नाहीत, जी आहेत तिथे खाटांची व्यवस्था नाही, जिथे खाटा आहेत, तिथे डॉक्टर्स, नर्सेस आणि अन्य आरोग्य कर्मचारी नाहीत. त्यामुळे रुग्णांचे हाल सुरू आहेत, अशी टीका विरोधी पक्ष इम्रान खान यांच्यावर करीत आहेत.गेल्या २४ तासांत पाकिस्तानच्या सर्व प्रांतांत मिळून ५ हजार २४८ नवे रुग्ण आढळले. भारताच्या तुलनेत पाकिस्तानातील रुग्णसंख्या आणि रोज त्यात होणारी वाढ कमी आहे, असा दावा सरकार करीत आहे. पण पाकिस्तानचा आकार, तेथील लोकसंख्या पाहता हा आकडा खूपच मोठा आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तेथील एकूण रुग्णांची संख्या आता १ लाख ४४ हजारांवर गेली आहे. तिथे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही भारतापेक्षा कमी आहे. भारतात बरे होणारे रुग्ण ५१ टक्के आहेत. पण पाकिस्तानात जेमतेम ४0 टक्के इतकेच आहे.चाचण्यांचे प्रमाणही कमीपाकिस्तानात कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाणही अतिशय कमी आहे. तिथे गेल्या २४ तासांत ३0 हजारांहून कमी चाचण्या झाल्या. भारतात चाचण्यांचे प्रमाण लाखांमध्ये आहे. चाचण्यांचे प्रमाण कमी असल्याने रुग्णांचा खरा आकडा समजण्यात अडचणी येत आहे. पंजाब आणि सिंध या दोन प्रांतांमध्ये रुग्णांची संख्या ५५ हजारांच्या आसपास आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPakistanपाकिस्तान