शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: चार गोष्टींनी कमाल केली; ऑस्ट्रेलियानं जवळपास जिंकली कोरोनाविरुद्धची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 07:01 IST

स्वयंशिस्त, कायद्याचा धाक, आर्थिक स्थैर्य आणि विश्वास; कोरोनाविरुद्धच्या लढ्याच्या यशाची चतु:सूत्री

- संदीप शिंदे मुंबई : सोशल डिस्टन्सिंगचे स्वयंप्रेरणेने पालन, नियमाचे उल्लंघन केल्यास तब्बल ११ हजार डॉलरचा (५ लाख ३५ हजार रुपये) दंड व ६ महिने शिक्षेचा धाक, ‘कोविड-१९’चा मुकाबला करणारी सक्षम आरोग्य यंत्रणा, उत्पन्न गमावलेल्यांना सरकारी अर्थसहाय्य आणि जनतेचा सरकारवर असलेला दृढ विश्वास या बळावरच आॅस्ट्रेलियाने कोरोनाला रोखण्यात यश मिळविल्याची भावना मूळचे पुणेकर असलेल्या आणि आता सिडनी शहरात स्थायिक झालेल्या राजेंद्र पारगे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.आॅस्ट्रेलियात पहिला रुग्ण २५ जानेवारी रोजी आढळला. तर, २९ मार्च रोजी सर्वाधिक ५२८ नव्या रुग्णांची नोंद झाली. तो आलेख आता झपाट्याने खाली येत असून, १७ एप्रिल रोजी रुग्णसंख्या ६५ होती. ३ महिन्यांत ६,५६५ रूग्ण आणि ६९ मृत्यू या टप्प्यापर्यंत संसर्गाला रोखण्यात त्यांना यश आले आहे. या आजारावर मात करणारे ४ हजारांपेक्षा जास्त आहेत. शिस्तबद्ध पद्धतीने सरकार आणि लोकांनी या संकटाचा मुकाबला केला. त्यामुळे कधीही परिस्थिती हाताबाहेर गेली नाही. भारताप्रमाणेच इथल्या जनतेनेही कोरोनाला हरवण्याचा निर्धार केल्याचे पारगे कुटुंब सांगते.पारगे यांनी ड्रायव्हिंग स्कूलचा व्यवसाय बंद ठेवला आहे. शरणार्थींच्या कॅम्पमधील चाईल्ड केअर आणि इंग्रजी संभाषण विभागात कार्यरत असलेली त्यांची पत्नी वर्षा यांचे कार्यालयही बंद आहे. अशा पद्धतीने मासिक उत्पन्न गमावलेल्या लोकांसाठी १ लाख ३० हजार कोटींचे पॅकेज सरकारने जाहीर केले आहे. त्यानुसार प्रत्येक कुटुंबाला महिन्याकाठी तीन हजार डॉलरपर्यंतचे अर्थसहाय्य मिळेल. पारगे यांची कन्या पूजा खासगी कंपनीत कार्यरत असून तीसुद्धा घरूनच काम करते. त्यांच्या कंपनीतही २० टक्के वेतन कपात होणार आहे. आर्थिक संकट किंवा नैराश्य येऊ नये म्हणून बहुतांश ठिकाणी कर्मचाऱ्यांना रोज १५ मिनिटे मानसिक आरोग्याचे धडेही दिले जातात. शाळा, कॉलेजचे विद्यार्थी आॅनलाईन धडे गिरवत आहेत. घरी असलेल्यांसाठी सरकारच्या आॅनलाईन अभ्यासक्रमांना प्रतिसाद मिळत आहे.लग्नाला ५ आणि अंत्ययात्रेला १० जणया काळात लग्नामध्ये फक्त ५ तर, अंत्यविधीसाठी १०पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्याची परवानगी नाही. ‘‘देशात पूर्ण लॉकडाऊन नाही. अत्यावश्यक सेवा, उत्पादन प्रक्रिया, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू आहे. वर्क फ्रॉम होम ज्यांना शक्य नाही ते कायार्लयांमध्ये जातात. किराणा सामान घेण्यासाठी घराबाहेर पडता येते. परंतु, प्रत्येक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन होते. दोनपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमण्यास बंदी आहे. बिनकामाचे घराबाहेर पडल्यास दंड आणि कारावासाची भीती आहे. परंतु, ९९ टक्के लोक स्वयंप्रेरणेने नियम पाळतात, असे वर्षा यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या