शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

CoronaVirus: विषाणूचा प्रसार सप्टेंबरपासून; शास्त्रज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 02:23 IST

प्रत्यक्ष बाधा होण्यापूर्वी काही महिने विषाणू शरीरात राहिला असून, त्याने स्वत:मधे परिवर्तन करून उपद्रव दाखविण्यास सुरुवात केल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

वॅनगार्ड : कोविड-१९ चा पहिला रुग्ण डिसेंबरमध्ये समोर आला असला, तरी त्याचा प्रसार सप्टेंबर २०१९ पासूनच सुरू झाला असल्याचा दावा केंब्रिज विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केला आहे. प्रत्यक्ष बाधा होण्यापूर्वी काही महिने विषाणू शरीरात राहिला असून, त्याने स्वत:मधे परिवर्तन करून उपद्रव दाखविण्यास सुरुवात केल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. चीनमधील वुहान येथून रोगाचा प्रसार झाला आहे. मात्र, नक्की प्रसार कोठून झाला, वटवाघळातून त्याचा प्रवास कसा झाला, त्याचा पहिला बाधित व्यक्ती कोण? अशा विविध प्रश्नांवर शास्त्रज्ञ काम करीत आहेत. शास्त्रज्ञांनी बांधलेल्या आडाख्यानुसार १३ सप्टेंबर ते ७ डिसेंबर २०१९ या कालावधीमध्ये या विषाणूची मानवाला लागण झाली. केंब्रिज विद्यापीठाचे पीटर फोर्स्टर म्हणाले, ‘सध्याचा विषाणू हा सुप्तपणे मानवामधे काही महिने वास होता. त्याने आपल्यात बदल केल्यानंतरच त्याचे सध्याचे घातक रुप समोर आले आहे.’ शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूचे परिवर्तन आणि त्याच्या प्रसाराचा गणितीय सूत्रावर आधारित जागतिक नकाशा केला आहे. त्या माध्यमातून विषाणूमधे जनुकीय परिवर्तन कसे झाले, त्याचे उगमस्थान कोणते (पेशंट झीरो) होते याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या हा विषाणू वटवाघळातून आल्याचे मानले जात आहे. चीनच्या युनान प्रांतामधे वटवाघळाच्या विष्ठेच्या नमुन्यामध्ये हे विषाणू आढळून आले आहेत. त्याच्याशी आत्ताच्या विषाणूचा ९६ टक्के जनुकीय आराखडा जुळत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या